शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

ऑनर किलिंगच्या विराेधात विशेष कायदा करा ; पुण्यातील मानवधिकार कार्यकर्त्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 17:28 IST

ऑनर किलिंगच्या विराेधात विशेष कायदा करण्याची मागणी पुण्यातील मानवधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. विकास शिंदे यांनी केली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अहमदनगरमध्ये ऑनर किलिंगच्या अनेक घटना समाेर आल्या असून राज्यात सातत्याने असे प्रकार घडत असल्याने या विराेधात विशेष कायदा करण्याची मागणी पुण्यातील मानवधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. विकास शिंदे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य महिला आयाेग तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयाेग यांना निवेदन दिले आहे. तसेच अहमदनगर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी देखील केली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये ऑनर किलिंगच्या घटना समाेर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर शिंदे यांनी निवेदन दिले आहे. 28 मार्च राेजी अहमदनगर येथील जामखेड तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन 11 वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीची तिच्या वडीलांनी आणि मामाने मिळून निर्दयीपणे हत्या केली हाेती. तसेच हत्या करुन घराजवळच असलेल्या शेत तळ्याच्या बाजुला राॅकेल टाकून तिचा मृतदेह जाळला हाेता. या घटनेनंंतरच पंधराच दिवसात नेवासा तालुक्यातील काैठा या गावामध्ये मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे पीडीत मुलीच्या पालकांनी तिला लग्न लावून देताे म्हणून बाेलावून तिचा खून केला. 

एका महिन्यात दाेन ऑनर किलींग झालेले असताना हे थांबविण्यासाठी सरकारकडून काेणतीही प्रतिक्रिया आली नसल्याने शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 2004 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेमध्ये सन्मानाच्या नावाखाली महिलांविरुद्ध हाेणारे गुन्हे राेखण्यासाठी एक ठराव पास करण्यात आला व त्या ठरावानुसार प्रत्येक सदस्य राष्ट्राने अशा प्रकारचे गुन्हे राेखण्यासाठी विशेष कायदे करावेत, प्रशासकीय पातळीवर कृती आराखडे तयार करण्याबाबत ठरविण्यात आले आहे. आपल्या सरकारला आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचा विसर पडला असल्याचे शिंदे यांनी निवदेनात नमूद केले आहे. 

शिंदे म्हणाले, ऑनर किलींग राेखण्यासाठी सरकारने पाॅस्काे सारखा विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा ऑनर किलींगच्या घटना घडू शकते याची माहिती गावातील ग्रापपंचायत सदस्य, सरपंच यांना माहित असते. परंतु अनेकदा याबाबत पाेलिसांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे ऑनर किलींगसाठी विशेष कायदा करुन त्यात अशा घटना राेखण्याची जबाबदारी सरपंच, ग्रापपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांना नेमून द्यायला हवी. तसेच प्रत्येक पाेलीस स्टेशनमध्ये समुपदेशन कक्ष उभारण्यात यावा. जिथे मुला -मुलींचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. अनेकदा प्रेमविवाहामध्ये गावामध्ये इज्जत जाईल या भावनेतून ऑनर किलींगच्या घटना घडतात. परंतु जर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच जर या विराेधात पुढे आल्या तर अशा घटना घडणार नाहीत. त्यामुळे असा कायदा करणे आवश्यक आहे. त्याचबराेबर एक हेल्पलाईन सुरु करणे सुद्धा आवश्यक आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयMurderखून