शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

तरुणाई ‘किल्लेदारीच्या’ वाटेला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 7:00 AM

ॠतु कोणताही असो आपल्या आवडत्या गडावर जावून त्याच्या तटावरुन सभोवतालचा निसर्ग न्याहाळण्याचा सुख तो फिरस्ता अनुभवल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्देके टू एस ट्रेकची क्रेझ कायम : राजगड, रायगड  ‘फेव्हरेट’कर्जत येथील कलावंतीण, घनगड येथील किल्ल्यांना भेटी देण्यासाठी तरुणाईची गर्दी सेल्फी घेण्याच्या प्रकारामुळे निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्याचे प्रमाण कमी

पुणे : सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांची भटकंती हाडाच्या ‘भटक्या’ ला कायमच खुणावत असते. अशावेळी त्याला ऊन, वारा, पाऊस याची तमा नसते. ॠतु कोणताही असो आपल्या आवडत्या गडावर जावून त्याच्या तटावरुन सभोवतालचा निसर्ग न्याहाळण्याचा सुख तो फिरस्ता अनुभवल्याशिवाय राहत नाही. खासकरुन तरुणाईच्या ट्रव्हल लिस्ट मध्ये गडकिल्ल्यांची क्रेझ कायम आहे. यातही राजगड, रायगड त्यांचा फेव्हरेट असून सध्या के टू एस ट्रेकला पसंती मिळत आहे. पर्यटन म्हटले की, थायलंड, मलेशिया, सिंगापूर फार तर स्वीझर्लंड अशी नावे सतत डोळ्यासमोर असतात. याकरिता विविध कंपन्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीच्या सवलती देखील देतात. मात्र चांगला चार आकडी पगार असणाºया तरुणाईला सहयाद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील गड-किल्ले साद घालताना दिसतात. दर शनिवार-रविवार या दिवशी ठरलेल्या ‘टाईमपास’ गोष्टीतून सवड काढून आता यंग ब्रिगेड गड किल्ल्यांच्या सफरीवर निघाल्याचे दृश्य पाहवयास मिळते. सोशल मीडियावर गड किल्ल्यांविषयीच्या पोस्ट वाचून, व्हिडिओ बघुन अनेकांची पावले गड कोटांच्या दिशेने पडत असल्याचे गड किल्ल्यांचे पर्यटन व पर्यावरणाविषयी जनजागृती करणारे शरद बोडके सांगतात, हल्ली महाराष्ट्रातील कुठल्याही गडकिल्ल्यांविषयीची माहिती सोशल माध्यमांवर उपलब्ध आहे. यामुळे साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ट्रेकींग किंवा आॅफबीट भटकंती करण्यास ते प्राधान्य देतात. याची काही उदाहरणे द्यायची झाल्यास राजगड, रायगड, तोरणा या किल्ल्यांवर ट्रेकिंग करण्यास तरुणाईची पसंती असते. सध्या कात्रज टू सिंहगड अर्थात के टू एस असा  ट्रेक करुन एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेण्यास अनेक जण तयार असतात. रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत या वेळेत चालणारा हा ट्रेक मात्र चांगलाच दमविणारा आहे. पौर्णिमेनंतर दोन दिवस मोठ्या संख्येने ट्रेकर्स के टू एस कडे धाव घेतात. कर्जत येथील कलावंतीण, घनगड येथील किल्ल्यांना भेटी देण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. इतर परंपरागत व साचेबंद अशा किल्ल्यांपेक्षा आडेवाटेवरील गडकोटांच्या ‘वाटेला’ जाण्याची इच्छा त्यांना खुणावत असते. अंधारबन कला देखील मोठ्या संख्येने पर्यटक येतात. खऱ्याखुऱ्या जंगलाचा अनुभव आणि अरण्यातील शांतता अनुभवण्यासाठी याप्रकारच्या साहसी प्रवासात यंग ब्रिगेड सहभागी होताना दिसते. विशेषत: आयटी सेक्टर, बँकिंग, मार्केटींग, क्षेत्रातील तरुणाईला शनिवार-रविवार यादिवशी नेहमीच्या सहलीपेक्षा काहीतरी भन्नाट प्रवासाची अपेक्षा असल्याने त्यांच्याकडून जंगले व गडकिल्ल्यांची निवड केली जात आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील काही भाग जैवविविधतेच्या दृष्टीने ‘संरक्षित’ केला आहे. यात अंधारबन व वासोटा येथील जंगलाचा समावेश आहे. याठिकाणी जावून निसर्ग पर्यटनाचा आगळा वेगळा आनंद घेण्याकडे युवा भटकत्यांचा आहे. चौकटसेल्फिचा नाद येतो जीवाशीनवशिके तरुण पर्यटक अल्लडपणा करतात. त्यामुळे निसर्गाची हानी तर होतेच याशिवाय त्यातील जैवविविधता धोक्यात येते. याची पर्वा त़रुण करताना दिसत नाही. अनेक जागी कचरा करतात. वातावरणातील ध्वनितरंगांच्या माध्यमातून प्राणी व पक्षी संवाद साधतात. मात्र पर्यटकांच्या गोंगाटामुळे त्यांच्यातील संवाद प्रक्रियेला अडथळा येतो. सगळ्यात महत्वाचे सेल्फी घेण्याच्या प्रकारामुळे निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्याचे प्रमाण कमी होत असून ब-याचवेळा तो नाद जीवाशी येत असल्याच्या घटना घडत आहे.  - शरद बोडके, हौशी पर्यटक व पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :PuneपुणेFortगडWorld Tourism Dayजागतिक पर्यटन दिन