शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maratha Reservation : 'आत्महत्याग्रस्त 74 टक्के शेतकरी कुटुंबियांत कुणालाच नोकरी नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 16:02 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त एकूण 74 टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये कुणालाही नोकरी नसल्याचे  सांगताना मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.

पुणे : शेतकरी आत्महत्याग्रस्त एकूण 74 टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये कुणालाही नोकरी नसल्याचे  सांगताना मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर पवार यांनी प्रकाश टाकला. यावेळी पवार यांनी मराठवाड्यातील शेतकरी प्रश्नावरील गोखले अर्थशास्त्र संस्थेने राज्य मागासवर्गीय आयोगाला सादर केलेल्या अहवालाविषयी सविस्तर माहिती दिली. मराठा आरक्षणचा प्रश्न हा संवैधानिक आणि कायदेशीर मार्गाने पुढे न्यावयाचा असल्याने काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. परंतु, घटनादुरुस्तीच्या सहाय्याने यातून सकारात्मक मार्ग निघू शकतो, असेही पवार यांनी जनसंघर्ष समिती पुणेच्या शिष्टमंडळाशी बोलताना म्हटले. यावेळी त्यांनी मुस्लीम आरक्षणासंदर्भातही आपली अनुकुलता बोलून दाखवली.

राज्यातील आरक्षणाप्रश्नी आपली भूमिका विषद करताना पवार म्हणाले, तामिळनाडूमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे. परंतु ते सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्यांची मर्यादा घालण्यापूर्वी देण्यात आले आहे. हे लक्षात घेता, सरकारने घटना दुरुस्तीचा पर्याय स्वीकारण्याची गरज, असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच मुस्लीम आरक्षणाबाबत आमच्या पक्षाने यापूर्वीच अनुकूलता दर्शविली आहे. तर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरजही पवार यांनी व्यक्त केली. यावेळी जनसंघर्ष समितीचे ऍड. रवींद्र रणसिंग, प्रा. विकास देशपांडे, हाजी नदाफ, ऍड. मोहन वाडेकर, मकबूल तांबोळी, ऍड. शशिकांत धिवार, हर्षल लोहकरे, रवींद्र देशमुख, दिगंबर मांडवणे, अक्षय काटे, दशहरी चव्हाण आदी उपस्थित होते. 

आंदोलनाला समतोलपणे पुढे नेण्याची गरज

राज्यात मराठा आंदोलने उत्स्फूर्तपणे झाली. आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाने सामूहिक नेतृत्व स्वीकारले आहे. मात्र त्यामुळे सरकारबरोबर चर्चा घडत नाही. तसेच आज जे विनाकारण अविश्वास व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते बदलण्याची गरज असून हिंसक न होता, आंदोलन समंजसपणे पुणे नेण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण