शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

यातले काहीच न्यायालयात टिकणारे नाही, सरकारच्या अध्यादेशाबाबत उल्हास बापट यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 08:02 IST

Maratha Reservation: राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलले आहेत, त्यामधील काहीच न्यायालयात टिकणार नाही. कारण ते कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही, असे स्पष्ट मत घटनातज्ज्ञ प्रा. डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

पुणे -  राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलले आहेत, त्यामधील काहीच न्यायालयात टिकणार नाही. कारण ते कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही, असे स्पष्ट मत घटनातज्ज्ञ प्रा. डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले. मराठा व ओबीसी यांंच्यातील सामंजस्याशिवाय यात दुसरा काहीही मार्ग नाही, असे ते म्हणाले. 

डॉ. बापट म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले, पण न्यायालयात ते टिकले नाही. रद्द केले गेले. कारण ते ६४ टक्के झाले होते. ओबीसीमधून ते देता येईल. त्यासाठी आधी मराठा समाज मागास आहे हे सिद्ध व्हायला लागेल,  त्यात पुन्हा क्रिमीलेअरची व्याख्या करावी लागेल. कारण शिक्षणमहर्षी, साखर कारखानदार यांना तर मागास म्हणता येणार नाही. पण ते नंतर करता येईल.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून न देता स्वतंत्र आरक्षण देऊ. यावर काही वेगळे भाष्य मी करणार नाही. कारण मी राजकारणी नाही. पण घटना अभ्यासक म्हणून हे शक्य नाही, इतके मात्र नक्की म्हणेन. सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधीशांच्या पीठाने दिलेला निर्णय बदलायचा तर ११ न्यायाधीशांचे पीठ तयार करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार