शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 16:08 IST

Maharashtra Election 2019 : सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजय निश्चित..

ठळक मुद्देराज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेलजमलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दिली दाद

चाकण : काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधक म्हणून काम करता आले नाही. म्हणून शिवसेना सत्ता चालवत होती. आणि संघर्षही करत होती. बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न राज्यापुढे उभे आहेत. हे सर्व प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही. राज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेल. तसेच राज्यात पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, सभेला असलेली गर्दी लक्षात घेता सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजयी निश्चित झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़. चाकण येथील खेड आळंदी विधानसभेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे,यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी आमदार सुरेश गोरे,  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड,  सुलभा उबाळे, रामदास धनवटे, जयप्रकाश परदेशी, प्रकाश वाडेकरआदी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, महायुतीच्या उमेदवारांना मिळणारे मत म्हणजेच जनतेचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी अवघ्या दहा रुपयांत जेवण देता येईल यासाठी हजार भोजनालये सुरु करण्याची आमची योजना आहे़ यामुळे  महिलांना रोजगार मिळेल़ उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना आरक्षण, शेतकºयांना शंभर टक्के कर्जमुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा देण्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यात एक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ सुरेश गोरे म्हणाले, खेड तालुक्यात मागील पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा करताना गुन्हेगारी निपटून काढली. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. गुन्हेगार प्रचारात सक्रिय झाले आहेत. मतदारांमध्ये गावोगावी  भीतीचे  वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्ती गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले़ .......चाकणमधील सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अपक्षांना नाकारा असे आवाहन केले. नवमहाराष्ट्र घडविण्यात साथ देणार का? असा प्रश्न विचारला, यावेळी जमलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली. त्याचप्रमाणे खेड तालुक्यात निवडणूक काळात सुरु झालेली गुन्हेगारी या बाबत आणि खंबीरपणे जनतेच्या सोबत राहणार असल्याबाबत सेनेचे उमेदवार आ. सुरेश गोरे यांनी भाष्य करताच उपस्थित जनसमुदायाने घोषणाबाजी करीत वक्तव्यास दाद दिली.   

टॅग्स :Chakanचाकणkhed-alandi-acखेड आळंदीAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक