शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात ९० बिबट्यांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 06:48 IST

बिबटे आता शहरातही येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्षात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्याची दहशत पसरलेली असताना त्यांच्या मृत्यूमध्येही वाढ होत आहे.

- श्रीकिशन काळेपुणे : बिबटे आता शहरातही येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्षात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्याची दहशत पसरलेली असताना त्यांच्या मृत्यूमध्येही वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात देशात झालेल्या बिबट्यांच्या एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक ९० मृत्यू महाराष्टÑात झाले होते. रस्ते अपघात, शिकार, ग्रामस्थांकडून मारणे आदी प्रकारांमुळे मृत्यूमध्ये वाढ झाली आहे.देशात सध्या १४ हजारच्या जवळपास बिबट्यांची संख्या आहे. ही आकडेवारी वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी आॅफ इंडियाने केलेल्या सर्व्हेमधून समोर आली आहे. तसेच डिसेंबर २०१८ मध्ये लोकसभेत केंद्रीय वनमंत्र्यांनीही आकडेवारी सादर केली. २०११ ते १०१७ मध्ये महाराष्टÑातच २ लाखाहून अधिक वन्यप्राणी आणि मानवाच्या संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये वन विभागाने ४ कोटीहून अधिक रूपयांची भरपाई दिली आहे. देशात १९९४ ते २०१८ दरम्यान सुमारे ४६९८ बिबट्यांना बेकायदा मारण्यात आले.नाशिकमध्ये ४१ जेरबंददोन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यात एकूण ४१ बिबटे वनविभागाने जेरबंद केले आहेत. जिल्ह्यामधील प्रत्येकी नऊ तालुक्यांनुसार वनविभागाने पूर्व-पश्चिम असे दोन भाग केले आहे. पूर्व भागात दोन वर्षांत २४, तर पश्चिमध्ये १७ असे एकूण ४१ बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे.बिबटे हे आता मानवी वस्तीत सहज राहत आहेत. कोणी अचानक समोर आले तर ते हल्ला करतात. बिबट्यांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. सोसायटीतर्फे केलेल्या सर्व्हेमध्ये हे समोर आले आहे. - निकित सुर्वे, वन्यजीव संशोधक, वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी आॅफ इंडिया२०१८ मधील मृत्यूमहाराष्टÑ : ९० । उत्तराखंड : ९३राजस्थान : ४६ । मध्य प्रदेश : ३७उत्तर प्रदेश : २७ । कर्नाटक : २४हिमाचल प्रदेश : २३मृत्यूची कारणेशिकार : १५५ । अपघात : ७४ग्रामस्थांचे हल्ले : २९वन विभागाची कारवाई : ८नैसर्गिक मृत्यू वइतर कारणांनी : १९४ मृत्यू

टॅग्स :leopardबिबट्याMaharashtraमहाराष्ट्र