शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

महाभारत हे ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही - नितीश भारद्वाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 22:20 IST

आज महाकाव्यांच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली जाते. पण महाभारत ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही. भारतीय वारसा म्हणून त्याच्याकडे पाहायला हवे. 

पुणे  - आज महाकाव्यांच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली जाते. पण महाभारत ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही. भारतीय वारसा म्हणून त्याच्याकडे पाहायला हवे.  महाकाव्यांवर संशोधन झाले आहे.’कुतूहल’ असणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र फक्त हिंदू धर्माला  प्रश्न विचारू नका, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात हे असचं आहे का? असे प्रश्न देखील पडूद्यात, असे मत महाभारतातील ‘श्रीकृष्ण’ नितीश भारद्वाज यांनी लगावला.        ‘महाभारत’चे गारूड आजही प्रेक्षकांवर आहे, कारण  बी.आर चोप्रा यांनी ही मालिका पैशासाठी निर्मित केली नव्हती. मात्र सध्या मालिकांमध्ये पैसा आणि तंत्रज्ञानाचा  मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. आज जे महाभारत पडद्यावर दाखविले जात आहे, त्यामध्ये अर्जुन आणि भीम सिक्स पँकमध्ये दाखविले जात आहेत. मालिकेमध्ये स्पेशल इफेक्टस आहेत पण ‘प्राण’ नाहीत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.दूरचित्रवाणीवर अजरामर ठरलेल्या  ‘महाभारत’ या मालिकेला नुकतीच तीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त‘परिवर्तन इव्हेंटस’, राष्ट्रीय चित्रपट संग्रहलाय आणि म्युटेश यांच्यातर्फे डॉ. नितीश भारद्वाज यांच्याशी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ’महाभारत’चे सामाजिक जीवनातील स्थान, त्याचे कालसुसंगत संदर्भ, श्रीकृष्ण ची वाट्याला आलेली भूमिका अशा अनुभव कथनातून या ‘श्रीकृष्णा’ने महाभारताचे सार विशद केले.’महाभारत’ जीवनाचे प्रतिबिंब आहे. समाजात जे काही घडते ते महाभारतात दिसते. ती जणू जीवनाची एक कथा आहे.  ‘महाभारत’ हे कालसुसंगत आणि प्रासंगिक आहे. महाभारतातील प्रत्येक पात्र  ‘ग्रे’ आहे. अशी पात्र आसपास जीवनातही भेटतात. म्हणून महाभारत हे केवळ अध्यात्मिक दृष्टीकोनातून वाचले जाता कामा नये. बाहेरच्या समाजाशी कसे वर्तन करावे हे महाभारतातून कळते. चूक किंवा  बरोबर काय आहे? मर्यादा काय आहेत हे महाभारत शिकविते.महाभारतात प्रत्येक व्यक्तीने प्रतिज्ञा घेतली आहे. तिथे शब्दाला जागणं होतं. लिखित शब्दांची आवश्यकता नव्हती. आज न्यायालयात न्यायाधीशांसमोर प्रतिज्ञा घेतली जाते मात्र केसेसची  कागदपत्रे वर्षोनुवर्षे पडून आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. स्वीकारणं म्हणजे परिवर्तन आहे. ऋतुप्रमाणे मनुष्याने बदलायला हवं. मला हवं तस स्वीकारावं ही मानसिकता बदलायला हवी. सध्याच्या समाजव्यवस्थेत  महिला अत्याचार, कपटातून गोष्टी बळकावणे, भ्रष्टाचार हा अधिकार बनला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.आज कोणतीही गोष्ट तात्काळ शोधायचे तर ‘गुगल’ हा पर्याय आहे. मात्र ते केवळ  माहिती संकललाचे  माध्यम आहे, पण ते अचूक आहे का त्याची प्रमाणता बघण्यासाठी  पुस्तकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. इथ माझं  ‘मीटू’ होणार नाहीकृष्णाच्या अनेक गोपिका होत्या असे म्हटले जाते. पण ’कृष्ण’ म्हणजे एक समर्पण भाव आहे. घुसमटीत जीवन जगणा-या समाजाला पंधरा वर्षाचा मुलगा बासरीच्या धूनेतून मोहित करतो...इथं माझं नक्कीच  ‘मीटू’ होणार नाही अशी मिस्किल टिप्पणी त्यांनी केली. ’कृष्ण’ कसा झालो’महाभारत’ साठी आॅडिशन द्यायला गेलो होतो. माझ वय केवळ 23-24 वर्षांच होते. रवी चोप्रा यांच्या डोक्यात मी कृष्ण म्हणून मुळीच नव्हतो. माझ्या वाटयाला  ‘विदुर’ आणि मग  ‘नकुल’ अशा भूमिका आल्या. ज्या मी नाकारल्या. गुंफी पटेल यांचा फोन आला की तू  ‘कृष्णाकरिता आॅडिशन द्यायला ये. पण मी गेलो नाही. त्यादरम्यान एक मराठी आणि हिंदी चित्रपट केला. अचानक रवी चोप्रा पुन्हा स्टुडिओत भेटले. तेव्हा कृष्णाची आॅडिशन द्यायला का येत नाहीस? असे विचारले. कृष्ण महानायक आहे. महाभारताचा केंद्रबिंदू आहेत्यामुळे कृष्णाची भूमिका पेलू शकत नाही असे सांगितले. पण खूप आग्रह केल्यामुळे गेलो आणि माझी भूमिकेसाठी निवड झाली असल्याचा अनुभव नितीश भारद्वाज यांनी सांगितला.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकPuneपुणे