शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
5
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
6
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
7
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
8
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
9
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
10
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
11
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
12
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
13
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
14
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
16
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
17
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
18
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
19
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
20
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'

मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड; त्यांचे अण्णा हजारे झालेले नाहीत - कुमार सप्तर्षी

By श्रीकिशन काळे | Published: December 24, 2023 5:55 PM

मराठा ही मूळात जात नसून हा एक संघ आहे, त्यांच्यात देखील चातुर्वण्य व्यवस्था आहे

पुणे: मराठे त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. संधीची कवाडे नाकारलेल्या मराठ्यांमधील मनोज जरांगे हे नेतृत्व असून, ते अनघड नेतृत्व आहे. जे जे अनघड असते, ते सत्य असते. मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड आहे. अण्णा हजारे आधी असेच अनघड होते, पण ते जेव्हा राजकीय व्यक्तींच्या संपर्कात आले, तेव्हा काय झाले हे आपल्याला माहितच आहे. मनोज जरांगे यांचा अण्णा हजारे झालेले नाहीत. असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित २३ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात 'आरक्षण आणि महाराष्ट्राचे भवितव्य' ? या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. कुमार सप्तर्षी बोलत होते. या परिसंवादात सारंग दर्शने, डॉ. बाळासाहेब सराटे आणि प्रा. अविनाश कोल्हे सहभागी झाले होते.

डॉ. सप्तर्षी म्हणाले की, मनोज जरांगे यांची विखे पाटील, उदयनराजे भोसले आदी भोसले घराण्यातील प्रतिनिधी या प्रगत मराठ्यांशी तुलना करून चालणार नाही. प्रगत मराठ्यांनी त्यांच्यातीलच वंचित आणि गरीब मराठ्यांना स्वीकारले नाही. मराठा ही मूळात जात नसून हा एक संघ आहे. त्यांच्यात देखील चातुर्वण्य व्यवस्था आहे. उच्चवर्णीय मराठ्यांनी फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारले आहे. मराठ्यांमधील उतरंडीच्या क्रमानुसार खालच्या श्रेणीतील मराठ्यांना काळानुरूप राजकीय शहाणपण आले असून ते त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. 

प्रा. अविनाश कोल्हे म्हणाले की, ९० सालापासून जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने सर्वच परिमाणे बदलली. सरकारने अनेक क्षेत्रातून माघार घेत खाजगीकरण केले. त्यामुळे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या. सध्याची आरक्षणाकरीता सुरू असलेली भांडणे पाहून मनात असा विचार येतो की, समोर असे काय आहे की ज्यासाठी ही भांडणे सुरू आहेत.

सारंग दर्शने म्हणाले की, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेत प्रगतीचे टप्पे गाठले त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या पुढच्या पिढीचे आरक्षण नाकारले का, हा आत्मचिंतनाचा विषय आहे. प्रगती होऊनही आरक्षणाचे लाभ घेत राहणे, हे कोणत्या तत्वात बसते. आज मराठवाड्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कुणबी- मराठा समाजातील शेतकरीच करीत आहेत. जरांगेंच्या मनात हीच वेदना आहे.

डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शेतीच्या पडलेल्या तुकड्यांमुळे वाटेला आलेल्या शेतीतून उदरनिर्वाह होणार नाही, याची जाणीव झाल्यानेच मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आलेला आहे.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलKumar Saptarshiकुमार सप्तर्षीMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा