शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

सरकार, विज्ञान व उद्योग एकत्र आल्यास काेराेनाची साथ राेखणे शक्य : मनसुख मांडवीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:12 IST

जगातील अद्ययावत तंत्रज्ञान देशात आणून त्याचा वापर वाढला पाहिजे...

पुणे : काेराेनाच्या वाढत्या संसर्गानंतर जगभरातील वैज्ञानिक एकवटले आणि त्यांनी लस तयार केली. भारतात तर आतापर्यंत ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सरकार, विज्ञान व उद्याेग एकत्र आल्यास साथीला राेखणे शक्य आहे. जगातील अद्ययावत तंत्रज्ञान देशात आणून त्याचा वापर वाढला पाहिजे. परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण लस निर्मितीमध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी उपस्थित शास्त्रज्ञांसह कंपन्यांना केले.

विकसनशील देशांमधील लस उत्पादकांच्या नेटवर्कच्या (डीसीव्हीएमएन) तेवीसाव्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते पुण्यात बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला, लस उत्पादक कंपन्यांच्या नेटवर्कचे चेअरमन साई डी. प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी राजिंदर सुरी तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन उपस्थित होते.

लसीकरणात आणखी चांगले काम करण्यासाठी चार गोष्टींवर काम करणे आवश्यक आहे. त्यातील पहिली गोष्ट ज्ञान आहे. भारतातील संशोधक विद्यालयांनी अन्य विकसित देशातील संशोधन संस्थांबरोबर करार करायला हवा. भारतात लसींच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून शोध आणि विकासाकडे अधिक लक्ष दिले जावे. दुसरी गोष्ट "टेक्नॉलॉजी' म्हणजेच तंत्रज्ञान ट्रान्स्फर करण्यावर लक्ष द्यायचे आहे. औषध क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या एकत्रित आल्या पाहिजे. काेरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. मांडवीय यांनी नमूद केले.

साथीच्या काळात आम्ही केलेल्या चुका टाळून भविष्यात येणाऱ्या साथींना रोखण्यासाठी सक्षम आणि प्रभावी धोरणात्मक आराखडा तयार करा. जेणेकरून साथीला तोंड देणे शक्य होईल, अशी सूचना लस विकसित करण्यासाठी चतुःसूत्रीचे पालन करण्याची आवश्यकता असल्याकडे मांडवीय यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य