शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

वेडी माणसे इतिहास घडवतात - बाबासाहेब पुरंदरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:50 IST

इतिहासात चंदनही आहे, कोळसाही आहे. त्यामुळे त्यातील नेमके काय घ्यायचे हे आपण ठरवायला हवे, एखाद्या गोष्टीचे वेड लावून घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही.

पुणे : इतिहासात चंदनही आहे, कोळसाही आहे. त्यामुळे त्यातील नेमके काय घ्यायचे हे आपण ठरवायला हवे, एखाद्या गोष्टीचे वेड लावून घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेडी माणसे इतिहास निर्माण करतात. युवक-युवतींनी रायगडाचे दर्शन आयुष्यात एकदातरी घ्यायला हवे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया ‘किल्ले रायगड’ वर ५० वर्षांपूर्वी केलेला दुर्मिळ लघुपट पाहण्याची संधी चित्रपट रसिकांना प्राप्त झाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात लघुपटाचे प्रदर्शन केले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून हा लघुपट तयार करण्यात आला होता. या लघुपटाचे दिग्दर्शन माधव शिंदे यांनी केले होते. त्या वेळी त्याची अवस्था खराब होती. परंतु, संग्रहालयाने तांत्रिक सोपस्कार करून तो लघुपट प्रदर्शनासाठी तयार केला. या वेळी बाबासाहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला.बाबासाहेब म्हणाले, की ६ दिवस रायगडावर मुक्काम करून आम्ही हा लघुपट तयार केला. या लघुपटामध्ये ऐतिहासिक प्रसंगांची चित्रे दाखविण्याची कल्पना लतादीदींची होती. या लघुपटाला हृदयनाथ मंगेशकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.रायगडाबद्दल ते पुढे म्हणाले, देशद्रोही, राजद्रोही लोकांना रायगडावरून कडेलोट केले जायचे. मात्र, किल्ला शिवाजीमहाराजांच्या ताब्यात आल्यानंतर एकही कडेलोट झाला नाही. महाराजांच्या काळात एकही राजद्रोह झाला नाही. १८१८ ते १८८० या काळात रायगडावर जाण्यास बंदी घातली. तरुणांमध्ये स्वराज्याची प्रेरणा पुन्हा जागृत होऊ नये, यासाठी ही बंदी घातली होती. रायगडावर विजय मिळविल्यानंतर औरंगजेबाने रायगडाचे नाव बदलून इस्लामगड असे केले होते. त्याला तो उत्तमगडही म्हणत असे.कोणतीही चूक होऊ नये असे त्यांना वाटत होते...इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान असताना त्यांनी रायगडाला भेट दिली होती. त्या वेळची आठवण सांगताना बाबासाहेब म्हणाले, ‘इंदिरा गांधी रायगडावर आल्या होत्या, तेव्हा माहिती सांगण्यासाठी मी त्यांच्यासोबत होतो. त्या वेळी रायगडाबद्दल त्यांना फारशी माहिती नसल्याने येथील परंपरा, वागण्याची पद्धत सांगण्याची विनंती केली. जेणेकरुन त्यांच्याकडून कुठलीही चूक होऊ नये असे त्यांना वाटत होते.’

टॅग्स :Puneपुणे