शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा ताेंडाला पाने पुसण्याचे काम : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 20:31 IST

महाविकास आघाडीने केलेल्या कर्जमाफीवर टीका करताना शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली.

पुणे : शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीन पक्षांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. पण आता केवळ दोन लाख रुपयांचे कर्जमाफ करण्याची घोषणा करुन सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान महामंडळांवर तीन वर्षांसाठी नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या महाविकासआघाडी सरकारकडून खंडीत करणार असल्याची चर्चा आहे. परंतु कायद्यानुसार या नियुक्त्या देण्यात येत असून, सरकार बदलले म्हणून नियुक्त्या रद्द करणे चुकीचे आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने तसे केल्यास शासनाच्या विरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा देखील त्यांनी दिला.

रिपाइच्या (आठवले ) राज्य कार्यकारीणीची बैठक रविवारी पुण्यात अल्पबचत भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बाेलत हाेते. आठवले म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून मतभेद आहेत. दोन्ही भिन्न विचारधारेचे पक्ष असल्याने त्यांच्यात पुन्हा-पुन्हा मतभेदाचे मुद्दे येत राहतील. त्यामुळे त्यांनी वेगळे व्हायला हवे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येत सरकार स्थापन करावे, असे वाटते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा मोठाच प्रश्न आहे.     

दरम्यान केंद्र शासनाने मंजूर केलेले नागरिकत्व दुरुस्ती कायदा भारतातील मुस्लिमांच्या विरोधात नाही. सध्या विधेयकाच्या गैरसमजुतीतून आंदोलने सुरु असून, काँगेस्र मुस्लिम लोकांना भडकविण्याचे काम करीत आहे. आपल्या देशात हिंसक आंदोलन होणे योग्य नाही, विधेयक पारित होत असताना अमित शहा यांनी देशातील मुस्लिमांना यामुळे कोणताही त्रास होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंदोलन करणे थांबवावे असे आवाहन आठवले यांनी केले. 

आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबंध नाहीएल्गार परिषदेत नक्षलवादी विचारांचे लोक होते, हे पुढे आले आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे दोन वेगळे विषय आहेत. आम्ही आंबेडकरवादी आहोत. आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबध नाही. हिंसेला हिंसेने उत्तर योग्य नाही. दोषींवर कारवाई व्हावी. एल्गार प्रकरणी पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारल्यास त्यांचे कल्याणच होईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे  सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPuneपुणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी