शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

आधुनिक जग शास्त्राने भरलेल्या ज्ञानाची धनदौलत: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:01 IST

आपण नेहमी दुसऱ्याचे माप काढण्यातच वेळ घालवतो

ठळक मुद्देश्री महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने राम डवरी कलागौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन देशातील १३० कोटींच्या लोकसंख्येत सात-आठ कोटी लोकांना मधुमेह

पुणे : माणसासमोर सध्याच्या धावपळीच्या आधुनिक जगात कसे जगावे, हा प्रश्न उभा राहिला आहे. जीवन हे एक गूढ आहे. त्यामध्ये सतत काहीतरी शोधत राहिले पाहिजे. आताचे आधुनिक जग ही शास्त्राने भरलेल्या ज्ञानाची धनदौलत आहे. प्रत्येक व्यक्तीने ज्ञानाचा उत्तम प्रकारे वापर करण्याचा विचार करावा, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. श्री महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने चित्रपटनिर्माते राम डवरी कलागौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुरंदरे यांच्या हस्ते डॉ. जगन्नाथ दीक्षित, अभिनेत्री उषा नाईक, मधुरा वेलणकर, केजीएम कॉलेज संस्थापक डॉ. कल्याण जाधव यांना राम डवरी कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, नॅशनल शिपिंग बोर्ड अध्यक्ष प्रदीप रावत, नटवर्य डॉ. राम साठ्ये, श्री महर्षी व्यास प्रतिष्ठान अध्यक्ष दिगंबर डवरी आदी उपस्थित होते. 

पुरंदरे म्हणाले, ‘‘आपण नेहमी दुसऱ्याचे माप काढण्यातच वेळ घालवतो. जीवनात प्रत्येक गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. ते करताना माझ्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, याचेही भान ठेवायला हवे. मनातील ईश्वराला विचारून जगायला शिका. सर्व वाईट विचारांपासून दूर राहा.’’ ०००मी चित्रपटसृष्टीत गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत आहे. ‘पिंजरा’ या चित्रपटापासून सुरुवात झाली. त्यांनतर मी मागे वळून पाहिले नाही. डवरी यांनी एका स्पॉटबॉयपासून कामाला सुरुवात केली. ते दिग्दर्शकापर्यंत पोहोचले. त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. मला राम डवरी यांच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे.  उषा नाईक;  अभिनेत्री ०००देशातील १३० कोटींच्या लोकसंख्येत सात-आठ कोटी लोकांना मधुमेह आहे. मधुमेह कधी बरा होत नाही. तो आटोक्यात ठेवता येतो; पण भारतासारख्या देशात या आजारावरील उपचारांचा खर्च परवडत नाहीत. मधुमेह या आजारामुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माणसाने दोन वेळेसच जेवण करावे. त्यामुळे आपण शारीरिकदृष्ट्या उत्तम राहतो. मिळतंय म्हणून सतत खात राहणे, हे मानवी आरोग्यसाठी हानिकारक असते.                    डॉ. जगन्नाथ दीक्षित 

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेResearchसंशोधन