शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा ताेंडाला पाने पुसण्याचे काम : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 20:31 IST

महाविकास आघाडीने केलेल्या कर्जमाफीवर टीका करताना शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली.

पुणे : शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीन पक्षांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. पण आता केवळ दोन लाख रुपयांचे कर्जमाफ करण्याची घोषणा करुन सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान महामंडळांवर तीन वर्षांसाठी नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या महाविकासआघाडी सरकारकडून खंडीत करणार असल्याची चर्चा आहे. परंतु कायद्यानुसार या नियुक्त्या देण्यात येत असून, सरकार बदलले म्हणून नियुक्त्या रद्द करणे चुकीचे आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने तसे केल्यास शासनाच्या विरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा देखील त्यांनी दिला.

रिपाइच्या (आठवले ) राज्य कार्यकारीणीची बैठक रविवारी पुण्यात अल्पबचत भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बाेलत हाेते. आठवले म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून मतभेद आहेत. दोन्ही भिन्न विचारधारेचे पक्ष असल्याने त्यांच्यात पुन्हा-पुन्हा मतभेदाचे मुद्दे येत राहतील. त्यामुळे त्यांनी वेगळे व्हायला हवे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येत सरकार स्थापन करावे, असे वाटते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा मोठाच प्रश्न आहे.     

दरम्यान केंद्र शासनाने मंजूर केलेले नागरिकत्व दुरुस्ती कायदा भारतातील मुस्लिमांच्या विरोधात नाही. सध्या विधेयकाच्या गैरसमजुतीतून आंदोलने सुरु असून, काँगेस्र मुस्लिम लोकांना भडकविण्याचे काम करीत आहे. आपल्या देशात हिंसक आंदोलन होणे योग्य नाही, विधेयक पारित होत असताना अमित शहा यांनी देशातील मुस्लिमांना यामुळे कोणताही त्रास होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंदोलन करणे थांबवावे असे आवाहन आठवले यांनी केले. 

आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबंध नाहीएल्गार परिषदेत नक्षलवादी विचारांचे लोक होते, हे पुढे आले आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे दोन वेगळे विषय आहेत. आम्ही आंबेडकरवादी आहोत. आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबध नाही. हिंसेला हिंसेने उत्तर योग्य नाही. दोषींवर कारवाई व्हावी. एल्गार प्रकरणी पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारल्यास त्यांचे कल्याणच होईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे  सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPuneपुणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी