शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Maharashtra Election 2019 : 'शरद पवारांचे राजकारण या निवडणुकीनंतर संपलेले असेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 05:05 IST

शरद पवार याही वयात फिरत असल्याने त्यांना सहानुभूती मिळणार नाही. उलट ‘या वयात पवार कशाला फिरतात? थापेबाजीचे राजकारण, जातीय राजकारण ते आणखी किती वर्षे करणार, असे आता लोकच विचारू लागले आहेत, असे पाटील म्हणाले.

- सुकृत करंदीकरपुणे : यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीपुढे आव्हान कोणाचेच नाही. पण जनताच शरद पवार यांचे राजकारण संपवणार आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संपला असून, त्यांना अनेक ठिकाणी उमेदवारही देता आलेले नाहीत. मनसेला कॉंग्रेस आघाडीमध्ये घेण्याबाबत दुमत होते, त्यांना पाठिंबा देण्याची हतबलता त्यांच्यावर आली आहे, असेही ते म्हणाले.शरद पवार याही वयात फिरत असल्याने त्यांना सहानुभूती मिळणार नाही. उलट ‘या वयात पवार कशाला फिरतात? थापेबाजीचे राजकारण, जातीय राजकारण ते आणखी किती वर्षे करणार, असे आता लोकच विचारू लागले आहेत, असे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेते अनेक आहेत. पण कार्यकर्ता एकच आहे ते म्हणजे स्वत: शरद पवार. तेच आता प्रचारात दिसत आहेत. त्यामुळे प्रचारात त्यांचा उल्लेख होतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेले पाटील कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.सर्वसाधारणपणे १ कोटी ७० लाख मते मिळवणाऱ्या पक्षाची राज्यात सत्ता येते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना आणि घटकपक्षांच्या महायुतीला राज्यात २ कोटी ७४ लाख मते मिळाली होती. २८८ पैकी २२७ मतदारसंघांमध्ये ‘महायुती’ला मताधिक्य होते. लोकसभेतल्या मतांची टक्केवारी पाहता राज्यात महायुतीचे अडीचशे आमदार निवडून येतील. तरीही आम्ही किमान २२० जागा जिंकू असे बोलतो. उरलेल्या ६८ जागांमध्ये दोन्ही कॉंग्रेस, अपक्ष आणि इतर पक्ष राहतील,’’ असे पाटील म्हणाले. निकालानंतर विरोधी पक्षनेतेपदही कदाचित कोणाला मिळणार नाही, असाही दावा त्यांनी केला.शिवसेनेसह कोणतेही मित्रपक्ष भाजपावर नाराज नसल्याचा दावा पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘एकट्या भाजपचे दीडशे आमदार निवडून आले तरी येणारे सरकार हे ‘महायुती’चेच असेल. सर्व घटकपक्षांना त्यात स्थान असेल. भाजपाचे हे धोरण ठरलेले आहे. आमच्यातल्या कोणाला किती जागा मिळतील हे महत्त्वाचे नाही. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर आमचा भर आहे.’ काही ठिकाणी बंडखोरी झाली. मात्र पक्ष जिवंत असल्याचे हे लक्षण आहे. आमच्या कार्यकर्त्यांना समजावण्यात आम्ही यशस्वी झालो असून, त्याचा परिणाम निकालावर होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शरद पवारांचा राग का?‘खरे म्हणजे शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रीय नव्हती. महाराष्ट्रीयही नव्हती. खºया अर्थाने ती पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष होता. मात्र, गेल्या पाच वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यातूनही त्यांना आम्ही हद्दपार करत आणले आहे. पक्षाने जबाबदारी दिल्याने मी यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पवारांच्या बालेकिल्ल्यालाच हादरे दिल्यामुळे शरद पवार मला टार्गेट करतात,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले. समोरच्याला किरकोळीत काढायचं, जातीयवादी बोलायचं हे पवारांचे राजकारण लोकांनीही आता ओळखले आहे. त्यामुळे त्यांच्या निराशेत वाढ झाली आहे, अशीही टिप्पणी पाटील यांनी केली.उदयनराजेंना कसली भीती दाखवणार? : इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले ही वस्तुस्थिती आहे. मात्र, कशाच्या तरी दबाव-दहशतीमुळे हे घडल्याचा आरोप साफ खोटा आहे असे सांगून ते म्हणाले, की उदयनराजे-शिवेंद्रराजे, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक यासारख्या नेत्यांना कोण कसली भीती दाखवणार? उलट कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले सगळे नेते हुशार आणि दूरदृष्टी असलेले आहेत. दोन्ही कॉंग्रेसना भवितव्य नाही, हे त्यांनी ओळखले आहे. आपापल्या भागाच्या विकासासाठी ते आमच्याकडे आले आहेत.’१९८२ पासून मी पुण्याचा आहे. मंत्री म्हणून गेली पाच वर्षे पुण्याच्या प्रश्नांशी निगडीत आहे. त्याही आधी बारा वर्षे मी पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व केले. तेव्हा याच पुण्यातल्या तीन लाख मतदारांनी मला दोनदा निवडून दिले. त्यामुळे मी ‘बाहेरचा’ असल्याची चर्चा कोथरूडच्या मतदारांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये नाही. - चंद्रकांत पाटील

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019