शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा ताेंडाला पाने पुसण्याचे काम : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 20:31 IST

महाविकास आघाडीने केलेल्या कर्जमाफीवर टीका करताना शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली.

पुणे : शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीन पक्षांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. पण आता केवळ दोन लाख रुपयांचे कर्जमाफ करण्याची घोषणा करुन सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान महामंडळांवर तीन वर्षांसाठी नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या महाविकासआघाडी सरकारकडून खंडीत करणार असल्याची चर्चा आहे. परंतु कायद्यानुसार या नियुक्त्या देण्यात येत असून, सरकार बदलले म्हणून नियुक्त्या रद्द करणे चुकीचे आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने तसे केल्यास शासनाच्या विरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा देखील त्यांनी दिला.

रिपाइच्या (आठवले ) राज्य कार्यकारीणीची बैठक रविवारी पुण्यात अल्पबचत भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बाेलत हाेते. आठवले म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून मतभेद आहेत. दोन्ही भिन्न विचारधारेचे पक्ष असल्याने त्यांच्यात पुन्हा-पुन्हा मतभेदाचे मुद्दे येत राहतील. त्यामुळे त्यांनी वेगळे व्हायला हवे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येत सरकार स्थापन करावे, असे वाटते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा मोठाच प्रश्न आहे.     

दरम्यान केंद्र शासनाने मंजूर केलेले नागरिकत्व दुरुस्ती कायदा भारतातील मुस्लिमांच्या विरोधात नाही. सध्या विधेयकाच्या गैरसमजुतीतून आंदोलने सुरु असून, काँगेस्र मुस्लिम लोकांना भडकविण्याचे काम करीत आहे. आपल्या देशात हिंसक आंदोलन होणे योग्य नाही, विधेयक पारित होत असताना अमित शहा यांनी देशातील मुस्लिमांना यामुळे कोणताही त्रास होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंदोलन करणे थांबवावे असे आवाहन आठवले यांनी केले. 

आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबंध नाहीएल्गार परिषदेत नक्षलवादी विचारांचे लोक होते, हे पुढे आले आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे दोन वेगळे विषय आहेत. आम्ही आंबेडकरवादी आहोत. आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबध नाही. हिंसेला हिंसेने उत्तर योग्य नाही. दोषींवर कारवाई व्हावी. एल्गार प्रकरणी पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारल्यास त्यांचे कल्याणच होईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे  सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPuneपुणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी