शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरू; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 11:38 IST

अजित पवारांकडून धरसोड वृत्तीची अपेक्षा नाही..

पुणे: महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरु आहे. त्यांचे आप आपसात समन्वय नाही. एक जण म्हणते हे करा एक जण म्हणते ते करा ..असे कसे ना.? हे सरकार लबाड सरकार आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

पुण्यामध्ये शुक्रवारी(दि.१२) चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांची वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. 

एमपीएससीच्या मुद्द्याचा संदर्भ देत पाटील म्हणाले; एकाच सरकारमधले वडेट्टीवार वेगळं म्हणतात? त्यांच्या सुरात सुर मिसळून पृथ्वीराज चव्हाण बोलतात. त्यांच्या सुरात सूर मिसळून नाना पटोले बोलतात.. सगळ्या विषयांमध्ये सरकारमधला प्रत्येक घटक हा वेगळी भूमिका मांडतो. वीजबिल विषयामध्ये तेच झाले आहे. आता काल त्यांनी तारीख दिली की आठ दिवसांत नवी तारीख देतो का विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा का? “

अजित पवारांकडून अशा धरसोड वृत्तीची अपेक्षा आपल्याला नव्हती असे म्हणत पाटील म्हणाले “ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित दादांनी वीज बिलासंदर्भात भूमिका घेतली. कनेक्शन कट करणार नाही सांगितले. आणि शेवटच्या दिवशी ते बदलले. अजित दादांकडून तरी माझी ही अपेक्षा नव्हती” 

यावेळी गुरुवारी झालेल्या आंदोलन सहभागाबद्दल बोलताना पाटील म्हणाले “ जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे भाजप उभे राहणारच आहे.  भाजपचा कार्यकर्ता कधी लपून राहत नाही” 

दरम्यान शहरात पुन्हा लॉकडाउन करु नये अशी भूमिका त्यांनी घेतली. अधिकचे निर्बंध घालावेत पण आर्थिक चक्र बिघडवू नये असे पाटील म्हणाले. मॉलसारख्या ठिकाणी जर गर्दी होत असेल तर टोकन देत मर्यादित लोकांना एकावेळी सोडले पाहिजे. पण नवी बंधने नकोत अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याMPSC examएमपीएससी परीक्षाAjit Pawarअजित पवार