शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Maharashtra Election 2019 : भाजपा Vs. राष्ट्रवादी Vs. राष्ट्रवादी... पक्ष दोन, पण लढत तिरंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 13:48 IST

खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीची असलेली जास्त ताकदच तिला घातक ठरली आहे.

ठळक मुद्देबरे झाले रमेश कोंडेंनी माघार घेतली!

विशाल शिर्के 

मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये खडकवासला मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात ग्रामीण मतदार तुलनेने अधिक आहेत. किरकटवाडी, सोनापूर, सांगरून, खेड-शिवापूरचा ग्रामीण भाग आणि धनकवडी, वारजे, नऱ्हे आंबेगाव आणि कोथरूड, सिंहगड रस्त्याचा काही शहरी भाग या मतदारसंघात येतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर यांना मतदारांनी दोनदा संधी दिली. या मतदारसंघातील भागावर राष्ट्रवादीचे वर्चव राहिले आहे. आजही आजी-माजी नगरसेवक राष्ट्रवादीचेच अधिक आहेत. खुद्द तापकीर वास्तव्यास असलेल्या वॉर्डमधे तीन नगरसेवक राष्ट्रवादीचेच आहेत.असे असतानाही राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नाही. राष्ट्रवादीची असलेली जास्त ताकदच तिला घातक ठरली आहे. इतक्या दिवस आपल्या आजूबाजूला असलेली व्यक्ती आपल्या डोक्यावर नको असल्यानेच राष्ट्रवादीला यश मिळालेले नाही.त्या उलट भाजपचे या भागात फारसे अस्तित्व नव्हते. त्यामुळे कोणी कुरघोडी करण्याचा प्रश्नच नाही. तापकीर यांना नगरसेवकाचे तिकीट देण्यातही सुरुवातीला दिवंगत सतीश मिसाळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे वांजळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर तापकीर यांना संधी मिळाली.राष्ट्रवादीने आमदार वांजळे यांच्या पत्नी हर्षदा यांना ऐनवेळी तिकीट दिलेले मतदारांना रुचले नाही. तापकीर विजयी झाले. पुढच्या निवडणुकीत मोदी लाटेच्या जोरावर शहरात आठही जागांवर भाजप आले. मतदारसंघ अजूनही वाहतूककोंडी, मंडई, करमणूक केंद्र, उद्याने, मैदान अशा पारंपरिक प्रश्नातच अडकले आहे. भाजपच्या उमेदवाराला प्रतिस्पर्धीच नसल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. भाजपची लढत राष्ट्रवादीशी असली तरी, राष्ट्रवादीची खरी लढत ही पक्षातील नेत्यांशीच आहे.

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य २०१४च्या निवडणुकीत याच भागाने घटविले होते. मात्र, २०१९च्या निवडणुकीत  स्थानिकांनी एकदिलाने केलेल्या प्रचारामुळे सुळेंचे मताधिक्य लाखावर गेले. त्याच पद्धतीने पक्ष म्हणून काम केल्यास राष्ट्रवादी भाजपला टक्कर देऊ शकते. तूर्तास, दोन्ही पक्षांनी पदयात्रा, रॅली, सभा आणि प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटींनी वातावरण तयार केले आहे........बरे झाले रमेश कोंडेंनी माघार घेतली!शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे हे खेड-शिवापूर परिसरातील. त्यांचे आप्तेष्ट हे कात्रज, धनकवडी, नºहे आंबेगाव आणि परिसरात राहणारे. त्यांनी या भागात गेली पाच वर्षे सातत्याने संपर्क ठेवला होता. सुख-दु:खाच्या प्रसंगात ते हजर असत. त्यांची बंडखोरी कायम राहिली असती, तर अर्थातच भाजपला फटका बसला असता. त्यांच्या माघारीने भाजपवाले, बरे झाले कोंडेंनी माघार घेतली, असेच म्हणत असतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019khadakwasala-acखडकवासलाPoliticsराजकारणPuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेncp youth double murderराष्ट्रवादी युवक दुहेरी हत्याकांड