शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 17:38 IST

राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचं सांगितलं आहे.

ठळक मुद्देपरप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन अभिनेता नाना पाटेकर यांचं राज ठाकरेंना उत्तर'राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं''राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला होता आणि मी माझा. प्रत्येकाला बोलण्याचा, मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे'

पुणे : परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या खोचक टीकेला अभिनेता नाना पाटेकर यांनी आज उत्तर दिले. राज ठाकरे यांचे वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं, असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचे सांगितले.  पुण्यात  एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्या वेळी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.  फेरीवाल्यांची बाजू घेत ते म्हणाले, ‘राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला होता आणि मी माझा. प्रत्येकाला बोलण्याचा, मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. फेरीवाल्यांना त्यांना एक हक्काची जागा द्यावी. यानंतरही ते पदपथांवर बसत असल्यास त्यांच्यावर  कारवाई करावी.’ पद्मावती चित्रपटाबाबत नाना म्हणाले की, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटात काय आहे हे कळेल; पण जर कुणी ‘मारेंगे-काटेंगे’ अशी भाषा वापरत असेल तर ते मला मान्य नाही. हे योग्य नाही.  नाक कापण्याची, जाळून मारण्याची धमकी देणे गैर आहे; मात्र मुळात वाद होतात कसे, मी इतके चित्रपट केले, मात्र कधी वाद झाले नाहीत. ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट झाल्यानंतर, मला तो आवडला नव्हता. बºयाचदा वाद झाला की प्रसिद्धी मिळते; पण सातत्याने वाद होत असेत तर निर्मात्यांनी चित्रपटाची तपासणी करावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून ‘न्यूड’ आणि दुर्गा या चित्रपटांबाबत त्यांना विचारले असता, चित्रपटाबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.     एनडीएमध्ये मोठे बदल झाले आहेत. सामान्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या पाल्यांना एनडीएमध्ये दाखल होण्यासाठी प्रोत्साहित करावे  ही इच्छा आहे.  मी या ठिकाणी विद्यार्थ्यांचा नाही, तर माझा उत्साह वाढवायला आलो आहे. सध्या सामाजात घडत आहे ते पाहूण खूप दु:ख होते; मात्र या तरुणांना पाहुण ऊर्जा मिळते.  देशांच्या सीमांच्या रक्षणाची जबाबदारी केवळ लष्कराची नाही तर इतर सशस्त्र दलांचीही आहे. अत्यंत बिकट परिस्थित ते देशांचे संरक्षण करीत आहेत. त्यांच्यामुळे लष्कराने काय करावे, यापेक्षा आपण काय करायला हवे ते बघणे गरजेचे आहे. कारण, सीमेपेक्षा देशांतर्गत प्रश्न खूप आहेत. आज आपण आपापसांत भांडत आहोत, याचा फायदा स्वार्थी राजकारणी घेत आहेत. हे आधी बंद व्हायला पाहिजे. 

प्रत्येकाला लष्करी प्रशिक्षण सक्तीचे हवेलष्करी प्रशिक्षणाबाबत मी ‘प्रहार’ चित्रपटावेळीच बोललो होतो. प्रत्येकाला लष्करी प्रशिक्षण सक्तीचे केले पाहिजे. एका वर्षात खूप ऊर्जा मिळते. जोपर्यंत एकावर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू नये, असे माझे मत आहे. यावर आधी चर्चा झाली होती; मात्र पुढे ती का थांबली, याचे कारण माहीत नाही.  

काय बोलले होते राज ठाकरे - 'महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत ? नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो', अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. 'वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे', अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली. 'नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू...पण नको त्या गोष्टीत पडू नका', असं राज ठाकरे म्हटले होते. 

राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना नाम संस्था सुरु करण्यावरुन प्रश्न विचारले. 'महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवायचा आहे, मग कशाला संस्था काढली. संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं. जिथे सरकारला जमत नाही, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ना मग आम्हाला शिकवायचं नाही', असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं . 

'मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही',  असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. आम्ही तुझं अभिनंदन केलं पाहिजे तिथे संजय निरुपम कौतुक करतो असं सांगत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्य नेते आणि अभिनेत्यांचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं. पहा ते कसे एकत्र येतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका, पण चोमडेपणा कशाला करता. महाराष्ट्रात आमचंच कुंपण शेत खातय असा टोला राज ठाकरेंनी लगावला.  

 

 

 

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेhawkersफेरीवाले