शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

महाराष्ट्र कृषी क्षेत्रातील रोल मॉडेल बनावे, कृषी पुरस्कार वितरणप्रसंगी राज्यपालांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 01:27 IST

कृषी ही भारताची संस्कृती आहे. जर शेतकरी संपन्न असेल, तर देश संपन्न होईल. महाराष्ट्राने त्यादृष्टीने जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मृद संधारण अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.

पुणे : कृषी ही भारताची संस्कृती आहे. जर शेतकरी संपन्न असेल, तर देश संपन्न होईल. महाराष्ट्राने त्यादृष्टीने जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मृद संधारण अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रासाठी देशाचा रोल मॉडेल बनावा, अशी भावना राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कृषी रत्न पुरस्कार वितरणप्रसंगी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.राज्यातील ११२ जणांना विविध कृषी पुरस्काराने गौरविले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्य मंत्री सदाशिव खोत, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर या वेळी उपस्थित होते.रायगड येथील मालेगाव येथील चंद्रशेखर भडसावळे यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित केले. स्मृतीचिन्ह, ७५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.राव म्हणाले, विपरीत परिस्थितीतह शेतकºयांनी अन्नधान्य, दूध आणि फलोत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनविले आहे.देशाची प्रगती ही शेतकरी व त्याच्या उत्पादकता वाढीशीनिगडीत आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे.शेतकरी मोठ्या प्रमाणावर शहराकडे येऊ लागला आहे. जर, गावातच चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी शहराकडे येणार नाहीत. त्यामुळे शेतीला चालना देण्यासाठी जलसिंचनावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून २४ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सिंचनावर केली. गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गटाला १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०१५ - चंद्रशेखर भडसावळे (सगुणा बाग, जि. रायगड)वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०१५ - रामचंद्र सावे (चिंचणी, जि. पालघर)वसंतराव नाईक शेतीनिष्ठशेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) २०१५ - मनीष देसले (आसनगाव, जि. पालघर)वसंतराव नाईक शेतीनिष्ठशेतकरी पुरस्कार (आदिवासीगट) २०१५ - कैलास बराड (नेवरे, जि. ठाणे)उद्यान पंडित पुरस्कार २०१५ - पुष्पा कोटकर (बिरवाडी,जि. ठाणे).वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार सन २०१६ - दिलीप देशमुख (काराव, जि. ठाणे)वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) सन २०१६ - लक्ष्मण गरूड (आसनपोई, रायगड), विजया पोटे (कल्याण, ठाणे)वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) सन २०१६ - विनायक पोटे (मुरबाड, ठाणे), लक्ष्मण पागी (शहापूर, ठाणे), सुरेश भोईर (भिवंडी, ठाणे)कृषिभूषण (सेंद्रिय शेती) (शेतकरी) - स्नेहल पोतदार (डहाणू, जि. पालघर)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र