शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
3
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
4
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
5
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
6
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
8
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
9
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
10
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
11
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
12
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
13
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
14
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
15
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
16
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
17
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
18
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
19
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
20
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 15:02 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी

पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी आहेत. चार कुटुंबातील किमान एकाला मानसिक आजार असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच दिला आहे. वाढते ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, कुटुंबव्यवस्थेतील बदल आदी कारणांमुळे मानसिक तणाव वाढत आहेत. याकडे मानसोपचारतज्ज्ञांनी लक्ष वेधले असून, मानसिक आजारांबाबत गैरसमज नकाेत, असे सांगण्यात येत आहे.

कोणत्याही मानसिक आजाराची सुरुवात चिडचिडेपणा, नैराश्य, वागण्यात आणि बोलण्यात फरक यातून येते. सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न असतातच; परंतु ते एका मर्यादेच्या पलीकडे जात असतील, त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मानले जाते. केवळ भारतातच नव्हे, तर देशभरात मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. मानसिक आजारांबद्दल समाजात प्रचंड गैरसमज पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला मानसिक आजार असू शकतो, हेच मान्य करायला आपण धजावतो.

समुपदेशक, मनोविकारतज्ज्ञांकडे जाणे म्हणजे वेड लागलेले असणे, ही समजूत काढून टाकणे गरजेचे आहे. मानसिक आजारांसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर ते ‘शॉक’ देतात, अशा पध्दतीचे गैरसमज अजूनही पाहायला मिळतात. मानसिक आजारांमध्ये कोणतीही उपचारपद्धती सरसकट वापरली जात नाही. समुपदेशन आणि उपचारपध्दती यांच्या एकत्रिकरणातून उपचारांची दिशा ठरवली जाते.

- राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आकडेवारीनुसार सहा ते सात टक्के लोक मानसिक आजारी आहेत.- जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात चार कुटुंबांतील किमान एकजण म्हणजे २० पैकी एकाला मानसिक आजार असल्याचे नमूद केले आहे.

व्यक्तींशी संवाद साधणे, बोलत राहणे हा रामबाण उपाय

नैराश्य, अस्वस्थता, वास्तवाचे भान सुटणे, चिडचिडेपणा, वागण्याची पद्धत बदलणे, भीती वाटणे, बोलणे अचानक कमी होणे किंवा वाढणे, आत्महत्येचे विचार मनात येणे, अशी विविध लक्षणे मानसिक आजारांच्या सुरुवातीला दिसून येतात. लहान मुले, तरुण, प्रौढ व्यक्ती अशा कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसू शकतात. काही लक्षणे सातत्याने दिसत असल्यास आणि अनपेक्षित त्रास होत असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. समुपदेशन, औषधोपचार आणि प्ले थेरपी, म्युझिक थेरपी, ॲनिमल थेरपी यांची जोड देऊन उपचार केले जातात. जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे, बोलत राहणे हा रामबाण उपाय ठरू शकतो असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी यांनी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक