शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

Pune: मेट्रो असताना परत टेकडीवर घाव कशासाठी? काँग्रेसचाही बालभारती-पौड रस्त्याला विरोध

By राजू इनामदार | Updated: April 6, 2023 17:29 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणेकरांच्या विरोधात भूमिका घेत आहेत असे काँग्रेसचे म्हणणे आहे...

पुणे : कोथरूड व परिसरासाठी आता मेट्रो तयार होत असताना पुन्हा वाहतूकीचा प्रश्न उग्र झाल्याचे कारण देत वेताळ टेकडीवर घाव घालण्यामागे भारतीय जनता पक्षाचा मोठा डाव आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. बालभारती पौड रस्ता करण्याच्या आग्रहामागे राज्य सरकारमधील बडी हस्ती असून त्याच्या आग्रहापोटीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणेकरांच्या विरोधात भूमिका घेत आहेत असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की, या विषयात काँग्रेस निसर्ग प्रेमींबरोबर आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, कोंडी टळावी यासाठीच शहरात मेट्रोचे काम सुरू करण्यात आले. कोथरूड परिसरात मेट्रोचा डेपो आहे. वनाज ते गरवारे या मार्गावर मेट्रोची ५ स्थानके आहेत. कोथरूड भागातील नागरिकांना या स्थानकांमध्ये पोहचता यावे यासाठी कनेक्टीव्हिटी तयार करण्यात येत आहे. या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत महामेट्रोला खडसावण्याचे सोडून सत्ताधारी वाहतूक कोंडीचेच कारण देत आता वेताळ टेकडीचा घास घ्यायला निघाले आहेत. हे नियोजन व कल्पनाशुन्यतेचे उदाहरण आहे, मात्र तरीही ते केले जाते यामागे भाजपची बडी हस्तीच आहे.

वेताळ टेकडीवरील पर्यावरण, पक्ष्यांचा अधिवास यांना धक्का पोहचवणारा हा प्रस्तावित रस्ता झाला तर अशी कोणती वाहतूक कोंडी सूटणार आहे हे पालकमंत्ऱ्यांनी पुणेकर नागरिकांना जाहीरपणे समजावून सांगावे, त्यांची तर विरोधकांबरोबर साधी चर्चा करण्याचीही तयारी नाही अशी टीका जोशी यांनी केली. त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या रस्त्याच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत, पर्यावरणप्रेमी नागरिकांबरोबर चर्चा करत आहेत, बैठका घेत आहेत व त्याचवेळी पालकमंत्री पाटील मात्र रस्त्याच्या कामाची निविदा काढण्याची मागणी करत आहे हा काय प्रकार आहे असे जोशी म्हणाले. पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून वेताळ टेकडी वाचवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेस