शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Pune: मेट्रो असताना परत टेकडीवर घाव कशासाठी? काँग्रेसचाही बालभारती-पौड रस्त्याला विरोध

By राजू इनामदार | Updated: April 6, 2023 17:29 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणेकरांच्या विरोधात भूमिका घेत आहेत असे काँग्रेसचे म्हणणे आहे...

पुणे : कोथरूड व परिसरासाठी आता मेट्रो तयार होत असताना पुन्हा वाहतूकीचा प्रश्न उग्र झाल्याचे कारण देत वेताळ टेकडीवर घाव घालण्यामागे भारतीय जनता पक्षाचा मोठा डाव आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. बालभारती पौड रस्ता करण्याच्या आग्रहामागे राज्य सरकारमधील बडी हस्ती असून त्याच्या आग्रहापोटीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणेकरांच्या विरोधात भूमिका घेत आहेत असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की, या विषयात काँग्रेस निसर्ग प्रेमींबरोबर आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, कोंडी टळावी यासाठीच शहरात मेट्रोचे काम सुरू करण्यात आले. कोथरूड परिसरात मेट्रोचा डेपो आहे. वनाज ते गरवारे या मार्गावर मेट्रोची ५ स्थानके आहेत. कोथरूड भागातील नागरिकांना या स्थानकांमध्ये पोहचता यावे यासाठी कनेक्टीव्हिटी तयार करण्यात येत आहे. या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत महामेट्रोला खडसावण्याचे सोडून सत्ताधारी वाहतूक कोंडीचेच कारण देत आता वेताळ टेकडीचा घास घ्यायला निघाले आहेत. हे नियोजन व कल्पनाशुन्यतेचे उदाहरण आहे, मात्र तरीही ते केले जाते यामागे भाजपची बडी हस्तीच आहे.

वेताळ टेकडीवरील पर्यावरण, पक्ष्यांचा अधिवास यांना धक्का पोहचवणारा हा प्रस्तावित रस्ता झाला तर अशी कोणती वाहतूक कोंडी सूटणार आहे हे पालकमंत्ऱ्यांनी पुणेकर नागरिकांना जाहीरपणे समजावून सांगावे, त्यांची तर विरोधकांबरोबर साधी चर्चा करण्याचीही तयारी नाही अशी टीका जोशी यांनी केली. त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या रस्त्याच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत, पर्यावरणप्रेमी नागरिकांबरोबर चर्चा करत आहेत, बैठका घेत आहेत व त्याचवेळी पालकमंत्री पाटील मात्र रस्त्याच्या कामाची निविदा काढण्याची मागणी करत आहे हा काय प्रकार आहे असे जोशी म्हणाले. पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून वेताळ टेकडी वाचवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेस