शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऑनर किलिंगच्या विराेधात विशेष कायदा करा ; पुण्यातील मानवधिकार कार्यकर्त्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 17:28 IST

ऑनर किलिंगच्या विराेधात विशेष कायदा करण्याची मागणी पुण्यातील मानवधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. विकास शिंदे यांनी केली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अहमदनगरमध्ये ऑनर किलिंगच्या अनेक घटना समाेर आल्या असून राज्यात सातत्याने असे प्रकार घडत असल्याने या विराेधात विशेष कायदा करण्याची मागणी पुण्यातील मानवधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. विकास शिंदे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य महिला आयाेग तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयाेग यांना निवेदन दिले आहे. तसेच अहमदनगर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी देखील केली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये ऑनर किलिंगच्या घटना समाेर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर शिंदे यांनी निवेदन दिले आहे. 28 मार्च राेजी अहमदनगर येथील जामखेड तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन 11 वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीची तिच्या वडीलांनी आणि मामाने मिळून निर्दयीपणे हत्या केली हाेती. तसेच हत्या करुन घराजवळच असलेल्या शेत तळ्याच्या बाजुला राॅकेल टाकून तिचा मृतदेह जाळला हाेता. या घटनेनंंतरच पंधराच दिवसात नेवासा तालुक्यातील काैठा या गावामध्ये मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे पीडीत मुलीच्या पालकांनी तिला लग्न लावून देताे म्हणून बाेलावून तिचा खून केला. 

एका महिन्यात दाेन ऑनर किलींग झालेले असताना हे थांबविण्यासाठी सरकारकडून काेणतीही प्रतिक्रिया आली नसल्याने शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 2004 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेमध्ये सन्मानाच्या नावाखाली महिलांविरुद्ध हाेणारे गुन्हे राेखण्यासाठी एक ठराव पास करण्यात आला व त्या ठरावानुसार प्रत्येक सदस्य राष्ट्राने अशा प्रकारचे गुन्हे राेखण्यासाठी विशेष कायदे करावेत, प्रशासकीय पातळीवर कृती आराखडे तयार करण्याबाबत ठरविण्यात आले आहे. आपल्या सरकारला आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचा विसर पडला असल्याचे शिंदे यांनी निवदेनात नमूद केले आहे. 

शिंदे म्हणाले, ऑनर किलींग राेखण्यासाठी सरकारने पाॅस्काे सारखा विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा ऑनर किलींगच्या घटना घडू शकते याची माहिती गावातील ग्रापपंचायत सदस्य, सरपंच यांना माहित असते. परंतु अनेकदा याबाबत पाेलिसांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे ऑनर किलींगसाठी विशेष कायदा करुन त्यात अशा घटना राेखण्याची जबाबदारी सरपंच, ग्रापपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांना नेमून द्यायला हवी. तसेच प्रत्येक पाेलीस स्टेशनमध्ये समुपदेशन कक्ष उभारण्यात यावा. जिथे मुला -मुलींचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. अनेकदा प्रेमविवाहामध्ये गावामध्ये इज्जत जाईल या भावनेतून ऑनर किलींगच्या घटना घडतात. परंतु जर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच जर या विराेधात पुढे आल्या तर अशा घटना घडणार नाहीत. त्यामुळे असा कायदा करणे आवश्यक आहे. त्याचबराेबर एक हेल्पलाईन सुरु करणे सुद्धा आवश्यक आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयMurderखून