शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लाखो मराठा बांधवांची मुंबईकडे कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 3:34 AM

पुण्यातील मोर्चा अभुतपूर्व यशस्वी करून दाखवल्यानंतर मुंबईतील मोर्चातही यशस्वी कूच करण्याचे मराठा मोर्चा समन्वय समितीने ठरविले आहे. सुमारे एक लाख पुणेकर मोर्चात सहभागी होणार असल्याचा विश्वास मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. कोपर्डी घटनेतील दोषीआरोपींना तत्काळ फाशी द्या, शेतकºयांच्या कर्जमाफीसह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी क्रांतिदिनी सकल ...

पुण्यातील मोर्चा अभुतपूर्व यशस्वी करून दाखवल्यानंतर मुंबईतील मोर्चातही यशस्वी कूच करण्याचे मराठा मोर्चा समन्वय समितीने ठरविले आहे. सुमारे एक लाख पुणेकर मोर्चात सहभागी होणार असल्याचा विश्वास मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. कोपर्डी घटनेतील दोषीआरोपींना तत्काळ फाशी द्या, शेतकºयांच्या कर्जमाफीसह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी क्रांतिदिनी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, वेल्हा, मुळशी व पुरंदरमधील बहुतांश लोक मुंबईतच रोजगारानिमित्त स्थयिक आहेत. ते मराठा बांधवांची व्यवस्था करीत आहेत. मंगळवारी सकाळीही अनेक लोक रेल्वेने रवाना झालेआहेत. दिवसभरात मुंबईकडे जाणाºयांचा ओघ सुरूच होता. बुधवारी सकाळी डेक्कन क्वीन, सह्याद्री, प्रगती एक्सप्रेसने मोर्र्चेकरी मुंबईत रवाना होणार असल्याचे कुंजीर यांनी सांगितले. सहभागी सर्वांनी मोर्चाची आचारसंहिता काटेकोरपणे पाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.मार्गावर ठिकठिकाणी खानपानाची व्यवस्थासातारा, सोलापूर, नगर रस्त्याने मुंबईकडे जाणाºया समाजबांधवांसाठी मार्गात ठिकठिकाणी चहा, नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक ग्रामस्थ, मराठा संघटना, सामाजिक संघटनांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव याभागातून येणाºयांसाठी भोरच्या अलीकडे आराम हॉटेल येथे, सोलापूर मार्गावर हडपसरमध्ये, एक्स्प्रेसवेपूर्वी समीर लॉन्स येथे तर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कार्ले, वडगाव मावळ व देहूरोड या ठिकाणी ही व्यवस्था असेल.1 पुणे, सोलापूर या भागातून जाणाºया वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था खारघर येथे करण्यात आली आहे. तसेच याभागातील सेंट्रल पार्क, सरस्वती कॉलेज, लिटील वर्ल्ड मॉलमागे सुमारे १० हजार वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच इस्टर्न फ्रीवेवरील बीपीटी मैदानावरही पार्किंग केली जाणार आहे.2मोर्चाच्या मुंबईतील नियोजनासाठी २५ हजार स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून त्यातील अडीच हजार स्वयंसेवक जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात दहा हजार झेंडे, पाच हजार बॅनर, विविध मागण्यांचे तीन हजार फलक, ३ लाखांहून अधिक स्टीकर्स, पाच लाख पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे.मंचर शहरातून रॅलीमंचर : सकल मराठा समाजाच्या वतीने मंचर शहरातून आज दुचाकी रॅली काढण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुचाकीला भगवे झेंडे बांधून व टी-शर्ट, डोक्यावर टोपी घालून तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दत्ता थोरात, शरदराव पोखरकर, अ‍ॅड. सुनील बांगर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सांगता कार्यक्रमात पुणे जिल्हा समन्वयक शरद पोखरकर, वसंतराव बाणखेले, सुनील बांगर, श्रद्धा खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिरूरमुंबई येथे उद्या (दि. ९) आयोजित मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी शहर व तालुक्यातून ५०० हून अधिक वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. यात प्रत्येक गावातून युवक, तरुण व प्रौढ मराठा बांधवांनी गावनिहाय नियोजन केले आहे.हवेलीतालुक्यातून ८ हजार मराठा बांधव मुंबई येथे जाणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड यांनी दिली. हवेली तालुक्याला महामार्ग किंवा रेल्वेने मुंबईजवळ असल्याने हवेलीतून जास्त कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत.जुन्नरतालुक्यातून २५ हजार मराठा बांधव सामील होणार आहेत़ या मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्यासाठी रवाना झालेले असून महिलांचादेखील समावेश असणार आहे, अशी माहिती मराठा क्रांतीचे जिल्हा समन्वयक रमेश हांडे यांनी दिली़ जुन्नरतालुक्यातून सुमारे १५० ते २०० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.बारामतीशहर, तालुक्यातुन जवळपास २५ हजार मराठा समाजबांधव निघाले आहेत. रेल्वे, एसटी बससह खासगी वाहनांनी सर्वजण रवाना झाले आहेत. ५०० बस, चारचाकी वाहनांंमधुन, ७०० दुचाकीवर मुंबईच्या दिशेने सर्वजण मंगळवारी सायंकाळी रवाना झाले आहेत.खेडतालुक्यातुन मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी बुधवार (दि.९ ) रोजी खेड, आळंदी, चाकण या शहरातून पाच हजार नागरिक जाणार आहेत. मोचार्साठी जाणा-या नागरिकांसाठी पहाटे ४ वाजता एसटी बसेस ठेवण्यात आल्या असल्याची माहिती अमित कुमार टाकळकर यांनी दिली.दौंडतालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना होणार असल्याची माहिती दौंड तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष दादासाहेब नांदखिले, शहराध्यक्ष उमेश वीर आणि जिल्हा संघटक विक्रम पवार यांनी माहिती दिली. साधारणत: बहुतांशी कार्यकर्ते पहाटेपासूनच रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर खाजगी वाहनांचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार १८ मोठ्या लक्झरी, पाचशेच्या जवळपास छोट्या चारचाकी गाड्या अशी वाहनांची संख्या आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा