शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मंचरला महामार्गाने घेतला मोकळा श्वास, : ३५० अडथळे हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:00 IST

पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मंचर शहरातील ३५० अतिक्रमणांवर बुधवारी हातोडा पडला. जेसीबी व गॅसकटरच्या साह्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पहाटे साडेपाचला सुरू झालेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. प्रवाशांनी व वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

मंचर - पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मंचर शहरातील ३५० अतिक्रमणांवर बुधवारी हातोडा पडला. जेसीबी व गॅसकटरच्या साह्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पहाटे साडेपाचला सुरू झालेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. प्रवाशांनी व वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.अतिक्रमणाविरोधी सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मंचर ग्रामपंचायत, प्रांताधिकारी कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग विभागाने सयुक्तपणे मोहीम राबविली.पुणे-नाशिक महामार्ग मंचर शहरातून गेला आहे. महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती. त्याचा अडथळा वाहनांना प्रवास करताना होत होता. स्थायी व अस्थायी फ्लेक्स बोर्डांमुळे रस्त्याचे विद्रुपीकरण झाले होते. अपघात होऊ लागले होते. प्रशासनाने ३५० अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमण काढून घेण्यास सांगण्यात आले होते. काही व्यावसायिकांनी ते काढून घेतले होते.नंदकुमार पेट्रोल पंप तेजीवन हॉटेलपर्यंत असणाºया अतिक्रमणधारकांना नोटिसा गेल्या होत्या. विशेष म्हणजे महामार्गालगत इमारत बांधताना त्या योग्य अंतर राखून बांधण्यात आल्याने अतिक्रमणात आल्या नाहीत.पहाटे साडेपाच वाजता नंदकुमार पेट्रोल पंपापासून कारवाईला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे व फलक काढून टाकण्यात आले. सरपंच दत्ता गांजाळे यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता.दोन जेसीबी व तीन ट्रॅक्टरच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले. दोन गॅस कटरच्या साह्याने फलक कापून काढून ते लगेच बाहेर पाठविण्यात आले. ग्रामपंचायतीचे ५० कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. सरपंच गांजाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रकाश धस, फौजदार बंडोपत घाटगे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. १० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.प्रांताधिकारी अजित देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस,राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथॉरिटीचे अनिलकुमार मिश्रा यांनी कारवाई सुरू झाल्यानंतर भेट दिली. अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी त्यांची अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली. अतिक्रमणाच्या कारवाईला कोणीही विरोध केला नाही. एसटी बसस्थानकातील मोठे फलक जेसीबीच्या साह्याने काढण्यातआले आहे.मोरडेवाडी रस्ता येथील भिंत पाडण्यात आली. सायंकाळपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू होती. उपसरपंच महेश थोरात, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य कारवाईच्या वेळी हजर होते.बसस्थानकाने घेतला मोकळा श्वासमंचर एसटी बसस्थानकात सर्वाधिक अतिक्रमण झाले होते. पुणे-नाशिक महामार्गालगत असणाºया भिंतीलगत ओळीने टपºया उभ्या होत्या. प्रवेशद्वारावरदुतर्फा फळविक्रेते बसलेले होते. आतील आवारात छोट्या-मोठ्या फलकांनी जागा व्यापली होती. ही सर्वच अतिक्रमणे आज काढण्यात आल्याने बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे. बसस्थानकालगतच्या टपºया रातोरात निघाल्या. ती जागा सकाळीच रिकामी झाली होती. मोठे फ्लेक्स व लोखंडी फलक जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्यात आली. बसस्थानकाचा आवार रिकामा झाला असून दूरवरून बसस्थानकातील एसटी बस दिसू लागल्या आहेत.महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याची मंचर शहरातील ही सर्वांत मोठी कारवाई झाली आहे. या कारवाईचे वाहनचालक व प्रवाशांनी स्वागत केले आहे. ग्रामपंचायतीच्या धडक कारवाईबाबत अनेक जण समाधान व्यक्त करत होते. विशेष म्हणजे अतिक्रमण काढताना कुठलाही विरोध झाला नाही. मंचर एसटी बसस्थानकासमोर पोलीस मदत केंद्र आहे. हे केंद्र अतिक्रमणात येत असल्याने ते काढण्याची कारवाई सुरू झाली होती. अतिक्रमण काढताना कोणालाही सूट देण्यात आली नाही.दुसरा टप्पा मंचर-घोडेगाव रस्ता४दरम्यान,पुणे-नाशिक महामार्गालगतची अतिक्रमणे काढली आहेत. आतामंचर-घोडेगाव रस्त्यालगतची अतिक्रमणे काढली जाणार आहेत.४नोटिसा संबंधितांना पाठविण्यात आाल्या आहेत. अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरnewsबातम्या