शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 15:02 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी

पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी आहेत. चार कुटुंबातील किमान एकाला मानसिक आजार असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच दिला आहे. वाढते ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, कुटुंबव्यवस्थेतील बदल आदी कारणांमुळे मानसिक तणाव वाढत आहेत. याकडे मानसोपचारतज्ज्ञांनी लक्ष वेधले असून, मानसिक आजारांबाबत गैरसमज नकाेत, असे सांगण्यात येत आहे.

कोणत्याही मानसिक आजाराची सुरुवात चिडचिडेपणा, नैराश्य, वागण्यात आणि बोलण्यात फरक यातून येते. सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न असतातच; परंतु ते एका मर्यादेच्या पलीकडे जात असतील, त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मानले जाते. केवळ भारतातच नव्हे, तर देशभरात मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. मानसिक आजारांबद्दल समाजात प्रचंड गैरसमज पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला मानसिक आजार असू शकतो, हेच मान्य करायला आपण धजावतो.

समुपदेशक, मनोविकारतज्ज्ञांकडे जाणे म्हणजे वेड लागलेले असणे, ही समजूत काढून टाकणे गरजेचे आहे. मानसिक आजारांसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर ते ‘शॉक’ देतात, अशा पध्दतीचे गैरसमज अजूनही पाहायला मिळतात. मानसिक आजारांमध्ये कोणतीही उपचारपद्धती सरसकट वापरली जात नाही. समुपदेशन आणि उपचारपध्दती यांच्या एकत्रिकरणातून उपचारांची दिशा ठरवली जाते.

- राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आकडेवारीनुसार सहा ते सात टक्के लोक मानसिक आजारी आहेत.- जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात चार कुटुंबांतील किमान एकजण म्हणजे २० पैकी एकाला मानसिक आजार असल्याचे नमूद केले आहे.

व्यक्तींशी संवाद साधणे, बोलत राहणे हा रामबाण उपाय

नैराश्य, अस्वस्थता, वास्तवाचे भान सुटणे, चिडचिडेपणा, वागण्याची पद्धत बदलणे, भीती वाटणे, बोलणे अचानक कमी होणे किंवा वाढणे, आत्महत्येचे विचार मनात येणे, अशी विविध लक्षणे मानसिक आजारांच्या सुरुवातीला दिसून येतात. लहान मुले, तरुण, प्रौढ व्यक्ती अशा कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसू शकतात. काही लक्षणे सातत्याने दिसत असल्यास आणि अनपेक्षित त्रास होत असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. समुपदेशन, औषधोपचार आणि प्ले थेरपी, म्युझिक थेरपी, ॲनिमल थेरपी यांची जोड देऊन उपचार केले जातात. जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे, बोलत राहणे हा रामबाण उपाय ठरू शकतो असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी यांनी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक