शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

माळेगांव कारखान्यासाठी ८८. ४८ टक्के उच्चांकी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 21:41 IST

शरद पवार गटाचे बळीराजा सहकार बचाव पॅनलचे २० उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, माळेगांव: माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज रविवार ( दि.२२) रोजी आज मतदान प्रक्रिया पार पडली.एकूण कारखान्याचे निवडणुकीमध्ये एकूण चार पॅनल व अपक्ष यांच्यामध्ये लढत होती.त्यासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८८. ४८ टक्के एकूण मतदान झाले. प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री निलकंठेश्वर पॅनल व गुरु-शिष्यांचा चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा शेतकरी सहकार बचाव पॅनल यांच्यामध्ये प्रामुख्याने तुल्यबळ लढत होती. शिवाय शरद पवार गटाचे बळीराजा सहकार बचाव पॅनलचे २० उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले.

‘माळेगाव’ च्या कार्यक्षेत्रात आजचा दिवस सभासद राजाचाच होता. सभासदांना प्रचंड लक्ष्मी दर्शन झाल्याची परीसरात चर्चा होती. त्यामुळे मतदारही प्रचंड संख्येने बाहेर पडल्यााचे मानले जाते. त्यामुळे मतदानाची टक्केवारीमध्ये प्रचंड वाढ झाली.वाढलेला टक्का कोणत्या कोणाला तारक ,तर कोणाला मारक ठरणार याचीच उत्सुकता आहे.अवघ्या काही तासांवर निकाल आल्याने ‘साहेब’ ,दादांसह आण्णाकाकांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागले आहे.

लोकसभा, विधानसभेनंतर काका पुतण्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांविरोधात शड्डु ठोकला.तसेच महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असणार्या भाजपच्या गुरुशिष्यांनी या निवडणुकीत संपुर्ण राजकीय ताकत पणाला लावली.शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत या निवडणुकीसाठी चार दिवस तळ ठोकुन होते.त्यामुळे निवडणुक मोठ्या चुरशीची झाली.रविवारी(दि २२) झालेल्या मतदानात माळेगाव गटामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस मतदान झाल्याचे झाल्याने कोणत्या उमेदवाराचा बळी जाणार याची चर्चा सभासदांमध्ये होती या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सभासदाने कोणता उमेदवार चांगला, तसेच नात्यागोत्याचे कोण आहे हे लक्षात घेऊन मतदान केले.त्यामुळे उमेदवार मात्र चिंताग्रस्त दिसत होते.निकालाची खात्री नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.

माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजता मतदानास सुरवात झाली.यावेळी सकाळी ९ वाजेपर्यंत ९.११ टक्के मतदान झाले,सकाळी ११ वाजेपर्यंत २५.८१ टक्के,१ वाजेपर्यंत ४७.६६ टक्के,३ दुपारी ३ वाजेपर्यंत ६७.७५ टक्के,तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८४.२२ टक्के मतदान झाले.तर सायंकाळी ‘ब’ वर्ग मतदारसंघाचे ९९.०२ टक्के मतदान झाले.याच ‘ब’ वर्गातून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुक लढवित आहेत.

उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी बारामती येथे मतदान केले.यावेळी पत्रकारांनी पीडीसी बॅकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  आचारसंहिता सुरू झालेल्या दिवसापासून शरद संकुल याठिकाणी त्यांचा अड्डा तिथेच आहे. सहकाराच्या नियमात आचारसंहितेच्या काळात कोणालाही त्या ठिकाणी बसता येत नाही, प्रचार करता येत नाही याद्या करता येत नाहीत. काल रात्री सुद्धा तिथे बसूनच राजकारण चाललं होतंय. मला रात्री फोन आलेला दादा तिथे 'स्कॉड' पाठवा बघा काय होते. ते काय करायचं, पण ज्याचं त्याला लखलाभ, ज्याच त्याला लखलाब मला त्यात पडायचं नाही. पीडीसी बँकेत निळकंठेश्वर पॅनल चा एक तरी सदस्य होता का? असा सवाल उपमुख्यमंत्री पवार यांनी केला

ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी ११ हजार लोकांना प्रत्येकी १० हजार रुपयांनी प्रत्येकाला पैसे वाटायचे, अशी आम्हाला माहिती मिळाल्याचा  खळबळजनक आरोप  पत्रकारांशी बोलताना केला. गेली ४० वर्षे आम्ही लोकांच्यात राहून काम करत आहोत. लोकांचा कल आम्हाला जाणवत आहे. शंभर टक्के आमचा पॅनल विजयी होईल.पैशापेक्षा प्रेम आणि विश्वास मोठा आहे. आणि ते आम्ही संपादन केले आहे. म्हणूनच आम्हाला निवडून येण्याची खात्री असल्याचे तावरे म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या,स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजविली.त्यांचेच संस्कार घेवुन गेली सहा दशके ‘पवारसाहेब’ बारामतीकरांच्या आशिर्वादानेव महाराष्ट्राच्या सहकार्याने देशात सहकाराचे नेतृत्व करीत आहेत.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही टिकविण्यासाठी मतदान महत्वाचे आहे.इव्हीएम मशिन,बॅलेट पेपर निवडणुक प्रक्रीयेचा  भाग असुून त्याचा सन्मान करणे आवश्यक आहे.निवडणुका पादर्शन पध्दतीने झाल्या पाहिजेत,असे सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024NCPराष्ट्रवादी काँग्रेस