शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Maharashtra Rain : एनडीआरएफच्या २६ पथकांद्वारे बचावकार्य सुरू; पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पथके तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 22:30 IST

पुराच्या पाण्यामुळे महाडला पोहचण्यास उशीर

पुणे : राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनानुसार तसेच स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार आम्ही पथके पाठवले आहेत. सध्या ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास २६ पथकांद्वारे बचाव कार्य सुरू आहे. पाण्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असले तरी आमची पथके प्रत्येक ठिकाणी पोहचली आहे, अशी माहिती एनडीआरएफच्या ५ व्या बटालीयनचे कमांडन्ट अनुपम श्रीवास्तव यांनी लोकमतला दिली.

राज्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती झाली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, राजगड जिल्ह्यात परिस्थिती बिटक झाली आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार आम्ही आमची पथके ही रवाना केली आहे. काही पथके ही घटनास्थळी पोहचली असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. महाडमध्ये रस्त्यावर पडलेली झाडी तसेच वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे थोड्या अडचणी आल्या. मात्र, बोटीच्या साह्याने पथक पोहचले आहे. बचावकार्य वाढवण्यासाठी भुवनेश्वरून आणखी पथके मागवण्यात आली आहे. यातील चार पथके विमानाने पुण्यात उतरली आहे. तर दोन पथके गोव्याला आणि दोन पथके रत्नागिरिला पोहचली आहे. ती रवाना झाली असून त्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणी काही वेळात ती पोहचणार आहे. सध्या पालघर येथे १, ठाणे येथे २, रायगड येथे १, महाड येथे ४, कोल्हापुर येथे २, मुंबई येथे ४ पथके तैनात करण्यात आली आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfloodपूर