शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

महाभारत हे ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही - नितीश भारद्वाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 22:20 IST

आज महाकाव्यांच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली जाते. पण महाभारत ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही. भारतीय वारसा म्हणून त्याच्याकडे पाहायला हवे. 

पुणे  - आज महाकाव्यांच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली जाते. पण महाभारत ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही. भारतीय वारसा म्हणून त्याच्याकडे पाहायला हवे.  महाकाव्यांवर संशोधन झाले आहे.’कुतूहल’ असणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र फक्त हिंदू धर्माला  प्रश्न विचारू नका, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात हे असचं आहे का? असे प्रश्न देखील पडूद्यात, असे मत महाभारतातील ‘श्रीकृष्ण’ नितीश भारद्वाज यांनी लगावला.        ‘महाभारत’चे गारूड आजही प्रेक्षकांवर आहे, कारण  बी.आर चोप्रा यांनी ही मालिका पैशासाठी निर्मित केली नव्हती. मात्र सध्या मालिकांमध्ये पैसा आणि तंत्रज्ञानाचा  मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. आज जे महाभारत पडद्यावर दाखविले जात आहे, त्यामध्ये अर्जुन आणि भीम सिक्स पँकमध्ये दाखविले जात आहेत. मालिकेमध्ये स्पेशल इफेक्टस आहेत पण ‘प्राण’ नाहीत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.दूरचित्रवाणीवर अजरामर ठरलेल्या  ‘महाभारत’ या मालिकेला नुकतीच तीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त‘परिवर्तन इव्हेंटस’, राष्ट्रीय चित्रपट संग्रहलाय आणि म्युटेश यांच्यातर्फे डॉ. नितीश भारद्वाज यांच्याशी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ’महाभारत’चे सामाजिक जीवनातील स्थान, त्याचे कालसुसंगत संदर्भ, श्रीकृष्ण ची वाट्याला आलेली भूमिका अशा अनुभव कथनातून या ‘श्रीकृष्णा’ने महाभारताचे सार विशद केले.’महाभारत’ जीवनाचे प्रतिबिंब आहे. समाजात जे काही घडते ते महाभारतात दिसते. ती जणू जीवनाची एक कथा आहे.  ‘महाभारत’ हे कालसुसंगत आणि प्रासंगिक आहे. महाभारतातील प्रत्येक पात्र  ‘ग्रे’ आहे. अशी पात्र आसपास जीवनातही भेटतात. म्हणून महाभारत हे केवळ अध्यात्मिक दृष्टीकोनातून वाचले जाता कामा नये. बाहेरच्या समाजाशी कसे वर्तन करावे हे महाभारतातून कळते. चूक किंवा  बरोबर काय आहे? मर्यादा काय आहेत हे महाभारत शिकविते.महाभारतात प्रत्येक व्यक्तीने प्रतिज्ञा घेतली आहे. तिथे शब्दाला जागणं होतं. लिखित शब्दांची आवश्यकता नव्हती. आज न्यायालयात न्यायाधीशांसमोर प्रतिज्ञा घेतली जाते मात्र केसेसची  कागदपत्रे वर्षोनुवर्षे पडून आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. स्वीकारणं म्हणजे परिवर्तन आहे. ऋतुप्रमाणे मनुष्याने बदलायला हवं. मला हवं तस स्वीकारावं ही मानसिकता बदलायला हवी. सध्याच्या समाजव्यवस्थेत  महिला अत्याचार, कपटातून गोष्टी बळकावणे, भ्रष्टाचार हा अधिकार बनला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.आज कोणतीही गोष्ट तात्काळ शोधायचे तर ‘गुगल’ हा पर्याय आहे. मात्र ते केवळ  माहिती संकललाचे  माध्यम आहे, पण ते अचूक आहे का त्याची प्रमाणता बघण्यासाठी  पुस्तकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. इथ माझं  ‘मीटू’ होणार नाहीकृष्णाच्या अनेक गोपिका होत्या असे म्हटले जाते. पण ’कृष्ण’ म्हणजे एक समर्पण भाव आहे. घुसमटीत जीवन जगणा-या समाजाला पंधरा वर्षाचा मुलगा बासरीच्या धूनेतून मोहित करतो...इथं माझं नक्कीच  ‘मीटू’ होणार नाही अशी मिस्किल टिप्पणी त्यांनी केली. ’कृष्ण’ कसा झालो’महाभारत’ साठी आॅडिशन द्यायला गेलो होतो. माझ वय केवळ 23-24 वर्षांच होते. रवी चोप्रा यांच्या डोक्यात मी कृष्ण म्हणून मुळीच नव्हतो. माझ्या वाटयाला  ‘विदुर’ आणि मग  ‘नकुल’ अशा भूमिका आल्या. ज्या मी नाकारल्या. गुंफी पटेल यांचा फोन आला की तू  ‘कृष्णाकरिता आॅडिशन द्यायला ये. पण मी गेलो नाही. त्यादरम्यान एक मराठी आणि हिंदी चित्रपट केला. अचानक रवी चोप्रा पुन्हा स्टुडिओत भेटले. तेव्हा कृष्णाची आॅडिशन द्यायला का येत नाहीस? असे विचारले. कृष्ण महानायक आहे. महाभारताचा केंद्रबिंदू आहेत्यामुळे कृष्णाची भूमिका पेलू शकत नाही असे सांगितले. पण खूप आग्रह केल्यामुळे गेलो आणि माझी भूमिकेसाठी निवड झाली असल्याचा अनुभव नितीश भारद्वाज यांनी सांगितला.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकPuneपुणे