शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी

By राजू इनामदार | Updated: May 30, 2025 16:19 IST

असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत

पुणे: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान केलेले असताना राज्याचे कृषीमंत्री माणिक कोकाटे, सरकारने काय मातीचे व मोकळ्या वावराचे पंचनामे करायचे का? असा प्रश्न करत आहेत. शेतकऱ्यांप्रती अशी असंवेदनशीलता दाखवणाऱ्या कोकाटे यांचा सरकारने राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेसने केली. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व त्याबद्दल न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या कोकाटे यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही असे काँग्रेसने म्हटले आहे.

पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले, ”राज्यात पावसाने धुमाकुळ घातला. राज्याच्या जवळपास सर्वच भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा वेळी सरकारने सर्व महसूल यंत्रणांना त्वरीत पंचनामे करायला सांगणे गरजेचे असते. त्यामुळेच शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यायची ते निश्चित करता येते. त्याबाबत निर्णय घेण्याऐवजी कोकाटे यांनी सरकारने काय मोकळ्या वावरांचे व मातीचे पंचनामे करायचे का? असे जाहीर वक्तव्य केले.“ अशा असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत अशी मागणी पवार यांनी केली.

नेमकं काय म्हणाले कोकाटे? 

वळवाच्या पावसाने महाराष्ट्र राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात शेतातून काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या दोन प्रकारच्या कांद्याचाही समावेश आहे. शासकीय यंत्रणा उभ्या पिकाचे पंचनामे करीत असल्याच्या तक्रारींवर कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी भाष्य केले. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे करता येणार नाहीत. शेतात नुकसान झालेले कांदा आणि अन्य जी पिके असतील, त्यांचे रितसर पंचनामे केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :PuneपुणेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेfarmingशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री