शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

‘मसाप’ कार्यकारिणीची मध्यावधी निवडणूक अशक्य; ठराव मंजूर करून कार्यकारिणीला मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 14:05 IST

आजीव सभासद देणे बंद केले आहे का?...

पुणे : ‘सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर आरोप झाले आहेत. पण त्याला काही अर्थ नाही. आताची जी कार्यकारिणी आहे तिची मुदत २०२१ मध्ये संपली. त्यानंतर कोरोनामुळे त्या कार्यकारिणीला मुदतवाढ दिली. तेव्हा घटनेनुसार टर्म पूर्ण करणे आवश्यक असते. सर्वानुमते ठराव झाला आहे की, कार्यकारिणी ही टर्म पूर्ण करेल. त्यामुळे आता निवडणूका घ्या, म्हणण्याला अर्थ नाही. घटनेनुसार मध्यावधी निवडणुका घेता येणार नाहीत, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी सांगितले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक २०२१ साली होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनाजन्य परिस्थितीचा आधार घेत त्यावेळच्या कार्यकारिणीने वार्षिक सर्वसाधारण बैठक बोलावली. त्या बैठकीत प्रा. मिलिंद जोशी यांच्या २०१६ ते २०२१ या कालावधीत पदावर असलेल्या कार्यकारिणीने कोरोनाचे सावट असल्यामुळे निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे सांगितले. कोरोनाकाळात परिषदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे आमचा कालावधी वाया गेला. त्यामुळेच आमच्या कार्यकारिणीला पाच वर्षांची मुदतवाढ द्यावी असा ठराव तेव्हा मांडला गेला. घटनेनुसार तो ठराव मंजूर झाल्याचे कसबे यांनी सांगितले आहे. परंतु, मसापचे आजीव सदस्य विजय शेंडगे यांच्यानुसार हे घटनाबाह्य असून, निवडणुका घेतल्या जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.

आजीव सभासद देणे बंद केले आहे का?

यावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,‘मसापमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चांगले बदल झाले आहेत. माधवराव सभागृहाचे नूतनीकरण झाले. सर्व गोष्टी चांगल्या होत असताना काहीजण केवळ स्वार्थासाठी आरोप करत आहेत. आम्ही आजीव सभासद करणे थांबविलेले नाही. त्यासाठी कार्यकारिणी निर्णय घेईल. कारण आजीव सभासद लगेच देता येत नाही.’

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडliteratureसाहित्य