शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

Maharashtra Election2019 : भाजप सरकारने व्यापाऱ्यांचा विश्वासघात केला : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 12:25 IST

भाजप सरकारमध्ये आमचाच संवाद होत नाही, तर व्यापारी, उद्योजकांचा कधी होणार, असा उपरोधिक टोलादेखील पवार यांनी लावला.

ठळक मुद्देव्यापारी धोरणाकडे दुर्लक्ष केले

पुणे : व्यापारी धोरण पुढे नेण्यासाठी गुजरात राज्याकडे पाहिले जात होते. सध्या देशाचे नेतृत्व गुजरात करत आहे. यामुळे देशाचे व्यापारी धोरण निश्चित केले जाईल, असा विश्वास व्यापाऱ्यांना होता. परंतु भाजप सरकारने व्यापाऱ्यांचा विश्वासघात केला असून, व्यापारी धोरणाकडे दुर्लक्ष केले असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केली.राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुकुंदनगर येथे व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये पवार बोलत होते. मेळाव्यासाठी माजी खासदार रजनी पाटील, दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, विठ्ठल मणियार, सराफ असोसिएशनचे फत्तेचंद रांका, राजेश शहा, राजेश फुलफगर, जॉगरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुगळे आदी उपस्थित होते.सद्यस्थितीत अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम देशावर होत आहेत़.  एकेकाळी आपण गाड्या आयात करायचो; मात्र निर्यात करू लागलो़. सध्या याच क्षेत्रात प्रचंड मंदी आहे़.  मंदी घालवण्यासाठीपावली टाकावी लागतात़.  उद्योजकांमध्ये गुंतवणुकीचे वातावरण निर्माण केले पाहिजे़. मात्र, सध्या तसे होताना दिसत नसल्याचेही पवार यांनी सांगितले.प्रफुल्ल पटेल केंद्रीयमंत्री असताना त्यांनी उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर विमानांची जेट कंपनी बंद पडली़ .त्यामुळे २० हजार लोकांची नोकरी गेल्याचेही पवार यांनी नमूद केले.या वेळी वालचंद संचेती, राजेश शहा, फत्तेचंद रांका यांनी व्यापाºयांना भेडसावणाºया समस्या मांडल्या़ काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड यांनी सूत्रसंचालन केले तर राजेश फुलफगर यांनी आभार मानले़........सध्या निर्माण झालेल्या आर्थिक मंदीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने समाजातील विविध क्षेत्रांतील घटकांशी संवाद ठेवला पाहिजे. अरुण जेटली मंत्री होते तोपर्यंत हा संवाद टिकून होता, पण आता सरकार आणि व्यापारी असा काही संवादच राहिलेला नाही. भाजप सरकारमध्ये आमचाच संवाद होत नाही, तर व्यापारी, उद्योजकांचा कधी होणार, असा उपरोधिक टोलादेखील पवार यांनी लावला. गेल्या पाच वर्षांत शेती, व्यापार, उद्योगासह विविध क्षेत्रांतील प्रश्न गंभीर बनत चालले असल्यानेच १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशीच परिस्थिती उद्योग क्षेत्रात निर्माण झाली आहे़.  या प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस 

 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाbusinessव्यवसायGovernmentसरकार