शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

आधुनिक जग शास्त्राने भरलेल्या ज्ञानाची धनदौलत: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:01 IST

आपण नेहमी दुसऱ्याचे माप काढण्यातच वेळ घालवतो

ठळक मुद्देश्री महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने राम डवरी कलागौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन देशातील १३० कोटींच्या लोकसंख्येत सात-आठ कोटी लोकांना मधुमेह

पुणे : माणसासमोर सध्याच्या धावपळीच्या आधुनिक जगात कसे जगावे, हा प्रश्न उभा राहिला आहे. जीवन हे एक गूढ आहे. त्यामध्ये सतत काहीतरी शोधत राहिले पाहिजे. आताचे आधुनिक जग ही शास्त्राने भरलेल्या ज्ञानाची धनदौलत आहे. प्रत्येक व्यक्तीने ज्ञानाचा उत्तम प्रकारे वापर करण्याचा विचार करावा, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. श्री महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने चित्रपटनिर्माते राम डवरी कलागौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुरंदरे यांच्या हस्ते डॉ. जगन्नाथ दीक्षित, अभिनेत्री उषा नाईक, मधुरा वेलणकर, केजीएम कॉलेज संस्थापक डॉ. कल्याण जाधव यांना राम डवरी कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, नॅशनल शिपिंग बोर्ड अध्यक्ष प्रदीप रावत, नटवर्य डॉ. राम साठ्ये, श्री महर्षी व्यास प्रतिष्ठान अध्यक्ष दिगंबर डवरी आदी उपस्थित होते. 

पुरंदरे म्हणाले, ‘‘आपण नेहमी दुसऱ्याचे माप काढण्यातच वेळ घालवतो. जीवनात प्रत्येक गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. ते करताना माझ्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, याचेही भान ठेवायला हवे. मनातील ईश्वराला विचारून जगायला शिका. सर्व वाईट विचारांपासून दूर राहा.’’ ०००मी चित्रपटसृष्टीत गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत आहे. ‘पिंजरा’ या चित्रपटापासून सुरुवात झाली. त्यांनतर मी मागे वळून पाहिले नाही. डवरी यांनी एका स्पॉटबॉयपासून कामाला सुरुवात केली. ते दिग्दर्शकापर्यंत पोहोचले. त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. मला राम डवरी यांच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे.  उषा नाईक;  अभिनेत्री ०००देशातील १३० कोटींच्या लोकसंख्येत सात-आठ कोटी लोकांना मधुमेह आहे. मधुमेह कधी बरा होत नाही. तो आटोक्यात ठेवता येतो; पण भारतासारख्या देशात या आजारावरील उपचारांचा खर्च परवडत नाहीत. मधुमेह या आजारामुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माणसाने दोन वेळेसच जेवण करावे. त्यामुळे आपण शारीरिकदृष्ट्या उत्तम राहतो. मिळतंय म्हणून सतत खात राहणे, हे मानवी आरोग्यसाठी हानिकारक असते.                    डॉ. जगन्नाथ दीक्षित 

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेResearchसंशोधन