शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

‘मसाप’ कार्यकारिणीची मध्यावधी निवडणूक अशक्य; ठराव मंजूर करून कार्यकारिणीला मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 14:05 IST

आजीव सभासद देणे बंद केले आहे का?...

पुणे : ‘सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर आरोप झाले आहेत. पण त्याला काही अर्थ नाही. आताची जी कार्यकारिणी आहे तिची मुदत २०२१ मध्ये संपली. त्यानंतर कोरोनामुळे त्या कार्यकारिणीला मुदतवाढ दिली. तेव्हा घटनेनुसार टर्म पूर्ण करणे आवश्यक असते. सर्वानुमते ठराव झाला आहे की, कार्यकारिणी ही टर्म पूर्ण करेल. त्यामुळे आता निवडणूका घ्या, म्हणण्याला अर्थ नाही. घटनेनुसार मध्यावधी निवडणुका घेता येणार नाहीत, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी सांगितले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक २०२१ साली होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनाजन्य परिस्थितीचा आधार घेत त्यावेळच्या कार्यकारिणीने वार्षिक सर्वसाधारण बैठक बोलावली. त्या बैठकीत प्रा. मिलिंद जोशी यांच्या २०१६ ते २०२१ या कालावधीत पदावर असलेल्या कार्यकारिणीने कोरोनाचे सावट असल्यामुळे निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे सांगितले. कोरोनाकाळात परिषदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे आमचा कालावधी वाया गेला. त्यामुळेच आमच्या कार्यकारिणीला पाच वर्षांची मुदतवाढ द्यावी असा ठराव तेव्हा मांडला गेला. घटनेनुसार तो ठराव मंजूर झाल्याचे कसबे यांनी सांगितले आहे. परंतु, मसापचे आजीव सदस्य विजय शेंडगे यांच्यानुसार हे घटनाबाह्य असून, निवडणुका घेतल्या जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.

आजीव सभासद देणे बंद केले आहे का?

यावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,‘मसापमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चांगले बदल झाले आहेत. माधवराव सभागृहाचे नूतनीकरण झाले. सर्व गोष्टी चांगल्या होत असताना काहीजण केवळ स्वार्थासाठी आरोप करत आहेत. आम्ही आजीव सभासद करणे थांबविलेले नाही. त्यासाठी कार्यकारिणी निर्णय घेईल. कारण आजीव सभासद लगेच देता येत नाही.’

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडliteratureसाहित्य