शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

आमदार मकरंद पाटील यांचा अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 22:09 IST

राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची आणि कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

खंडाळा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य पातळीवर राजकीय घडामोडी घडल्यानंतर राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षीय भूमिकेबाबत संभ्रमात आहे. याच पार्श्वभूमीवर वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आमदार मकरंद पाटील यांच्या निर्णयावर अवलंबून होती. जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय घडी बसवून स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करणार्‍या आमदार मकरंद पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची आणि कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

मुंबई येथे देवगीरी निवासस्थानी वाई मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मकरंद आबांना मंत्रीमंडळात स्थान देऊ परंतु आबांना राज्यात फिरावे लागेल त्यामुळे मतदासंघ तुम्हाला सांभाळावा लागेल. आबांचा तुम्हांवर जीव आहे म्हणूनच तुम्हाला विचारून निर्णय घेतला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांच्यापुढे मोठा पेचप्रसंग उभा राहीला होता. एकीकडे स्वतःच्या घराण्याचे आणि त्यांचे राजकीय अस्तित्व निर्माण करणारे पितृतुल्य व घरगुती ऋणानुबंध असणारे शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला राजकारणात व मतदारसंघाच्या विकासकामात नेहमी मदतीचा हात देणारे आणि जवळचे नातेसंबंध असणारे अजित पवार असल्याने नेमके कोणाची पाठराखण करायची हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे होता. मात्र राजकारणात मतदारसंघाचा विकास हेच ध्येय ठेवून काम करीत असल्याने अजित पवारांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. 

वास्तविक वाई मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचे काम आमदार मकरंद पाटील यांनी स्वतःच्या कौशल्याने केले. मतदारसंघात मकरंद आबांचा शब्दच अंतीम असतो हे निर्विवाद आहे. खरंतर मतदारसंघातील अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली असली तरी अद्यापही काही कामे होणे अपेक्षित आहे. तसेच खंडाळा आणि भुईंज हे दोन्ही साखर कारखाने चालविण्याचे शिवधनुष्य त्यांच्या खांद्यावर आहे. अशा प्रसंगात सरकारकडून कारखान्याला मदतीची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत जनतेचे आहे. 

टॅग्स :Makarand Patilमकरंद पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार