शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Maharashtra Election 2019 : 'यंदा बघतोच, तू कसा आमदार होतो' चा पुनरुच्चार करत अजित पवारांचा शिवतारेंंना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 16:53 IST

Maharashtra Election 2019 : सूर्यावर थुंकू नको..

ठळक मुद्देसंजय जगताप यांच्या प्रचारासाठी सासवडला पावसात जल्लोषात सभा

सासवड :-राष्ट्रवादीचे सोडून गेलेला एक आता राष्ट्रवादी संपविण्याची भाषा करू लागला आहे, त्याने त्याच्या औकातीत राहावे. त्याची सगळी अंडीपिल्ली मला माहित आहेत असे बोलत जालिंदर कामठेंवर तर शरद पवार यांवर टीका करणाऱ्या शिवतारेंना, सूर्यावर थुंकू नको असे सांगत बारामती येथील सभेतील ' यंदा बघतोच, तू कसा आमदार होतो उद्गाराचा पुनरुच्चार करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गर्भित इशारा दिला आहे.   महाराष्ट्रात आघाडीची सुप्त लाट आहे पहिल्याच कॅबिनेट मध्ये शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचा निर्णय घेऊ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सासवड येथे केले. आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचाराची सांगता सभा सासवड येथील पालखी मैदानावर झाली. त्यावेळी ते बोलत होते. पाऊस असूनही सभा प्रचंड जल्लोषात झाली.  

पुरंदर - हवेलीच्या विकास करण्याची धमक फक्त संजय जगताप यांच्यातच आहे. यासाठी संजयच्या रूपाने खणखणीत नाणे दिले आहे, ते खणखणीतच वाजवा आणि शरद पवार यांच्या सूचनेनुसार जगताप यांना पुरंदर - हवेलीच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी माझ्याबरोबर विधानसभेत पाठवा, असे आवाहन पवार यांनी केले. अजित पवार यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांच्या प्रचारार्थ भेकराईनगर ते सासवड भर पावसात भव्य रॅली काढण्यात आली.     यावेळी अजित पवार म्हणाले , पुरंदर - हवेलीच्या विकास करण्याची धमक फक्त संजय जगताप यांच्यातच आहे. यासाठी संजयच्या रूपाने खणखणीत नाणे दिले आहे, ते खणखणीतच वाजवा आणि शरद पवार यांच्या सूचनेनुसार जगताप यांना पुरंदर - हवेलीच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी माझ्याबरोबर विधानसभेत पाठवा, असे आवाहन पवार यांनी केले. युती सरकारने ५ वर्षांत विकासाचे काही काम केले नाही, केवळ फसव्या घोषणा केल्या, शेतक-यांच्या आत्महत्या, बेरोजगारीचे प्रामण वाढले, कायदा सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे आता सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली असून राज्यात आघाडीची सुप्त लाट असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी शिवतारे यांना निवडणूक आल्यावरच गुंजवणीचे पाणी आठवते. मात्र हे पाणी आणण्याची त्यांच्यात धमक आणि ताकद नाही असे सांगत पवार यांनी ते आता आजारी असल्याची नौटंकी करत असून भावनिक करून मते मागतील, त्याला बाली पडू नका. पुरंदरच्या विकासासाठी, पुरंदर उपसा, जनाई उपसा योजना व्यवस्थित चालविण्यासाठी आणि गुंजवणीचे पाणी आणण्यासाठी आघाडीतील भक्कम, धडधाकट माणसाची गरज असल्याने त्यासाठी संजय जगताप यांना उमेदवारी दिली आहे.     उमेदवार संजय जगताप यांनी पुरंदरच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एक संधी द्या असे आवाहन करीत, प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची योजना करून घरोघरी शुद्ध पाणी, शेतीला बारमाही पाण्याची योजना,  उच्च शिक्षणाच्या सुविधा, असल्याची ग्वाही दिली.  शिवतारेंवर टीका करताना ५ वर्षात यांना पाणी, रोजगार, कोणते काम पूर्ण करता आले का, असा प्रश्न विचारीत हाताच्या पंजाला मतदान करण्याचे आवाहन केले. सासवड, जेजुरी च्या पाणी योजनेचे उदाहरण देत अशी कामे करायची असतात असे त्यांनी सांगितले. तर स्वाभिमानी पुरंदरला दोनशे कोटींच्या भ्रष्टाचाराचा कलंक लावणा-याला हद्दपार करण्याचे आवाहन संजय जगताप यांनी केले.      यावेळी माजी आमदार अशोकराव टेकवडे, हरीश सणस, विजयराव कोलते, सुदामराव इंगळे, संभाजीराव झेंडे, दिलीप बारभाई, आदींनी भाषणातून संजय जगतापांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले. यावेळी माणिकराव झेंडे पाटील, प्रदीप पोमण, दत्ता झुरंगे, प्रहारच्या सुरेखा ढवळे, दिलीप गिरमे यांसह सर्व नगरसेवक, पुरंदर हवेलीतील विविध गावांतील महाआघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शिवाजी पोमण, महेश जगताप यांनी सुत्रसंचलन केले. 

संजय जगताप यांना विजयी करा : शरद पवार पावसामुळे हेलिकॉप्टर येऊ शकत नसल्याने माझी इच्छा असूनही मला सासवडला येत आले नाही. आघाडी एका विचाराने निवडणूक लढवीत आहे, संजय जगताप यांना विजयी करा असे आवाहन खा शरद पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे सासवडच्या सभेत केले. .

टॅग्स :JejuriजेजुरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक