शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

‘मृत्युंजय’कारांचे स्मृतिदालन, नियोजन समितीमधून ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 12:46 AM

जन्मगावी साकारणार : नियोजन समितीमधून ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद

पुणे : ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या जन्मगावी आजरा (जि. कोल्हापूर) येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने स्मृतिदालन उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.

‘मृत्युंजय’कार सावंत हे काही काळ शॉर्टहँडचे शिक्षक जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलमध्ये कार्यरत होते. त्यांची आणि आजरा परिसरातील अन्य नामवंतांची स्मृती अत्यंत अभिनव स्वरूपात जपली जावी, यासाठी निर्धार प्रतिष्ठानचे समीर देशपांडे आणि पुणे येथील मृत्युंजय प्रतिष्ठानचे डॉ. सागर देशपांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. सावंत यांच्यासारख्या एका प्रतिभावंत साहित्यिकाच्या जन्मगावी हे स्मृतिदालन होत असल्याबद्दल त्यांची पत्नी मृणालिनी सावंत आणि कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘युगंधर’ अशा महाकादंबऱ्या लिहून मराठी साहित्यविश्वात आपल्या विलक्षण प्रतिभेमुळे पदार्पणातच ख्यातकीर्त झालेल्या सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या साहित्यकृतीची १९९० मध्ये साहित्याच्या ‘नोबेल’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्कारासह देशभरातील अनेक नामवंत संस्थांनी पुरस्कार देऊन सावंत यांना सन्मानित केलेहोते.

कराड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवित असताना १८ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचे गोव्यात अकाली निधन झाले. आचार्य अत्रे यांच्यापासून ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत लक्षावधी साहित्यप्रेमींनी गौरविलेल्या ‘मृत्युंजय’कारांची स्मृती त्यांच्या जन्मगावी कायमस्वरूपी जतन व्हावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते.सुमारे २५० आसनक्षमता असणार१ कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही जिल्हा परिषदेने सादर केलेल्या या स्मृतिदालनाच्या प्रस्तावाचे कौतुक केले आणि तातडीने ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जि. परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली आहे.२ सुमारे २५० आसनक्षमतेचे सभागृह आणि सावंत यांचा जीवनप्रवास विशद करणारी छायाचित्रे, पुस्तके, सन्मानचिन्हे अशा स्वरूपात हे स्मृतिदालन साकारले जाणार आहे. या स्मृतिदालनासाठी सर्वतोपरी सहयोग देण्याचे आश्वासन त्यांच्या कुटुंबीयांनी दिले असल्याचे डॉ. सागर देशपांडे यांनी सांगितले.‘व्यावसायिकांसाठी २१ महत्त्वाचे कायदे’ पुस्तकाचे प्रकाशनपुणे : व्यावसायिकांना कायद्याची माहिती व्हावी, यासाठी सल्लागार हेमंत देशपांडे यांनी ‘व्यावसायिकांसाठी २१ महत्त्वाचे कायदे’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. मराठा चेंबर येथे या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रशेखर चितळे, अ‍ॅड. गौरी भावे, अमर देशमुख, नंदकुमार देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले. चंद्रशेखर चितळे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात नफ्याचे प्रमाण कमी होत चालले आहे, अशावेळी कायद्याच्या माहिती अभावी होणारा दंड, नुकसान टाळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अ‍ॅड. गौरी भावे म्हणाल्या, आपल्या समस्येविषयी कोणत्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, याबाबत व्यावसायिकांना पुस्तकातून नक्कीच मार्गदर्शन मिळेल.

टॅग्स :Puneपुणे