शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Mahrashtra Election 2019 : महाराष्ट्राचा बिहार करायचाय का ? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 20:20 IST

महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीपातीमध्ये वाटण्यात येत आहे. आपल्याला राज्याचा बिहार करायचे आहे का असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला.

पुणे : कुठल्या ठिकाणी कुठल्या समाजाची लाेकं हे पाहून सध्या उमेदवार दिले जात आहेत. गेल्या 10 - 15 वर्षांपूर्वी राज्यात असे वातावरण नव्हते. देशाचं नेतृत्व करणारा महाराष्ट्र सध्या जातीपातींमध्ये सडताेय. आपल्याला महाराष्ट्राचा बिहार करायचाय का ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला. 

पुण्यात काेथरुडमध्ये राज ठाकरेंच्या सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. मतदारसंघामध्ये कुठल्या जातीचे, समाजाचे लाेक राहतात याप्रमाणे उमेदवार देणं या आधी घडत नव्हतं. राज्याला सध्या काय झालंय हे कळत नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यात आला. पुतळा पाडणाऱ्यांना राम गणेश गडकरी काेण हे माहित आहे का? त्यांना वाटलं असणार नितीन गडकरींचे नातेवाईक असणार,पाडा पुतळा. सध्या महापुरुष, साहित्यिक, कलाकार यांना जातीपातींमध्ये वाटण्यात येत आहे. मतदारसंघामध्ये उमेदवार निवडताना एकच निकष हवा. उभा असलेला उमेदवार जनतेचे काम करणार की नाही. काेथरुडमधली निवडणूक तर अत्यंत साेपी आहे. इथला आमदार स्थानिक हवाय की बाहेरचा एवढाच निर्णय काेथरुडकरांनी करायचा आहे. पाटील निवडणुकीनंतर हाताला लागणार आहेत का ? परंतु अशा गाेष्टी घडतात कारण तुम्हाला गृहीत धरलं जातं. असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kothrud-acकोथरुड