शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

12th Result | पुणे विभागात सोलापूर जिल्हा ठरला दुसऱ्यांदा अव्वल, पुण्याचा नंबर शेवटचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 20:20 IST

पुण्याची एकूण टक्केवारी ९१.४६ टक्के ...

पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारवी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर केला. यात पुणे विभागात सोलापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. सोलापूर जिल्ह्याची टक्केवारी ९४.१५ ऐवढी आहे. त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्याचा निकाल ९३.६० टक्के लागला आहे. तर पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला असून निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. पुणे विभागात २० हजार १५१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तर गैरमार्गाने परीक्षा दिल्याने तीन विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ. वंदना वाहूळ आणि विभागीय सचिव अनुराधा ओक यांनी दिली.पुणे विभागात एकूण २ लाख ४९ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख २९ हजार ६४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाची निकालाची एकूण टक्केवारी ९२.६१ आहे. त्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.५९, तर मुलांचे ९१.०४ इतके आहे. तर पुनपरीक्षार्थी अर्थात रीपीटर विद्यार्थ्यांचा पुणे विभागाचा निकाल ४७.९१ टक्‍के लागला आहे.

सोलापूर जिल्ह्याचा निकाल : (९४.१५ टक्के)सोलापूर जिल्ह्यातील ५४ हजार ७९२ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ४७९ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ५१ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९४.१५ टक्के इतकी आहे. सोलापुरात अनुत्तीर्णाची संख्या ३ हजार ४९७ इतकी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.७५, तर मुलींचे ९६.११ टक्के इतकी आहे.अहमदनगर जिल्ह्याचा निकाल : (९१.४६ टक्के)अहमदनगर जिल्ह्यातील ६४ हजार ९०१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार २३४ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ६० हजार १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर निकालाची टक्केवारी ९३.६० टक्के इतकी आहे. नगर जिल्ह्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ७७७ इतकी आहे. मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९६.४१, तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.५८ टक्के इतकी आहे.

पुणे जिल्ह्याचा निकाल : (९१.४६ टक्के)पुणे जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १०३ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २९ हजार २५७ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून १ लाख १८ हजार २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९१.४६ टक्के इतकी आहे. म्हणजेच पुण्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ११ हजार ८७७ एवढी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.९८ टक्के तर मुलींचे ९३.१९ टक्के आहे.

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकाल