शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ नेमावा - धनंजय चौैधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:33 IST

सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून पुण्यातील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या पंधरा वर्षांपासून प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात येत आहे.

लोणी काळभोर : सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून पुण्यातील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या पंधरा वर्षांपासून प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात येत आहे. लोकनियुक्त संचालक मंडळ नेमण्याची वेळ येऊ नये व आपल्या कार्यकर्त्यांना संचालक मंडळात स्थान देता यावे, म्हणून आता बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते धनंजय चौधरी यांनी केली आहे.

धनंजय चौधरी म्हणाले, की सन २००३ मध्ये तत्कालीन जिल्हा उपनिबंधक शैलेश कोथमिरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर आजपर्यंत बाजार समितीचा कारभार प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळाने पाहिला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादन खरेदी-विक्री नियमन १९६३ या कायद्यानुसार जास्तीत जास्त फक्त एक वर्ष प्रशासक ठेवता येतो. परंतु तत्कालीन आघाडी व आताच्या युती सरकारने हा नियमच बासनात गुंडाळून ठेवला आहे. एवढी प्रचंड संपत्ती असलेल्या बाजार समितीच्याबाबतीत राज्य सरकारचे धोरण कायम धरसोडीचे राहिले आहे. कधी हवेली तालुक्याची बाजार समिती पुणे जिल्ह्याची होते, परत कधी ती हवेली तालुक्याची होते. फक्त निवडणूक टाळण्यासाठी हे प्रकार केले जातात. प्रत्येक वेळी कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदींचा आधार घेऊन व आपल्याला पाहिजे तसा तरतुदीचा केल्या जातात. शेतकरी व बाजार समितीचे हित कशात आहे, याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते.या संदर्भात सन २००४ मध्ये उपोषणही केले होते. त्यावेळी मिळालेल्या आश्वासनानुसार जिल्हा उपनिबंधकांकडे एक खटला सुरू आहे.चौधरी म्हणाले, की सध्या बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामागेही राजकारण असल्याचा दाट संशय आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यकर्त्यांना संचालक मंडळात स्थान द्यायचे, हा स्पष्ट हेतू या निर्णयामागे आहे.

परंतु राज्य सरकारने परिसरातील शेती, शेतकरी व शेतमालाची वाजवी दरात विक्री, बाजार समितीची संपत्ती आदी गोष्टींचा विचार करून या बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ नेमण्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा न्यायालयीन मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती धनंजय चौधरी यांनी दिली.प्रशासक राज्य मात्र सुरूचदि. १० जानेवारी २००८ ला हवेली तालुक्याची बाजार समिती जिल्ह्याची करण्यात आली, प्रशासक राज्य मात्र सुरूच राहिले. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालक मंडळात शेतकरी, व्यापारी, हमाल या सर्व घटकांचे प्रतिनिधी असतात. या बाजार समितीच्या ताब्यात १७० एकर जमीन असून वार्षिक ३ हजार कोटीची उलाढाल आहे. बाजार समितीत सात हजार अधिकृत परवानाधारक व्यापारी असून बाजार समितीचा वार्षिक नफा ४० कोटी रुपये आहे. प्रामुख्याने शेतकºयांच्या शेतमालाला वाजवी भाव मिळावा, त्यांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक होऊ नये, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे; परंतु गेल्या काही वर्षांत या मूळ हेतूलाच हरताळ फासण्याचे काम राज्य सरकार करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड