शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ नेमावा - धनंजय चौैधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:33 IST

सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून पुण्यातील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या पंधरा वर्षांपासून प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात येत आहे.

लोणी काळभोर : सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून पुण्यातील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या पंधरा वर्षांपासून प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात येत आहे. लोकनियुक्त संचालक मंडळ नेमण्याची वेळ येऊ नये व आपल्या कार्यकर्त्यांना संचालक मंडळात स्थान देता यावे, म्हणून आता बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते धनंजय चौधरी यांनी केली आहे.

धनंजय चौधरी म्हणाले, की सन २००३ मध्ये तत्कालीन जिल्हा उपनिबंधक शैलेश कोथमिरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर आजपर्यंत बाजार समितीचा कारभार प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळाने पाहिला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादन खरेदी-विक्री नियमन १९६३ या कायद्यानुसार जास्तीत जास्त फक्त एक वर्ष प्रशासक ठेवता येतो. परंतु तत्कालीन आघाडी व आताच्या युती सरकारने हा नियमच बासनात गुंडाळून ठेवला आहे. एवढी प्रचंड संपत्ती असलेल्या बाजार समितीच्याबाबतीत राज्य सरकारचे धोरण कायम धरसोडीचे राहिले आहे. कधी हवेली तालुक्याची बाजार समिती पुणे जिल्ह्याची होते, परत कधी ती हवेली तालुक्याची होते. फक्त निवडणूक टाळण्यासाठी हे प्रकार केले जातात. प्रत्येक वेळी कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदींचा आधार घेऊन व आपल्याला पाहिजे तसा तरतुदीचा केल्या जातात. शेतकरी व बाजार समितीचे हित कशात आहे, याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते.या संदर्भात सन २००४ मध्ये उपोषणही केले होते. त्यावेळी मिळालेल्या आश्वासनानुसार जिल्हा उपनिबंधकांकडे एक खटला सुरू आहे.चौधरी म्हणाले, की सध्या बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामागेही राजकारण असल्याचा दाट संशय आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यकर्त्यांना संचालक मंडळात स्थान द्यायचे, हा स्पष्ट हेतू या निर्णयामागे आहे.

परंतु राज्य सरकारने परिसरातील शेती, शेतकरी व शेतमालाची वाजवी दरात विक्री, बाजार समितीची संपत्ती आदी गोष्टींचा विचार करून या बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ नेमण्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा न्यायालयीन मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती धनंजय चौधरी यांनी दिली.प्रशासक राज्य मात्र सुरूचदि. १० जानेवारी २००८ ला हवेली तालुक्याची बाजार समिती जिल्ह्याची करण्यात आली, प्रशासक राज्य मात्र सुरूच राहिले. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालक मंडळात शेतकरी, व्यापारी, हमाल या सर्व घटकांचे प्रतिनिधी असतात. या बाजार समितीच्या ताब्यात १७० एकर जमीन असून वार्षिक ३ हजार कोटीची उलाढाल आहे. बाजार समितीत सात हजार अधिकृत परवानाधारक व्यापारी असून बाजार समितीचा वार्षिक नफा ४० कोटी रुपये आहे. प्रामुख्याने शेतकºयांच्या शेतमालाला वाजवी भाव मिळावा, त्यांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक होऊ नये, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे; परंतु गेल्या काही वर्षांत या मूळ हेतूलाच हरताळ फासण्याचे काम राज्य सरकार करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड