शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पुणे महापालिकेत जे घडलं, ते अपघातानं घडलं; मुख्यमंत्री असलं काम करत नाही- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:52 IST

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे फार काही दिवस टिकणार नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्यात १० मार्चनंतर सत्ताबदल होईल आणि भाजपाचे सरकार येईल, असं विधान केलं होतं. त्यानंतर शनिवारी पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे फार काही दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसेच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीवर सत्ता सोडण्याची वेळ येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

चंद्रकात पाटील यांच्या या विधानानंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी टोला लगावला आहे. 'जोशी भविष्य सांगायचे, पाटील कधीपासून सांगू लागले?' अशा शब्दात छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला होता. त्यावर भुजबळ यांनी मुख्यमंत्री असलं काम करत नाहीत. पुणे महापालिकेत जे घडलं ते अपघातानं घडलं, असं देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे.

सत्तेचा दुरुपयोग चालू आहे- चंद्रकांत पाटील

संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांचा सत्कार करून काल पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार असा आपला सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना