शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 :मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 18:56 IST

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत, अशी टीका रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना केली. ‘नोबेल विजेते भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांचे अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे आहेत व त्यांचा तो विचार भारताने नाकारलेला आहे, त्या विचारांना भारतात थारा नाही असेही ते म्हणाले. 

पुणे : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत, अशी टीका रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना केली. ‘नोबेल विजेते भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांचे अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे आहेत व त्यांचा तो विचार भारताने नाकारलेला आहे, त्या विचारांना भारतात थारा नाही असेही ते म्हणाले. 

    विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पुण्यात आलेल्या गोयल यांनी शुक्रवारी (ता. १८) माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याबद्धल बोलताना ते म्हणाले, बॅनर्जी यांचे नोबेल पुरस्काराबद्धल अभिनंदन. मात्र ते कोणत्या विचारांचे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. ते डाव्या विचारांचे आहेत. काँग्रेसने गरिबांसाठी आणलेल्या न्याय योजनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विचारांना भारताने नाकारले आहे.

         मनमोहनसिंग यांच्यावरही गोयल यांनी टीका केली. त्यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टीही माहिती नाहीत असेच दिसते. त्यांच्याच काळात अनेक घोटाळे झाले. नेतृत्वाच्या भीतीने त्यांनी त्यावर निर्णय घेतले नाहीत. एकदोन नव्हे तर कोट्यवधी रूपयांचे घोटाळे झाले तरीही त्यांनी काही केले नाही. त्यांनी देशाला लाचारीच्या अवस्थेत सोडले होते. आम्ही गेल्या ५ वर्षात देशाला समर्थ केले, मात्र तेही त्यांना समजत नाही याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या काळात व्याजदर कमी होता. त्यात आम्ही वाढ केली. देशहित सोडून ते पक्षहित पहात होते, त्यामुळे उद्योग तसेच अर्थव्यवस्थेचेही हानी झाली होती.       भारतीय रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. त्याचे कधीही खासगीकरण केले जाणार नाही. याबाबतच्या बातम्या निराधार आहेत. त्यांच्या काळात रेल्वेची वाढ झाली नाही. आम्ही ती केली. गुंतवणूक वाढवली. अर्थव्यवस्थाही आम्ही सुदृढ करणारच. जागतिक परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. ५ ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेतील १ ट्रिलियन महाराष्ट्राचे असतील असे गोयल म्हणाले. गुरूवारी पुण्यात झालेल्या मोदी यांच्या सभेचाही त्यांनी उल्लेख केला व राज्यात युतीचेच सरकार परत येईल असा विश्वास व्यक्त केला. खासदार गिरीश बापट, भाजपाचे शहर सरचिटणीस गणेश बीडकर, उज्वल केसकर यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलManmohan Singhमनमोहन सिंगPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019