शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

आठवणी पानशेत पुराच्या ! तो भयंकर दिवस आणि उध्वस्त शहर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:26 IST

पानशेत धरण फुटून झालेल्या अपरिमित हानीला आज ६७वर्षे उलटली आहेत. पण अजूनही तो भयंकर दिवस आणि त्या काळरात्रीच्या आठवणी अनेक पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात.

पुणे : पानशेत धरण फुटून झालेल्या अपरिमित हानीला आज ६७वर्षे उलटली आहेत. पण अजूनही तो भयंकर दिवस आणि त्या काळरात्रीच्या आठवणी अनेक पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात.१२ जुलै, १९६१ला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते.आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहरात होता तो अंधार, चिखल आणि उध्वस्त झालेल्या संसाराचे उरलेले अवशेष.या प्रलयातून पुणेकर सावरले पण त्याच्या आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत. 

        निर्मला केळकर म्हणाल्या की, मी १२ तारखेला पुण्यात नव्हते पण १४ तारखेला आले तेव्हा मात्र धक्का बसला.जे शहर आम्ही बघितले होते त्याचा लवलेशही शिल्लक नव्हता.आम्ही डेक्कन जिमखान्यावर माडीवर राहत होतो. त्यामुळे अनेक कुटूंबांनी आमच्या घरात आसरा घेतला होता.बाहेर तर फक्त चिखल आणि पाणीच दिसत होतं. जवळपास सात ते आठ दिवस आमच्याकडे अनेक जण राहायला होते.

       आनंद सराफ म्हणाले की, पूर आला तेव्हा आम्ही लहान होतो. ही बातमी समजल्यावर माझे आजोबा तातडीने पुण्याला आले. मंडईतल्या आमच्या घरच्या घरी सर्व नातवंडांना घेऊन त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिलेली आठवण अजूनही आठवतेय. पुण्याचा चेहरामोहरा या घटनेने बदलून गेला होता. पूर्वी शहराबाहेर असणारी पर्वती शहराच्या केंद्रस्थानी आली.

  शशीधर भावे म्हणाले की, त्याकाळी लकडी पुलाला पाणी येणे यात काही नावीन्य नव्हते. पण त्या दिवशी छातीपर्यंत पाणी वाढले आणि हे काहीतरी वेगळे असल्याचे जाणीव आम्हाला झाली.बघता बघता आमचे दुमजली घर या पुरात कोसळले.आमच्या लॉन्ड्रीच्या मशीन तर ओंकारेश्वरपासून वाहत वाहत काँग्रेस भवनपर्यंत गेल्या होत्या. ते सारे रुळावर येईपर्यंत मोठा कालावधी गेला पण आज इतक्या वर्षांनंतरही तो दिवस विसरणे कठीण आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊस