शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचे भगवे वादळ राजधानीच्या वेशीवर; पुण्यात १० तास जरांगे-पाटलांची पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 08:14 IST

नियोजित मुक्काम लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे आहे. सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले.

पुणे: मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेली मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी शहरात १० तास सुरू होती. नागरिकांकडून होणारे स्वागत, बघ्यांची गर्दी यामुळे पदयात्रा निघालेल्या रस्त्याला पालखी यात्रेचेच स्वरूप आले होते. प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मात्र, रस्त्याची एक बाजू मोकळी ठेवून आंदोलक व त्यांची वाहने जात असल्यामुळे शिस्तीचेही दर्शन पुणेकरांना घडले. वाघोलीवरून सकाळी ११ वाजता निघालेली ही यात्रा रात्री ९ नंतर शहरातून लोणावळ्याकडे रवाना झाली. नियोजित मुक्काम लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे आहे. सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले.

घराघरांतून प्रत्येकी २५ चपात्या, चटणीलोणावळा, मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ, कामशेत, वडगाव, तळेगाव या भागामधून घराघरांतून प्रत्येकी २५ चपात्या व चटणी तयार केली.   

‘ओबीसीत याल तर दोनच टक्के आरक्षण’ धाराशिव : कुणबी दाखल्यांच्या आधारे मराठा समाज जर ओबीसींचे आरक्षण घेणार असेल तर ते त्यांचेच नुकसान ठरणार आहे. हे आरक्षण घेतल्यास ईडब्ल्यूएसचा लाभ त्यांना घेता येणार नाही. रोहिणी आयोगामुळे  मराठा समाजाला या नऊ टक्क्यांतूनच जवळपास दोन टक्के आरक्षण मिळेल, असे मत माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केले.

पहिलीचा मित्र म्हणतो, मनोज पूर्वीपासूनच जिद्दीपुणे : मनोज हा आधी शांत आणि हुशार विद्यार्थी होता. पाचवीनंतर तो जिद्दी झाला. शाळेतील विद्यार्थी संसद असो किंवा वर्गाचा मॉनिटर यामध्ये त्याचेच नाव असायचे. आजही त्याच्या जिद्दीचे प्रत्यंतर आंदोलनात दिसून येते. मातोरी (जि. बीड) गावातील साधारण कार्यकर्ता ते संपूर्ण मराठा समाजाचा चेहरा हा संपूर्ण प्रवास मनोज जरांगे यांचे लहानपणापासूनचे मित्र अशोक जरांगे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला.

आम्ही महिनाभराचा शिधा घेऊन मुंबईकडे निघालो  पिंपरी (पुणे) : ‘आम्ही वाहनांमधून महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य आणि साहित्य घेऊन निघालो आहोत. त्यात स्वयंपाकासह कपडे, चादरी यांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घेऊनच परत येणार,’ असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी केला आहे. धाराशिव, नाशिक, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. बीडमधील अमळनेर गावातून आलेल्या शेतकऱ्यांशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. आता आरक्षण घेऊनच मागे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतातील कामे उरकली आहेत. जी काही थोडी कामे शिल्लक आहेत, त्यांची जबाबदारी घरातील महिलांवर सोपवल्याचे त्यांनी सांगितले. 

मंत्रालयासमोर बैलगाडीची खुंटी बांधणार पुणे : पेट्रोल लय महाग झालंय. आता वाहनाने मुंबईला जाणं शक्य नाही म्हणून आम्ही आमच्या बैलगाडीसोबत मुंबईकडे जातोय. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मंत्रालयाच्या समोरच बैलांची खुंटी बांधणार आणि शेणाच्या गोवऱ्या तिथल्या भिंतींवर थापणार,’ असा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे बैलगाडीतून निघालेल्या मराठा बांधवांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो लोकांनी बुधवारी पुण्यातून मुंबईकडे कूच केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण