शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरकार, विज्ञान व उद्योग एकत्र आल्यास काेराेनाची साथ राेखणे शक्य : मनसुख मांडवीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:12 IST

जगातील अद्ययावत तंत्रज्ञान देशात आणून त्याचा वापर वाढला पाहिजे...

पुणे : काेराेनाच्या वाढत्या संसर्गानंतर जगभरातील वैज्ञानिक एकवटले आणि त्यांनी लस तयार केली. भारतात तर आतापर्यंत ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सरकार, विज्ञान व उद्याेग एकत्र आल्यास साथीला राेखणे शक्य आहे. जगातील अद्ययावत तंत्रज्ञान देशात आणून त्याचा वापर वाढला पाहिजे. परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण लस निर्मितीमध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी उपस्थित शास्त्रज्ञांसह कंपन्यांना केले.

विकसनशील देशांमधील लस उत्पादकांच्या नेटवर्कच्या (डीसीव्हीएमएन) तेवीसाव्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते पुण्यात बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला, लस उत्पादक कंपन्यांच्या नेटवर्कचे चेअरमन साई डी. प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी राजिंदर सुरी तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन उपस्थित होते.

लसीकरणात आणखी चांगले काम करण्यासाठी चार गोष्टींवर काम करणे आवश्यक आहे. त्यातील पहिली गोष्ट ज्ञान आहे. भारतातील संशोधक विद्यालयांनी अन्य विकसित देशातील संशोधन संस्थांबरोबर करार करायला हवा. भारतात लसींच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून शोध आणि विकासाकडे अधिक लक्ष दिले जावे. दुसरी गोष्ट "टेक्नॉलॉजी' म्हणजेच तंत्रज्ञान ट्रान्स्फर करण्यावर लक्ष द्यायचे आहे. औषध क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या एकत्रित आल्या पाहिजे. काेरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. मांडवीय यांनी नमूद केले.

साथीच्या काळात आम्ही केलेल्या चुका टाळून भविष्यात येणाऱ्या साथींना रोखण्यासाठी सक्षम आणि प्रभावी धोरणात्मक आराखडा तयार करा. जेणेकरून साथीला तोंड देणे शक्य होईल, अशी सूचना लस विकसित करण्यासाठी चतुःसूत्रीचे पालन करण्याची आवश्यकता असल्याकडे मांडवीय यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य