शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पुन्हा रिझवणार ‘मिरासदारी’, लघुपटातून उलगडणार दमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:36 IST

गणा मास्तर, हरीनाना, नाना चेंगट, रामा खरात, बाबू पैलवान अशी इरसाल पात्रे द. मा. मिरासदार यांनी आपल्या विनोदी बाजाच्या कथांमधून सशक्तपणे उभी करत रसिकांना रिझवले.

- प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : गणा मास्तर, हरीनाना, नाना चेंगट, रामा खरात, बाबू पैलवान अशी इरसाल पात्रे द. मा. मिरासदार यांनी आपल्या विनोदी बाजाच्या कथांमधून सशक्तपणे उभी करत रसिकांना रिझवले. सहज-सोपी भाषा, छोटे छोटे प्रसंग, ग्रामीण शैलीतील ठसकेबाज संवाद, त्यातून फुलत गेलेल्याकथांचा आणि पात्रांचा निर्माताच आता लघुपटाच्या माध्यमातून पडद्यावर अवतरणार आहे. आज (१४ एप्रिल) वयाची ९१ वर्षे पूर्ण करत असलेल्या दमांसाठी शासनातर्फे विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्याच कार्यक्रमात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दमांचा जीवनपट ‘मिरासदारी’ या लघुपटातून उलगडेल.मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे रसिकांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. दमांची ही मुशाफिरी लघुपटाच्या निमित्ताने पडद्यावर आणण्यासाठी त्यांचा नातू रोहन मंकणी याने पुढाकार घेतला आहे.१० मिनिटांच्या लघुपटांमध्ये द. मा. मिरासदार यांचा अकलूजपासून पुण्यापर्यंतचा प्रवास, त्यांचे कथाकथन, आठवणी आदींचा समावेश आहे. त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त प्रसाद मिरासदार यांनी लघुपटाच्या पटकथेचे लेखन केले होते. पुढील ११ वर्षांचा प्रवास, त्यांच्याकडून ऐकलेल्या आठवणी यांचा नव्या पटकथेमध्ये समावेश करण्यात आला आहे, त्यातून आताचे ताजेतवाने दमा रसिकांना अनुभवता येतील, अशी माहिती दमांची कन्या सुनेत्रा मंकणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.द. मा. मिरासदार यांच्या आठवणी, लेखन, कथाकथन, साहित्यिकांच्या, कलाकारांच्या भावना यांचे एकत्रीकरण करून दस्तावेजीकरण करण्यात येत आहे. मंकणी यांच्या स्टुडिओमध्ये दृकश्राव्य एकत्रीकरणाचे काम सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.द. मा. मिरासदार यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त द. मा. मिरासदार प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने मिरासदारी महोत्सवाचा प्रारंभ करण्यातआला. कथाकथन स्पर्धा,शाळांना दमांच्या पुस्तकांची भेट, लेखन स्पर्धा, कथांवर आधारित नाटके, नाट्यवाचन, एकांकिका स्पर्धा आदी विविध उपक्रम राबवण्यात आले.अशा उपक्रमांच्या माध्यमातून या वर्षीपासून कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार भागांमध्ये मिरासदारी महोत्सव आयोजित करून दरवर्षी मुंबईत समारोप करायचा, अशी आखणी करण्यात आली आहे. शासनाचे अनुदान मिळाल्यास महोत्सव व्यापक करण्याचा मानस आहे.