शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

आमदार मकरंद पाटील यांचा अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 22:09 IST

राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची आणि कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

खंडाळा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य पातळीवर राजकीय घडामोडी घडल्यानंतर राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षीय भूमिकेबाबत संभ्रमात आहे. याच पार्श्वभूमीवर वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आमदार मकरंद पाटील यांच्या निर्णयावर अवलंबून होती. जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय घडी बसवून स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करणार्‍या आमदार मकरंद पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची आणि कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

मुंबई येथे देवगीरी निवासस्थानी वाई मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मकरंद आबांना मंत्रीमंडळात स्थान देऊ परंतु आबांना राज्यात फिरावे लागेल त्यामुळे मतदासंघ तुम्हाला सांभाळावा लागेल. आबांचा तुम्हांवर जीव आहे म्हणूनच तुम्हाला विचारून निर्णय घेतला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांच्यापुढे मोठा पेचप्रसंग उभा राहीला होता. एकीकडे स्वतःच्या घराण्याचे आणि त्यांचे राजकीय अस्तित्व निर्माण करणारे पितृतुल्य व घरगुती ऋणानुबंध असणारे शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला राजकारणात व मतदारसंघाच्या विकासकामात नेहमी मदतीचा हात देणारे आणि जवळचे नातेसंबंध असणारे अजित पवार असल्याने नेमके कोणाची पाठराखण करायची हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे होता. मात्र राजकारणात मतदारसंघाचा विकास हेच ध्येय ठेवून काम करीत असल्याने अजित पवारांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. 

वास्तविक वाई मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचे काम आमदार मकरंद पाटील यांनी स्वतःच्या कौशल्याने केले. मतदारसंघात मकरंद आबांचा शब्दच अंतीम असतो हे निर्विवाद आहे. खरंतर मतदारसंघातील अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली असली तरी अद्यापही काही कामे होणे अपेक्षित आहे. तसेच खंडाळा आणि भुईंज हे दोन्ही साखर कारखाने चालविण्याचे शिवधनुष्य त्यांच्या खांद्यावर आहे. अशा प्रसंगात सरकारकडून कारखान्याला मदतीची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत जनतेचे आहे. 

टॅग्स :Makarand Patilमकरंद पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार