शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

Maharashtra election 2019 : किल्ल्यावर छमछमची एवढी हौस असेल तर चौफुल्याला जा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 20:39 IST

महाराष्ट्र राज्य सरकारच्या गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे उदयनराजे भोसले यांनीही गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयाची पाठराखण केली असताना पवार यांनी मात्र नाव न घेता टोला लगावला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य सरकारच्या गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे उदयनराजे भोसले यांनीही गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयाची पाठराखण केली असताना पवार यांनी मात्र नाव न घेता टोला लगावला आहे. किल्ल्यावर छमछम करण्याची एवढीच हौस असेल तर चौफुल्याला जा अशा शब्दात पवार यांनी निशाणा साधला आहे. हडपसर येथे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

छत्रपती उदयनराजे भोसले एका इंग्रजी वृत्तपत्राला गडकिल्ले लग्न समारंभास दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल अशी मुलाखत दिली आहे. त्यावर आता पवार यांनी नाव न घेता याच मुद्द्यावर घणाघात केला आहे. या विधानाचा निषेध करताना सांस्कृतिक केंद्रांसाठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्यातील चौफुला ठिकाणी जाण्यास सुचवले. 

ते म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि राज्यातील किल्ले लग्न कार्यासाठी द्यायचे हे धोरण चुकीचे आहे. किल्ले हा महाराष्ट्राचा, मराठ्यांचा इतिहास आहे. एवढा बार, छमछममध्ये रस असेल तर चौफुल्याला जा आणि काय करायचे ते करा'. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. फडणवीस यांनी आमचा पहिलवान तेल पहिलवान तेल लावून तयार आहे. पण समोर कुस्ती खेळायला कोणी नाही असा टोला विरोधकांना लगावला होता. त्यावर आता पवार यांनी उत्तर दिलेले बघायला मिळत आहे. पवार यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही हवे तिकडे पहिलवान उभे करु हाकतो, कारण महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष मी आहे. सगळे जिल्हे, सगळ्या कुस्ती संघटनांचा अध्यक्ष मी आहे. मी राजकारणाबाहेर खेळाच्या क्षेत्रातही काम केले. मी मुंबई, महाराष्ट्र आणि जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मला अनेक खेळाडू तयार करण्यात रस आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला पहिलवान वगैरे गोष्टी सांगू नका. आम्ही हवे तितके लोक तयार केलेत असेही ते म्हणाले. 

यावेळी पवार यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • राज्य भाजपच्या हातात आहे. राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे. तुमच्याकडे प्रपंच दिला आणि तुम्ही आम्हाला विचारताय आम्ही काय केलं ? फडणवीस साहेब  हे वागणं बरं नवं, जरा नीट वागलं पाहिजे. आम्ही काय केलं हे महाराष्ट्राला माहीती आहे. 

 

  • भाजपचा दावा आहे की लोक आमच्या बाजूने आहेत. मग देशाचे पंतप्रधान ८ सभा का घेतात, गृहमंत्री राज्यात २० सभा का घेत आहे ? आणि असं असूनही आम्हाला विचारतात काय केल ?

 

  • अमित शहा यांना प्रश्न विचारतो, पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होत ? फक्त गुजरातच्या लोकांना माहिती होत.आणि तेच आम्हाला येऊन विचारतात तुम्ही काय केलं. 

 

  • शिवछत्रपतींचे स्मारक करतो हे सरकारने जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावलं, जलपूजन केलं आणि पाच वर्षांत वीटही उभारली नाही. 

 

  • अमित शहा आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना माझे नाव घेतल्याशिवाय भाषण करता येत नाही. मोदींचा काही प्रश्न नाही पण दुसऱ्यांनी घेतले तर घरातले पण विचारतील. मात्र त्यांना माझे नाव घेतल्याने शांत झोप लागत असेल तर हरकत नाही. 
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस