शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 7:16 AM

महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, टँकरला नसलेली जीपीएस यंत्रणा, पाणी भरणा केंद्रांवर बंद अवस्थेतील मीटर यामुळे शहरामध्ये रोज लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची चोरी होत

सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, टँकरला नसलेली जीपीएस यंत्रणा, पाणी भरणा केंद्रांवर बंद अवस्थेतील मीटर यामुळे शहरामध्ये रोज लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आले आहे.शहरामध्ये सध्या महापालिकेच्या टँकर पाणी भरणा केंद्रांवर दररोज दहा हजार लिटरचे तब्बल ५०० ते ५५० टँकर अधिकृतपणे भरले जातात. यासाठी विविध दहा ठिकाणी हे टँकर भरणा केंद्र उभारण्यात आली आहेत. एप्रिल-मे महिन्यात महिन्याला तब्बल १६ ते १७ हजार टँकर पाणी महापालिकेच्या केंद्रांवरून दिले जाते. यामध्ये महापालिकेचे टँकर, टेंडरचे टँकर आणि खासगी पासधारक टँकरचा समावेश असतो; परंतु प्रत्येक केंद्रावर नक्की किती टँकर भरले जातात, टँकर ज्या भागासाठी पाणी देणे अपेक्षित आहे तिथेच दिलेजातात का, आदी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.पाण्याची चोरी आणि काळाबाजार रोखण्यासाठी महापालिकेसह खासगी टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे; परंतु याकडे प्रशासन व ठेकेदारांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.सध्या शहरामध्ये दररोज ५०० ते ५५० टँकरद्वारे शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा करण्यात येता; परंतु यापैकी केवळ शंभर टँकरलाच जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. याचा कोणताही ‘डाटा’ महापालिकेकडे नाही. त्यामुळे बसवलेली जीपीएस यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर दहा टँकर पाणी भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला.मीटर बंदचा झोल पाणीचोरीला पोषकपर्वती येथील टँकर पाणी भरणा केंद्रावरील पाणी मीटर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. असे असतानादेखील येथे अविरत टँकर भरण्याचे काम सुरूच आहे. एप्रिल-मे महिन्यात टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने या मीटरची दुरुस्ती केली जाईल किंवा मीटर दुरुस्त होईपर्यंत येथील केंद्रावर टँकर भरण्यास बंदी घालण्यात येईल, अशी अपेक्षा होती; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याचा मीटर बंद असून, पाणी भरण्याचे काम सुरूच आहे; तर सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे, पर्वती येथीलच टँकर पॉइंट १, २ व ३ वरील मीटर हवे तेव्हा चालू व बंद करता येत असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. याचाच अर्थ असा की, हे मीटर फक्त शोभेचे असून, हवे तेव्हा चालू व बंद करण्याची सोय असल्यामुळे अनधिकृतपणे टँकर भरले जात असताना, हे मीटर बंद ठेवणे सहज शक्य आहे.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंचजीपीएस यंत्रणेची माहिती गोळा करणे कठीणमहापालिकेच्या टँकर पाणी भरणा केंद्रांवर दररोज ५०० ते ५५० टँकरमध्ये पाणी भरले जाते.यापैकी केवळ शंभर टँकरलाजीपीएस यंत्रणा बसविण्यात आलीआहे; परंतु या जीपीएस यंत्रणा खासगी स्वरूपात व वेगवेगळ्या ठिकाणी कार्यान्वित असल्याने याचा डाटा गोळा करणे कठीण असते; परंतु लवकरच महापालिकेच्या वतीने सर्व टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.-व्ही. जी. कुलकर्णी,मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग