शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - कॅँटोन्मेंटकरांची साथ कुणाला लाभदायी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 12:18 IST

जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे.

ठळक मुद्दे शेट्टींच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?

- युगंधर ताजणे - प्रत्यक्षात मतदानाकरिता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उमेदवारांनी आता प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला असून, घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन ते करताना दिसत आहे. कँटोन्मेंट मतदारसंघात कुणाचा वरचष्मा राहणार याबाबत विविध मते वर्तविली जात असली तरी या भागात विकासकामांना न्याय देणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. अर्थात पूर्वीपासून कॉँग्रेसचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या मुद्यावर मतदारांकडून मतदानाचे दान पदरात पाडून घेणाऱ्या राजकीय नेत्यांना जनतेने धडा शिकवला आहे. यंदाच्या विधानसभेत काँग्रेसचे रमेश बागवे व भाजपचे सुनील कांबळे या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. यांच्यासह मनसेच्या मनीषा सरोदे, आपकडून खेमदेव सोनवणे, वंचितकडून लक्ष्मण आरडे, एमआयएम पक्षाकडून हीना मोमीन आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र खरी लढत कॉग्रेस व भाजप यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात आहे. कॉँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने भाजपमध्ये केलेला प्रवेश भाजपकरिता कितपत लाभदायी ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. सुरुवातीला शिवसेना, भाजप, कॉँग्रेस या पक्षांमधील काहींनी बंडखोरी करून निवडणूक लढविण्यचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी माघार घेऊन तडजोड करण्यात समाधान मानले. आतापर्यंत एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी, भाजपकडून चंद्रकांत पाटील, अभिनेता सनी देओल, याशिवाय कॉग्रेस राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे आदी मान्यवर नेत्यांच्या प्रचारासभा पार पडल्या आहेत. दोन दिवसांनी प्रचाराचा हा धुरळा खाली बसणार आहे. या मतदारसंघातील जलवाहिनीचा, वाहतूककोंडीचा, झोपडपट्टी पुनर्वसन, रोजगार, महिला सक्षमीकरण, वीजपुरवठ्याचे प्रश्न, असे वेगवेगळे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने मतदार नेमका कुठला विचार करुन कुणाच्या बाजूने आपला कौल देतात हे सांगणे अवघड आहे. मागील अनेक वर्षांपासून नेतृत्व करणाऱ्यापक्षाने देखील मूलभूत सोयीसुविधांना बगल दिली असल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीपुरते फिरकायचे त्यानंतर पुन्हा पाच वर्षे आमदार आणि मतदार यांचा संवादच होत नसल्याचे पाहवयास मिळाले आहे. जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे........ शेट्टींच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?कॉग्रेसचे माजी नगरसेवक व शहर उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे चर्चेला उधाण आले. निवडणुकीच्या सुरुवातीला काँग्रेसकडून बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची भाषा करणाऱ्या शेट्टींचा फायदा नेमका कुणाला होणार, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण असेल. त्यांनी कांबळे यांना दिलेला पाठिंबा कितपत यशस्वी ठरणार? हे चित्र काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानPoliticsराजकारण