महिन्याला सव्वा कोटीचे पाणी
By Admin | Updated: June 3, 2015 04:51 IST2015-06-03T04:51:16+5:302015-06-03T04:51:16+5:30
महापालिकेच्या जुनाट पाणी वितरण व्यवस्थेमुळे होणारी ४० टक्के पाण्याची गळती, शहराची अनियंत्रित व नियोजनाचा अभाव असलेली वाढ, अनधिकृत नळजोडांची भरमार

महिन्याला सव्वा कोटीचे पाणी
सुनील राऊत, पुणे
महापालिकेच्या जुनाट पाणी वितरण व्यवस्थेमुळे होणारी ४० टक्के पाण्याची गळती, शहराची अनियंत्रित व नियोजनाचा अभाव
असलेली वाढ, अनधिकृत नळजोडांची भरमार आणि महापालिकेच्या नाकाखाली होणारी पिण्याच्या पाण्याची राजरोस चोरी यामुळे शहराच्या उशाला असलेली चार धरणे भरूनही गेल्या ८ महिन्यांत पुणेकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल १० कोटी रुपये मोजले असल्याचे समोर आले आहे. एप्रिल २०१४ ते ३१ मे २०१५ अखेर शहरात तब्बल १ लाख ८८ हजार टँकरच्या फेऱ्या झालेल्या आहेत.
शहराचा आकार कपबशीसारखा असल्याने महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेत अनेक अडचणी आहेत. त्यातच शहराची वाढ होताना, या वितरण व्यवस्थेबाबत विशेष खबरदारी न घेण्यात आल्याने शहराच्या अनेक भागांत कमी-अधिक दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अर्ध्या शहरास अवघे काही तास, तर अर्ध्या शहरास २४ तास पाणी मिळते. परिणामी कमी दाबाने पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांना वर्षभर पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
भर पावसाळ्यातही शहरात दरमहा ११ ते १२ हजार टँकरची पिण्याची पाण्याची मागणी असते. शहराच्या उशाला खडकवासला प्रकल्पांतर्गत चार धरणे आहेत. या चार धरणांची पाणीसाठवण क्षमता तब्बल ३0 टीएमसी असून, त्यातील जवळपास १६ टीएमसी पाणी पुणे शहरास पिण्यासाठी दिले जाते. मात्र, या पाण्याच्या वितरणाचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतो.