शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Maharashtra Election 2019 : भावनाशील मुद्दे जुन्नरमध्ये प्रभावी ठरणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 3:11 PM

तिरंगी लढत : नेत्यांच्या सभा, असंतुष्टांचे समाधान यावरही निकालाचे भवितव्य 

विकास चाटी - जुन्नर विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळी भावनाशीलता हा मुद्दा प्रभावी ठरला होता. तसाच तो यंदाही ठरणार आहे. विकासाचे मुद्दे, कामाचा श्रेयवाद, असंतुष्टांचे समाधान हेही कळीचे मुद्दे ठरणार आहेत.  जुन्नरमध्ये गेल्या वेळी शिवसेनेच्या आशा बुचके व मनसेचे शरद सोनवणे यांच्यात सामना रंगला होता. सोनवणे पूर्वीही शिवसेनेत होते. दोन वेळा त्यांना उमेदवारी डावलून बुचके यांना दिल्याने सोनवणेंवर अन्याय होत असल्याची भावना मतदारांमध्ये होती. दशक्रिया विधी, गुणवंतांचे सत्कार असे सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे जनतेची सहानुभूती मिळून सोनवणे सुमारे १७ हजार मताधिक्याने विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात असलेल्या नाराजीचा फायदाही त्यांना झाला होता. यंदा मात्र त्यांच्याविरोधात जनभावना निर्माण करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल बेनके यांना बरेच यश मिळाले आहे. सतत चार वर्षे पुढे असलेले सोनवणे गेल्या काही महिन्यांत प्रभाव कायम ठेवण्यात कमी पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी दुष्काळात धरणांचे पाणी नियोजन करण्यात सोनवणे कमी पडल्याची भावना विरोधकांनी शेतकºयांमध्ये निर्माण केली आहे. भरीस भर शिवसेनेच्या रणरागिणी अशी ओळख आशा बुचके यांना शिवसेनेतून काढण्यामागे सोनवणेच जबाबदार असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण करण्यात बुचके यशस्वी ठरत आहेत. सोनवणेंचा सेनेत प्रवेश जुन्या शिवसैनिकांबरोबरच भाजप कार्यकर्त्यांना पटलेला नाही. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सोनवणे यांनी शिवसेनेचे उमेदवार पाडल्याचा राग जुन्या शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळे शिवसेनेची हक्काची मते सोनवणे यांना किती मिळतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दीड वर्षापूर्वी चाळकवाडी टोलनाका बंद करण्याच्या आंदोलनात बेनके सोनवणे यांच्यापेक्षा प्रभावी ठरले. सोनवणे यांना विधानसभा अधिवेशन अर्धवट सोडून अचानक टोलनाका बंद करण्यासाठी यावे लागले........पवार व कोल्हे फॅक्टर  बेनके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार प्रथमच जुन्नरमध्ये आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. खासदार अमोल कोल्हे यांचा जुन्नर हा मूळ तालुका आहे. कोल्हेंबद्दल तरुणांमध्ये क्रेझ आहे. शिवाजीराव आढळराव जिंकायचे तेव्हा त्यांना तालुक्यातून २० हजारांपर्यंत मताधिक्य मिळत असे. खासदार कोल्हे यांना सुमारे ४१ हजारांचे मताधिक्य मिळाले यातून हे दिसून येते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोल्हे यांची सभा ठेवली आहे, त्याचा कितपत प्रभाव पडतो हे महत्त्वाचे ठरणार आहे........ 

टॅग्स :Junnarजुन्नरjunnar-acजुन्नरPoliticsराजकारणElectionनिवडणूक