शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - कॅँटोन्मेंटकरांची साथ कुणाला लाभदायी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 12:18 IST

जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे.

ठळक मुद्दे शेट्टींच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?

- युगंधर ताजणे - प्रत्यक्षात मतदानाकरिता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उमेदवारांनी आता प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला असून, घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन ते करताना दिसत आहे. कँटोन्मेंट मतदारसंघात कुणाचा वरचष्मा राहणार याबाबत विविध मते वर्तविली जात असली तरी या भागात विकासकामांना न्याय देणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. अर्थात पूर्वीपासून कॉँग्रेसचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या मुद्यावर मतदारांकडून मतदानाचे दान पदरात पाडून घेणाऱ्या राजकीय नेत्यांना जनतेने धडा शिकवला आहे. यंदाच्या विधानसभेत काँग्रेसचे रमेश बागवे व भाजपचे सुनील कांबळे या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. यांच्यासह मनसेच्या मनीषा सरोदे, आपकडून खेमदेव सोनवणे, वंचितकडून लक्ष्मण आरडे, एमआयएम पक्षाकडून हीना मोमीन आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र खरी लढत कॉग्रेस व भाजप यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात आहे. कॉँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने भाजपमध्ये केलेला प्रवेश भाजपकरिता कितपत लाभदायी ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. सुरुवातीला शिवसेना, भाजप, कॉँग्रेस या पक्षांमधील काहींनी बंडखोरी करून निवडणूक लढविण्यचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी माघार घेऊन तडजोड करण्यात समाधान मानले. आतापर्यंत एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी, भाजपकडून चंद्रकांत पाटील, अभिनेता सनी देओल, याशिवाय कॉग्रेस राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे आदी मान्यवर नेत्यांच्या प्रचारासभा पार पडल्या आहेत. दोन दिवसांनी प्रचाराचा हा धुरळा खाली बसणार आहे. या मतदारसंघातील जलवाहिनीचा, वाहतूककोंडीचा, झोपडपट्टी पुनर्वसन, रोजगार, महिला सक्षमीकरण, वीजपुरवठ्याचे प्रश्न, असे वेगवेगळे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने मतदार नेमका कुठला विचार करुन कुणाच्या बाजूने आपला कौल देतात हे सांगणे अवघड आहे. मागील अनेक वर्षांपासून नेतृत्व करणाऱ्यापक्षाने देखील मूलभूत सोयीसुविधांना बगल दिली असल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीपुरते फिरकायचे त्यानंतर पुन्हा पाच वर्षे आमदार आणि मतदार यांचा संवादच होत नसल्याचे पाहवयास मिळाले आहे. जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे........ शेट्टींच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?कॉग्रेसचे माजी नगरसेवक व शहर उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे चर्चेला उधाण आले. निवडणुकीच्या सुरुवातीला काँग्रेसकडून बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची भाषा करणाऱ्या शेट्टींचा फायदा नेमका कुणाला होणार, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण असेल. त्यांनी कांबळे यांना दिलेला पाठिंबा कितपत यशस्वी ठरणार? हे चित्र काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानPoliticsराजकारण