शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

तिकीट दर वाढल्याने अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले; सरकारने व्यवस्था करावी - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:21 IST

तिकिटांचे दर वाढले असून परत येण्यास अडचणी येत आहेत, सरकारने यावर तोडगा काढून त्या पर्यटकांना सुखरूप घरी पोहचवण्यासाठी विमान, रेल्वे व इतर साधनांचा वापर करावा

पुणे : काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या अनेक पर्यटकांशी माझा संपर्क व बोलणे झाले आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर पर्यटकांना आपापल्या गावी जायचे आहे. मात्र, प्रवासाचा तिकीट दर वाढवण्यात आल्याने अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. हे पर्यटक सुखरूप घरी पोहचावेत, यासाठी सरकारने व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच ही वेळ नफा कमावण्याची नाही तर समाजिक बांधिलकी जपण्याचे आहे आणि संकटात सापडलेल्यांना संकटातून बाहेर काढण्याची आहे, याचा विचार वाहतूक क्षेत्रातील संस्था आणि कंपन्यांनी करावा, असेही त्या म्हणाल्या.

काश्मीरमधील पहलगाम येथे आठ ते दहा दहशतवाद्यांनी मंळवारी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे पर्यटनासाठी काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये व त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पर्यटनासाठी गेलेले पर्यटक परत येत असून, ज्यांनी जाण्याचे बुकिंग केले आहे, ते आपले बुकिंग रद्द करत आहेत.

खा. सुळे म्हणाल्या, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी माझे बोलणे झाले आहे. त्यांनी तिकिटांचे दर वाढल्याने परत येण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढून त्या पर्यटकांना सुखरूप घरी पोहचवण्यासाठी विमान, रेल्वे व इतर साधनांचा वापर करावा. ही वेळ नफा कमावण्याची नाही, तर त्यांना सुखरूप घरी पोहचवण्याची आहे. याबाबत मी स्वत: केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली आहे.

हल्ल्यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती, अशा बातम्या पाहण्यात येत आहेत. त्यामध्ये किती तथ्य आहे, याबद्दल कल्पना नाही. मात्र, पंतप्रधान व देशाच्या गृहमंत्र्यांनी घटनेची माहिती घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलवावी. हल्ल्यासंदर्भात सत्य स्थिती देशातील सर्व नागरिकांना व संसदेला द्यावी. आत्ताची वेळ राजकारण करण्याची नाही, राजकारण करायला नंतर खूप वेळ आहे. आता जे संकटात आहेत, त्यांना त्यातून बाहेर काढण्याची गरज आहे. यामध्ये सुरक्षा व्यवस्था व गुप्तचर विभागाचे अपयश समोर आले, तर आम्ही संसदेत सरकारला प्रश्न विचारू, पण आता टीकाटीप्पणी व आरोप करण्याची वेळ नाही, असेही खा. सुळे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणairplaneविमान