शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा दिरंगाईचा महावितरणला शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 19:23 IST

ग्राहकाला नियमाप्रमाणे ५० रुपये प्रतितास नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकाला तब्बल पावणेतीन लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल.    

ठळक मुद्देविद्युत आयोगाची कारवाई : ग्राहकाला द्यावी लागणार पावणेतीन लाखांची भरपाईया प्रकरणी बारामती विभागातील ग्राहक महेंद्र शहा यांनी विज नियामक आयोगाकडे तक्रार नियमाप्रमाणे विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर ४८ तासात सुरु करणे बंधनकारक

पुणे : ग्राहकाचा विद्युत पुरवठा तब्बल साडेसात महिने खंडित ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या ग्राहक तक्रार निवारण मंच व विद्युत लोकपालने महावितरणवर कामातील दिरंगाईचा ठपका ठेवला आहे. तसेच ग्राहकाला नियमाप्रमाणे ५० रुपये प्रतितास नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकाला तब्बल पावणेतीन लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल.    या प्रकरणी बारामती विभागातील ग्राहक महेंद्र शहा यांनी विज नियामक आयोगाकडे तक्रार दिली होती. शहा हे बारामती विभागातील केडगाव येथील व्यावसायिक वीज ग्राहक आहेत. केबल तुटल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा जुलै २०१७ मधे खंडित झाला होता. याप्रकरणी त्यांनी २० जुलै रोजी केडगाव कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतरही त्यांनी वेळोवेळी तक्रार करुनही त्यांचा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. कधी केबल कार्यालयात उपलब्ध नसल्याचे तर कधी शहा यांच्या शेजारील व्यक्तीने हरकत घेतल्याने काम करता येत नसल्याचे कारण देण्यात आले होते. अगदी मार्च २०१८ पर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नाही. त्यानंतर शहा यांनी विज नियामक आयोगाकडे धाव घेतली. नियमाप्रमाणे विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर ४८ तासात सुरु करणे बंधनकारक आहे. या कालावधीत विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास दुरूस्ती पूर्ण होईपर्यंतच्या प्रत्येक तासाला महावितरणने ग्राहकाला प्रति तास ५० रुपये नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. आयोगाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद झाल्यानंतर आयोगाने ३० जून २०१७ ते १२ मार्च २०१८ या कालावधीत शहा यांचा वीज पुरवठा खंडीत असल्याचे दिसून येत असल्याचे मत नोंदविले. शेजारील गाळामालकाने हरकत घेतली आणि केबल नसल्याचे कारण स्वीकारार्ह नाही असेही मंचाने स्पष्ट केले. वादळ, पाऊस अथवा भूकंप अशा कारणामुळे विद्युत पुरवठा सुरु करण्यास विलंब झालेला नाही. केवळ कर्मचाºयांच्या निष्काळजीपणामुळेच विद्युत पुरवठा सुरळीत झाला नसल्याचे आमचे ठाम मत झाले आहे. त्यामुळे ग्राहक नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. ग्राहकास कृती मानके विनियम २०१४नुसार नियमाप्रमाणे ६० दिवसांच्या आत नुकसान भरपाई (एसओपी) द्यावी, तसेच वारंवार तक्रार करुनही दाद न देणे, वेळेत तक्रार निवारण न करणे यास जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करुन नियमानुसार कारवाई करावी असे आदेश आयोगाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीmahavitaranमहावितरण