शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 16:08 IST

Maharashtra Election 2019 : सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजय निश्चित..

ठळक मुद्देराज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेलजमलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दिली दाद

चाकण : काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधक म्हणून काम करता आले नाही. म्हणून शिवसेना सत्ता चालवत होती. आणि संघर्षही करत होती. बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न राज्यापुढे उभे आहेत. हे सर्व प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही. राज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेल. तसेच राज्यात पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, सभेला असलेली गर्दी लक्षात घेता सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजयी निश्चित झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़. चाकण येथील खेड आळंदी विधानसभेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे,यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी आमदार सुरेश गोरे,  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड,  सुलभा उबाळे, रामदास धनवटे, जयप्रकाश परदेशी, प्रकाश वाडेकरआदी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, महायुतीच्या उमेदवारांना मिळणारे मत म्हणजेच जनतेचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी अवघ्या दहा रुपयांत जेवण देता येईल यासाठी हजार भोजनालये सुरु करण्याची आमची योजना आहे़ यामुळे  महिलांना रोजगार मिळेल़ उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना आरक्षण, शेतकºयांना शंभर टक्के कर्जमुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा देण्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यात एक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ सुरेश गोरे म्हणाले, खेड तालुक्यात मागील पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा करताना गुन्हेगारी निपटून काढली. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. गुन्हेगार प्रचारात सक्रिय झाले आहेत. मतदारांमध्ये गावोगावी  भीतीचे  वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्ती गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले़ .......चाकणमधील सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अपक्षांना नाकारा असे आवाहन केले. नवमहाराष्ट्र घडविण्यात साथ देणार का? असा प्रश्न विचारला, यावेळी जमलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली. त्याचप्रमाणे खेड तालुक्यात निवडणूक काळात सुरु झालेली गुन्हेगारी या बाबत आणि खंबीरपणे जनतेच्या सोबत राहणार असल्याबाबत सेनेचे उमेदवार आ. सुरेश गोरे यांनी भाष्य करताच उपस्थित जनसमुदायाने घोषणाबाजी करीत वक्तव्यास दाद दिली.   

टॅग्स :Chakanचाकणkhed-alandi-acखेड आळंदीAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक