शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

परदेशात कला सादर करण्यात ‘महाराष्ट्र’ पडला पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 05:59 IST

अन्य राज्यांतील कलावंतांना कशी काय परदेशी जाण्याची संधी मिळते? असे म्हणून महाराष्ट्रातील कलावंतांकडून नेहमीच नाके मुरडली जातात.

- नम्रता फडणीसपुणे : अन्य राज्यांतील कलावंतांना कशी काय परदेशी जाण्याची संधी मिळते? असे म्हणून महाराष्ट्रातील कलावंतांकडून नेहमीच नाके मुरडली जातात. मात्र परदेशात कार्यक्रम करण्यासाठी रीतसर अर्ज करावा लागतो, या माहितीपासूनच लोककलावंत अद्याप ‘अनभिज्ञ’ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच परदेशी लोककलावंत पाठविण्याच्या केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन (आयसीसीआर) च्या यादी प्रणालीमध्ये ‘महाराष्ट्र’ ईशान्य भारत, राजस्थान आणि केरळ राज्यांच्या तुलनेत अद्यापही पिछाडीवर आहे.गेल्या तीन वर्षांत देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रातून केवळ १० अर्जच संस्थेकडे आले असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून एक प्रकारे लोककलावंतांची उदासीनता दिसून येत आहे. लोककलावंतांना परदेशात कार्यक्रमाला पाठविण्याकरिता केंद्र सरकारची इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन (आयसीसीआर) नावाची संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या संकेतस्थळावर रीतसर अर्ज उपलब्ध आहेत. त्या अर्जासोबत कलावंतांनी सीडी पाठवणे अपेक्षित असते.त्या अर्जांची छाननी होऊन देशभरातली लोककला पथकांची एक मास्टर यादी तयार होते. परदेशात कार्यक्रम करण्याची संधी आल्यास यादीमध्ये समाविष्ट लोककलावंतांच्या पथकांना पाठविले जाते. मात्र संपूर्ण देशभरातून अर्ज येणाऱ्या संख्येमध्ये महाराष्ट्र अत्यंत पिछाडीवर आहे. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातून दहाच्यावर अर्जांची संख्या गेलेली नाही. त्यातुलनेत इतर राज्यांमध्ये हे प्रमाण २५ ते ५० च्या आसपास आहे. लोककलावंतांमध्ये माहितीचा अभाव हे अर्जाच्या कमी संख्येमागील प्रमुख कारण असल्याची माहिती आयसीसीआरच्या लोककला छाननी समितीचे सदस्य डॉ. प्रकाश खांडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आयसीसीआरची ही योजना केवळ लोककलांवतांनाच नव्हे, तर शास्त्रीय संगीत, नृत्य क्षेत्रामधील कलाकारांनादेखील लागू होते. मात्र याबाबत कलावंतसुद्धा अनभिज्ञ आहेत. त्यामुळे परदेशी जाणाºया पथकामध्ये ईशान्य भारत, राजस्थान आणि केरळ राज्यातील अधिकांश कलावंतांचा समावेश आहे. शासकीय सोयी व सुविधा कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी लोककलावंतांमध्ये उद्बोधन होणे गरजेचे आहे.लोककलावंतांचे महाशिबिर घ्यावेलोककलावंताचे महाशिबिर आयोजित करून शासनाने राज्य आणि केंद्र शासनांच्या योजनांची माहिती द्यायला हवी. शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठीही कलावंतांची साँग अँड ड्रामा विभागामार्फत निवड केली जाते. पण ही निवड करताना नक्की अर्ज कुठे करायचा, त्याची छाननी कशी असते, मानधन किती मिळते, याबाबतचे मार्गदर्शन त्यांना केले जात नाही. यामध्ये शासकीय कर्मचाºयांचीही उदासीनताही कारणीभूत आहे. राज्याच्या सहा महसुली विभागात सांस्कृतिक संचालनालयाने शिबिर घेण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केली.- महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार नेण्याकरिता कलावंताना उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.मात्र याविषयी माहिती नसणे आणि माहिती करून घेण्याची उत्सुकता नसणे यामुळे लोककलावंत या चांगल्या योजनेपासून वंचित राहत आहेत.परदेशात कार्यक्रमासाठी जाणाºयांमध्ये महाराष्ट्रातील पथकांची संख्या अत्यंत कमी आहे.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र