शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गेल्या वेळ सारखी परिस्थीती येऊ देऊ नका महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रशासनाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 21:08 IST

मॉन्सून पूर्व कामांचा आढावा

शहरात गेल्या तीन वर्षांतील पावसाची स्थिती लक्षात घेता कमी वेळात अधिक पाऊस असे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मान्सून पूर्व कामे वेगाने सुरु असून त्यामध्ये सद्यस्थितीला समाधानकारक काम केले आहेत. तसेच उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करा, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत', अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. शिवाय गेल्या दोन वर्षांसारखी परिस्थिती उद्धभू देऊ नका, असे स्पष्ट आदेशही महापौर मोहोळ यांनी दिले आहेत.

शहरातील मान्सून पूर्व कामांचा आढावा महापौर मोहोळ यांनी प्रशासनाकडून घेत विविध सूचनाही दिल्या आहेत. या आढावा बैठकीला उपमहापौर सुनिता वाडेकर, 'स्थायी'चे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसे गटनेते साईनाथ बाबर, आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, 'पाणी साठणारी धोकादायक ठिकाणे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, नाला रुंदीकरण, नाल्यातील अतिक्रमणे, कात्रज तलावातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवणे, ड्रेनेज लाईन आणि चेंबर स्वच्छ करणे आदी कामांचा आढावा झोननिहाय घेतला. शिवाय कोणत्या झोनमध्ये किती टक्के कामे पूर्ण झाली, याचीही सविस्तर माहिती घेतली आहे'

'पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मागील तीन वर्षात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे ओढे-नाले यांच्या बाजूला राहणार्‍या नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता सीमाभिंतीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहे. जेणेकरून तेथील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकाराचा त्रास होता कामा नये', असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

तसेच ते पुढे म्हणाले की, सद्यस्थिती जाणून घेतली असून आता पुन्हा पंधरा दिवसात ज्या ठिकाणी पाणी साचण्याच्या आणि पाणी गेल्याच्या घटना मागील वर्षी घडल्या आहेत. तिथे प्रत्यक्ष पाहणी करणार असून पाहणीनंतर पुन्हा आढावा बैठक घेणार आहे. अधिकार्‍यांनी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

आतापर्यंत झालेली प्रमुख कामे...

- नानासाहेब पेशवे तलाव कात्रज येथील पाण्याची पातळी गेट वॉल च्या साह्याने सांडव्याच्या पातळीपेक्षा तीन मीटरने खाली राखणे

- राजीव गांधी तलाव कात्रज येथे सायफन पद्धतीचा अवलंब करून पाण्याची पातळी तळ्याच्या भिंतीच्या पातळीपेक्षा चार मीटरने कायम खाली राहणे सध्या तलावातील पातळी 4.97 मीटरने खाली आहे.

- आंबील ओढा येथे गाळ काढण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले असून यामुळे नाल्याची खोली दीड मीटरपर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे नाल्याचा प्रवाह सुरळीत आहे.

- सीमा भिंती बांधण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :RainपाऊसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका