शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महाराष्ट्र पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर - देवेंद्र फडणवीस

By नितीन चौधरी | Updated: October 18, 2023 19:00 IST

राज्यात सत्ता बदलामुळे पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पुणे : जगभरात सध्या भारताकडे गुंतवणुकीचे एक मोठे स्थान म्हणून बघितले जात आहे. त्यातही राज्यात गुंतवणुकीसाठी विचारणा होत असून त्यात पुण्याचाही समावेश आहे. युती सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचे राज्य होते. मध्यंतरीच्या दोन वर्षांच्या काळात हा क्रमांक इतर राज्यांनी हिरावून घेतला. मात्र, आता पुन्हा एकदा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुण्यातील जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भुषण स्वामी, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्षा अलका पेटकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप व्यासपीठावर उपस्थित होते. ते म्हणाले, “कोरोना काळात चीनने जगाची पुरवठा साखळी विस्कळीत केली. त्यामुळेच अनेक देशांनी चीनसह अन्य ठिकाणी देखील सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली. जगाची फॅक्टरी तसेच पुरवठा साखळी ही भारतात निर्माण होऊ पाहत आहे. त्यामुळे अनेक देशांना भारतात उद्योग सुरू करावे असे वाटत आहे.”

पुणे ही देशाची आयटी नगरी तसेच मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्यात दर आठवड्याला गुंतवणुकीसाठी विचारणा होत असल्याचे सांगून त्यातील अनेक जण पुण्यातही भेट देत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या युती सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होते. त्यातील एका वर्षी देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४२ टक्के तर दुसऱ्या वर्षी ४९ टक्के गुंतवणूक राज्यात झाली होती. मध्यंतरीच्या दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्राचा हा क्रमांक हिरावला गेला, अशी टीका करत कर्नाटक व गुजरातमध्ये ही गुंतवणूक झाली. त्यानंतर झालेल्या सत्ता बदलामुळे राज्यात पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तिमाहीतही राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली असून महाराष्ट्र पुन्हा एकदा गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आल्याचे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणbankबँकMaharashtraमहाराष्ट्र