शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

आव्हानांना सामोरे जा....'' लोकमत वुमेन समीट २०१९ '' परिसंवादातील सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 11:30 IST

आज महिला आपणहून पुढे येत सारथ्याची भूमिका पार पाडत आहेत...

ठळक मुद्दे  ‘अग्निपंख’ या विषयावर आधारित परिसंवादात त्यांनी महिलांना मार्गदर्शनस्वाती मुजुमदार आणि रूपाली देशमुख यांनी दिला महिलांना यशस्वितेचा मूलमंत्र

पुणे : स्त्री-पुरूष भेद ही केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील समस्या आहे. आज असं कोणतेही क्षेत्र नाही जिथं महिला स्वत:ला सिद्ध करू शकत नाहीत. त्यामुळं आपलं शिक्षण थांबवू नका आणि आव्हानांना सामोर जा....लक्षात घ्या एक दिवस यश तुमच्या हातात आहे.....अशा शब्दांत ‘लिव्ह टू लीड’ संकल्पनेवर आधारित ‘ लोकमत वुमेन समीट २०१९ ’’ परिषदेत सिंबायोसिसच्या संचालक डॉ. स्वाती मुजुमदार आणि जल व शाश्वत विकास तज्ञ (स्वीडन) रूपाली देशमुख यांनी महिलांना यशस्वीततेचा मूलमंत्र दिला. आनंदीबाई जोशी यांनी शिक्षणाचे ’अग्निपंख’ घेऊन देशातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला. आज महिला आपणहून पुढे येत सारथ्याची भूमिका पार पाडत आहेत. डॉ. स्वाती मुजुमदार आणि रूपाली देशमुख ही दोन त्याची प्रातिनिधिक उदाहरण आहेत. डॉ. स्वाती मुजुमदार यांनी अनेक वर्षे कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांमध्ये संशोधन करून भारतात  ‘कौशल्य विद्यापीठ’ विकसित करण्याच्या दृष्टीने मॉडेल विकसित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिली सिंबायोसिस कौशल्य आणि अभिमत विद्यापीठ’ सुरू करण्यात आले. तर रूपाली देशमुख यांनी जल आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परिषदेअंतर्गत झालेल्या  ‘अग्निपंख’ या विषयावर आधारित परिसंवादात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन उपयोग नाही तर त्यांच्यात कौशल्य विकसित करून स्वत:च्या पायावर उभं करण्याची खरी गरज आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती होण्याची आवश्यकता आहे. ज्या महिला बिकट परिस्थितीमुळे  दहावीपर्यंत देखील शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना शिक्षण दिले गेले पाहिजे. यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. रूपाली देशमुख म्हणाल्या, आज जगभरामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणी प्रश्न हा मुख्यत: महिलांशी निगडित आहे. त्यामुळे भारतात पाण्यासंबंधी कोणतही धोरण राबविताना त्यात महिलांचा सहभाग असणं आवश्यक आहे. त्यांचे मत विचारात घेतलं पाहिजे. आपल्याकडे जल आणि शाश्वत विकासाबाबत जनजागरूकता नाही. पाण्याचा किती वापर होतो त्याचा अभ्यास झाला पाहिजे.

परिसंवादाचे सूत्रसंचालन लीना सरढाणा-जोशी यांनी केले.

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीटPuneपुणेLokmat Eventलोकमत इव्हेंटWomenमहिला