शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 :मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 18:56 IST

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत, अशी टीका रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना केली. ‘नोबेल विजेते भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांचे अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे आहेत व त्यांचा तो विचार भारताने नाकारलेला आहे, त्या विचारांना भारतात थारा नाही असेही ते म्हणाले. 

पुणे : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत, अशी टीका रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना केली. ‘नोबेल विजेते भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांचे अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे आहेत व त्यांचा तो विचार भारताने नाकारलेला आहे, त्या विचारांना भारतात थारा नाही असेही ते म्हणाले. 

    विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पुण्यात आलेल्या गोयल यांनी शुक्रवारी (ता. १८) माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याबद्धल बोलताना ते म्हणाले, बॅनर्जी यांचे नोबेल पुरस्काराबद्धल अभिनंदन. मात्र ते कोणत्या विचारांचे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. ते डाव्या विचारांचे आहेत. काँग्रेसने गरिबांसाठी आणलेल्या न्याय योजनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विचारांना भारताने नाकारले आहे.

         मनमोहनसिंग यांच्यावरही गोयल यांनी टीका केली. त्यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टीही माहिती नाहीत असेच दिसते. त्यांच्याच काळात अनेक घोटाळे झाले. नेतृत्वाच्या भीतीने त्यांनी त्यावर निर्णय घेतले नाहीत. एकदोन नव्हे तर कोट्यवधी रूपयांचे घोटाळे झाले तरीही त्यांनी काही केले नाही. त्यांनी देशाला लाचारीच्या अवस्थेत सोडले होते. आम्ही गेल्या ५ वर्षात देशाला समर्थ केले, मात्र तेही त्यांना समजत नाही याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या काळात व्याजदर कमी होता. त्यात आम्ही वाढ केली. देशहित सोडून ते पक्षहित पहात होते, त्यामुळे उद्योग तसेच अर्थव्यवस्थेचेही हानी झाली होती.       भारतीय रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. त्याचे कधीही खासगीकरण केले जाणार नाही. याबाबतच्या बातम्या निराधार आहेत. त्यांच्या काळात रेल्वेची वाढ झाली नाही. आम्ही ती केली. गुंतवणूक वाढवली. अर्थव्यवस्थाही आम्ही सुदृढ करणारच. जागतिक परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. ५ ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेतील १ ट्रिलियन महाराष्ट्राचे असतील असे गोयल म्हणाले. गुरूवारी पुण्यात झालेल्या मोदी यांच्या सभेचाही त्यांनी उल्लेख केला व राज्यात युतीचेच सरकार परत येईल असा विश्वास व्यक्त केला. खासदार गिरीश बापट, भाजपाचे शहर सरचिटणीस गणेश बीडकर, उज्वल केसकर यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलManmohan Singhमनमोहन सिंगPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019