शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 16:08 IST

Maharashtra Election 2019 : सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजय निश्चित..

ठळक मुद्देराज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेलजमलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दिली दाद

चाकण : काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधक म्हणून काम करता आले नाही. म्हणून शिवसेना सत्ता चालवत होती. आणि संघर्षही करत होती. बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न राज्यापुढे उभे आहेत. हे सर्व प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही. राज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेल. तसेच राज्यात पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, सभेला असलेली गर्दी लक्षात घेता सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजयी निश्चित झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़. चाकण येथील खेड आळंदी विधानसभेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे,यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी आमदार सुरेश गोरे,  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड,  सुलभा उबाळे, रामदास धनवटे, जयप्रकाश परदेशी, प्रकाश वाडेकरआदी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, महायुतीच्या उमेदवारांना मिळणारे मत म्हणजेच जनतेचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी अवघ्या दहा रुपयांत जेवण देता येईल यासाठी हजार भोजनालये सुरु करण्याची आमची योजना आहे़ यामुळे  महिलांना रोजगार मिळेल़ उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना आरक्षण, शेतकºयांना शंभर टक्के कर्जमुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा देण्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यात एक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ सुरेश गोरे म्हणाले, खेड तालुक्यात मागील पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा करताना गुन्हेगारी निपटून काढली. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. गुन्हेगार प्रचारात सक्रिय झाले आहेत. मतदारांमध्ये गावोगावी  भीतीचे  वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्ती गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले़ .......चाकणमधील सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अपक्षांना नाकारा असे आवाहन केले. नवमहाराष्ट्र घडविण्यात साथ देणार का? असा प्रश्न विचारला, यावेळी जमलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली. त्याचप्रमाणे खेड तालुक्यात निवडणूक काळात सुरु झालेली गुन्हेगारी या बाबत आणि खंबीरपणे जनतेच्या सोबत राहणार असल्याबाबत सेनेचे उमेदवार आ. सुरेश गोरे यांनी भाष्य करताच उपस्थित जनसमुदायाने घोषणाबाजी करीत वक्तव्यास दाद दिली.   

टॅग्स :Chakanचाकणkhed-alandi-acखेड आळंदीAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक