शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

मनुष्यबळाची कमतरता, बसची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:24 AM

पीएमपीच्या सर्व गाड्या सीएनजी झाल्या; परंतु देखभाल- दुरुस्तीबाबत तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारीच नसल्याने बसची दुरवस्था झाल्याचे पीएमपी अधिकारी आणि प्रवाशांच्या चर्चेमध्ये दिसून आले.

पुणे : पीएमपीच्या सर्व गाड्या सीएनजी झाल्या; परंतु देखभाल- दुरुस्तीबाबत तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारीच नसल्याने बसची दुरवस्था झाल्याचे पीएमपी अधिकारी आणि प्रवाशांच्या चर्चेमध्ये दिसून आले.पीएमपी प्रवासी मंचातर्फे आयोजित मिडी बसेस नवीन-त्रुटी अनेक व डिजिटल व्यवस्थेवरील चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पीएमपीचे मुख्य अभियंता शिवाजी जाधव, आयटी प्रमुख शिरीष कालेकर, केपीआयटीचे मिडी बस आयटीएमएस तज्ज्ञ मधुकर माने, मंचचे अध्यक्ष जुगल राठी, सतीश चितळे, अ‍ॅड. शीला परळीकर आदी उपस्थित होते. सजग सक्रिय प्रवासी म्हणून वैभव कुलकर्णी, सु. वा. फडके, रुपेश केसेकर, जयदीप साठे, उद्धव गार्डी, निळकंठ मांढरे, सतीश सुतार, विराज देवधर यांचा मोफत बस पास देऊन गौरव करण्यात आला. प्रवाशांनी विविध गंभीर विषयासंबंधी तक्रारी मांडल्या.मागील वर्षी ठेकेदारांचा संप झाला, त्या वेळी स्वत:च्या २०० बस पीएमपीने ठेकेदाराकडून परत ताब्यात घेतल्या. त्यापैकी १०० बस पिंपरी-चिंचवड येथे आणि १०० बस कोथरूड येथे ठेवण्यात आल्या. मात्र, डेपोमध्ये बस उभ्या करण्याकरितादेखील जागा उपलब्ध नव्हती. त्या बसबाबतच्या विविध समस्यांना आजही प्रशासन सामोरे जात आहे. सर्व गाड्या सीएनजी असून त्याबद्दलचे ज्ञान असणारी केवळ ५-५० माणसेच पीएमपीकडे आहेत. तर, मिडी बसबाबतचे इतर तांत्रिक ज्ञान असलेले मनुष्यबळदेखील बोटावर मोजण्याइतके आहे. त्यामुळे पीएमपीच्या बसची परिस्थिती सुधारून त्यांची योग्य देखभाल व्हावी, याकरिता गुणवत्तेवर तांत्रिक मनुष्यबळाची पीएमपीमध्ये पारखून भरती करायला हवी, असा सूर पीएमपी अधिकारी आणि प्रवाशांच्या चर्चेमध्ये उमटला.शिवाजी जाधव म्हणाले, चांगल्या बस रस्त्यावर येण्याकरिता चांगले तांत्रिक मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. त्याकरिता पीएमपीमध्ये होणारी मनुष्यभरती गुणवत्तेनुसार पारखून व्हायला हवी. इतर ठिकाणी चांगले पगार मिळाल्यानंतर इथे असलेल्या कमी पगारामुळे चांगले अधिकारी व कामगार दुसरीकडे जातात. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.जुगल राठी म्हणाले, बसेसबाबत जे काम बाहेरील संस्था वा ठेकेदारांना दिले आहे, त्यांनी ते काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई व्हायला हवी. जर, पुन्हा तक्रारी आल्या, तर ठेकेदाराचा ठेका त्वरित रद्द करण्यात यावा. डिजिटल बससुविधेमुळे पीएमपीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असला, तरी त्याप्रकारची उत्तम सुविधा अजूनही मिळत नाही, असेही ते म्हणाले.>जून अखेरपर्यंत मिडी बसेसच्या तांत्रिक अडचणी दूर करू : शिरीष कालेकरपीएमपीच्या ताफ्यात २०० मिडी बसेस आहेत. त्यात काही तांत्रिक अडचणी असल्याची बाब खरी आहे. पीएमपीसह मिडी बसेसबाबतच्या कामाशी संलग्न असलेल्या अनेक संस्था आहेत. त्यामुळे त्या सर्वांमध्ये समन्वय साधून जून अखेरपर्यंत सर्व मिडी बसेसमधील डिस्प्ले, लाईट्स, स्पिकर, फलक, माईक, जीपीएस यांसारख्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करू, असे आश्वासन पीएमपीचे आयटीप्रमुख शिरीष कालेकर यांनी दिले.200मागील वर्षी ठेकेदारांचा संप झाला, त्या वेळी स्वत:च्या २०० बस पीएमपीने ठेकेदाराकडून परत ताब्यात घेतल्या. त्यापैकी १०० बस पिंपरी-चिंचवड येथे आणि १०० बस कोथरूड येथे ठेवण्यात आल्या.