शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Maharashtra: तलाठी भरतीसाठी तब्बल १२ लाखांपेक्षा जास्त अर्ज; २० दिवस चालणार परीक्षा प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 09:53 IST

उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार होता; अन्यथा अर्जांची संख्या आणखी वाढली असती...

पुणे : तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै होती. मात्र, उमेदवारांच्या आग्रहामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. तसेच फी भरण्याची अंतिम तारीख २० जुलै होती. या अंतिम तारखेपर्यंत तलाठी पदाच्या भरतीसाठी विक्रमी १२ लाख ३२ हजार ७७८ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जांची ही संख्या पाहता प्रशासनाला तब्बल २० दिवस ही परीक्षा घ्यावी लागणार आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर परीक्षेची वेळ आणि तारीख जाहीर होणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

उमेदवारांची संख्या पाहता परीक्षेचे नियोजन करण्यात येणार असून टप्प्या-टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा फक्त २० दिवसांत होईल याचा ही नेमका अंदाज बांधता येत नाही. वीस दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा कालावधीत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. साधारण दिवसाला ५० ते ६० हजार जणांची चाचणी होईल. ही चाचणीदेखील विविध परीक्षा केंद्रांवर तीन शिफ्टमध्ये घेण्यात येईल. उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार होता; अन्यथा अर्जांची संख्या आणखी वाढली असती.

तीन आठवडे अर्ज भरण्याची मुदत :

तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर झाल्यापासून तीन आठवडे म्हणजे १७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज उमेदवारांनी करायचे होते. उमेदवारांच्या आग्रहामुळे एक दिवस अर्ज करण्यासाठी वाढवून देण्यात आला होता तसेच फी भरण्यासाठी २० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. खुल्या गटासाठी एक हजार, तर इतर गटांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते.

इंजिनिअर, डॉक्टर, वकिलांनीही केला अर्ज :

तलाठी पदासाठी अर्ज करताना पदवीधर असण्याची अट होती. मात्र, तलाठी पदासाठी पदवीधर असणाऱ्यांसोबतच उच्चशिक्षित असणाऱ्या उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. इंजिनिअर, डॉक्टर, वकील असे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचा देखील अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे तसेच पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या उमेदवारांनीदेखील अर्ज केले आहेत.

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र