शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - कॅँटोन्मेंटकरांची साथ कुणाला लाभदायी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 12:18 IST

जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे.

ठळक मुद्दे शेट्टींच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?

- युगंधर ताजणे - प्रत्यक्षात मतदानाकरिता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उमेदवारांनी आता प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला असून, घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन ते करताना दिसत आहे. कँटोन्मेंट मतदारसंघात कुणाचा वरचष्मा राहणार याबाबत विविध मते वर्तविली जात असली तरी या भागात विकासकामांना न्याय देणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. अर्थात पूर्वीपासून कॉँग्रेसचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या मुद्यावर मतदारांकडून मतदानाचे दान पदरात पाडून घेणाऱ्या राजकीय नेत्यांना जनतेने धडा शिकवला आहे. यंदाच्या विधानसभेत काँग्रेसचे रमेश बागवे व भाजपचे सुनील कांबळे या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. यांच्यासह मनसेच्या मनीषा सरोदे, आपकडून खेमदेव सोनवणे, वंचितकडून लक्ष्मण आरडे, एमआयएम पक्षाकडून हीना मोमीन आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र खरी लढत कॉग्रेस व भाजप यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात आहे. कॉँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने भाजपमध्ये केलेला प्रवेश भाजपकरिता कितपत लाभदायी ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. सुरुवातीला शिवसेना, भाजप, कॉँग्रेस या पक्षांमधील काहींनी बंडखोरी करून निवडणूक लढविण्यचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी माघार घेऊन तडजोड करण्यात समाधान मानले. आतापर्यंत एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी, भाजपकडून चंद्रकांत पाटील, अभिनेता सनी देओल, याशिवाय कॉग्रेस राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे आदी मान्यवर नेत्यांच्या प्रचारासभा पार पडल्या आहेत. दोन दिवसांनी प्रचाराचा हा धुरळा खाली बसणार आहे. या मतदारसंघातील जलवाहिनीचा, वाहतूककोंडीचा, झोपडपट्टी पुनर्वसन, रोजगार, महिला सक्षमीकरण, वीजपुरवठ्याचे प्रश्न, असे वेगवेगळे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने मतदार नेमका कुठला विचार करुन कुणाच्या बाजूने आपला कौल देतात हे सांगणे अवघड आहे. मागील अनेक वर्षांपासून नेतृत्व करणाऱ्यापक्षाने देखील मूलभूत सोयीसुविधांना बगल दिली असल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीपुरते फिरकायचे त्यानंतर पुन्हा पाच वर्षे आमदार आणि मतदार यांचा संवादच होत नसल्याचे पाहवयास मिळाले आहे. जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे........ शेट्टींच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?कॉग्रेसचे माजी नगरसेवक व शहर उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे चर्चेला उधाण आले. निवडणुकीच्या सुरुवातीला काँग्रेसकडून बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची भाषा करणाऱ्या शेट्टींचा फायदा नेमका कुणाला होणार, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण असेल. त्यांनी कांबळे यांना दिलेला पाठिंबा कितपत यशस्वी ठरणार? हे चित्र काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानPoliticsराजकारण