शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 15:02 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी

पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी आहेत. चार कुटुंबातील किमान एकाला मानसिक आजार असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच दिला आहे. वाढते ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, कुटुंबव्यवस्थेतील बदल आदी कारणांमुळे मानसिक तणाव वाढत आहेत. याकडे मानसोपचारतज्ज्ञांनी लक्ष वेधले असून, मानसिक आजारांबाबत गैरसमज नकाेत, असे सांगण्यात येत आहे.

कोणत्याही मानसिक आजाराची सुरुवात चिडचिडेपणा, नैराश्य, वागण्यात आणि बोलण्यात फरक यातून येते. सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न असतातच; परंतु ते एका मर्यादेच्या पलीकडे जात असतील, त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मानले जाते. केवळ भारतातच नव्हे, तर देशभरात मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. मानसिक आजारांबद्दल समाजात प्रचंड गैरसमज पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला मानसिक आजार असू शकतो, हेच मान्य करायला आपण धजावतो.

समुपदेशक, मनोविकारतज्ज्ञांकडे जाणे म्हणजे वेड लागलेले असणे, ही समजूत काढून टाकणे गरजेचे आहे. मानसिक आजारांसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर ते ‘शॉक’ देतात, अशा पध्दतीचे गैरसमज अजूनही पाहायला मिळतात. मानसिक आजारांमध्ये कोणतीही उपचारपद्धती सरसकट वापरली जात नाही. समुपदेशन आणि उपचारपध्दती यांच्या एकत्रिकरणातून उपचारांची दिशा ठरवली जाते.

- राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आकडेवारीनुसार सहा ते सात टक्के लोक मानसिक आजारी आहेत.- जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात चार कुटुंबांतील किमान एकजण म्हणजे २० पैकी एकाला मानसिक आजार असल्याचे नमूद केले आहे.

व्यक्तींशी संवाद साधणे, बोलत राहणे हा रामबाण उपाय

नैराश्य, अस्वस्थता, वास्तवाचे भान सुटणे, चिडचिडेपणा, वागण्याची पद्धत बदलणे, भीती वाटणे, बोलणे अचानक कमी होणे किंवा वाढणे, आत्महत्येचे विचार मनात येणे, अशी विविध लक्षणे मानसिक आजारांच्या सुरुवातीला दिसून येतात. लहान मुले, तरुण, प्रौढ व्यक्ती अशा कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसू शकतात. काही लक्षणे सातत्याने दिसत असल्यास आणि अनपेक्षित त्रास होत असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. समुपदेशन, औषधोपचार आणि प्ले थेरपी, म्युझिक थेरपी, ॲनिमल थेरपी यांची जोड देऊन उपचार केले जातात. जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे, बोलत राहणे हा रामबाण उपाय ठरू शकतो असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी यांनी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक