शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election2019 : भाजप सरकारने व्यापाऱ्यांचा विश्वासघात केला : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 12:25 IST

भाजप सरकारमध्ये आमचाच संवाद होत नाही, तर व्यापारी, उद्योजकांचा कधी होणार, असा उपरोधिक टोलादेखील पवार यांनी लावला.

ठळक मुद्देव्यापारी धोरणाकडे दुर्लक्ष केले

पुणे : व्यापारी धोरण पुढे नेण्यासाठी गुजरात राज्याकडे पाहिले जात होते. सध्या देशाचे नेतृत्व गुजरात करत आहे. यामुळे देशाचे व्यापारी धोरण निश्चित केले जाईल, असा विश्वास व्यापाऱ्यांना होता. परंतु भाजप सरकारने व्यापाऱ्यांचा विश्वासघात केला असून, व्यापारी धोरणाकडे दुर्लक्ष केले असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केली.राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुकुंदनगर येथे व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये पवार बोलत होते. मेळाव्यासाठी माजी खासदार रजनी पाटील, दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, विठ्ठल मणियार, सराफ असोसिएशनचे फत्तेचंद रांका, राजेश शहा, राजेश फुलफगर, जॉगरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुगळे आदी उपस्थित होते.सद्यस्थितीत अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम देशावर होत आहेत़.  एकेकाळी आपण गाड्या आयात करायचो; मात्र निर्यात करू लागलो़. सध्या याच क्षेत्रात प्रचंड मंदी आहे़.  मंदी घालवण्यासाठीपावली टाकावी लागतात़.  उद्योजकांमध्ये गुंतवणुकीचे वातावरण निर्माण केले पाहिजे़. मात्र, सध्या तसे होताना दिसत नसल्याचेही पवार यांनी सांगितले.प्रफुल्ल पटेल केंद्रीयमंत्री असताना त्यांनी उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर विमानांची जेट कंपनी बंद पडली़ .त्यामुळे २० हजार लोकांची नोकरी गेल्याचेही पवार यांनी नमूद केले.या वेळी वालचंद संचेती, राजेश शहा, फत्तेचंद रांका यांनी व्यापाºयांना भेडसावणाºया समस्या मांडल्या़ काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड यांनी सूत्रसंचालन केले तर राजेश फुलफगर यांनी आभार मानले़........सध्या निर्माण झालेल्या आर्थिक मंदीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने समाजातील विविध क्षेत्रांतील घटकांशी संवाद ठेवला पाहिजे. अरुण जेटली मंत्री होते तोपर्यंत हा संवाद टिकून होता, पण आता सरकार आणि व्यापारी असा काही संवादच राहिलेला नाही. भाजप सरकारमध्ये आमचाच संवाद होत नाही, तर व्यापारी, उद्योजकांचा कधी होणार, असा उपरोधिक टोलादेखील पवार यांनी लावला. गेल्या पाच वर्षांत शेती, व्यापार, उद्योगासह विविध क्षेत्रांतील प्रश्न गंभीर बनत चालले असल्यानेच १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशीच परिस्थिती उद्योग क्षेत्रात निर्माण झाली आहे़.  या प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस 

 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाbusinessव्यवसायGovernmentसरकार