शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वेडी माणसे इतिहास घडवतात - बाबासाहेब पुरंदरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:50 IST

इतिहासात चंदनही आहे, कोळसाही आहे. त्यामुळे त्यातील नेमके काय घ्यायचे हे आपण ठरवायला हवे, एखाद्या गोष्टीचे वेड लावून घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही.

पुणे : इतिहासात चंदनही आहे, कोळसाही आहे. त्यामुळे त्यातील नेमके काय घ्यायचे हे आपण ठरवायला हवे, एखाद्या गोष्टीचे वेड लावून घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेडी माणसे इतिहास निर्माण करतात. युवक-युवतींनी रायगडाचे दर्शन आयुष्यात एकदातरी घ्यायला हवे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया ‘किल्ले रायगड’ वर ५० वर्षांपूर्वी केलेला दुर्मिळ लघुपट पाहण्याची संधी चित्रपट रसिकांना प्राप्त झाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात लघुपटाचे प्रदर्शन केले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून हा लघुपट तयार करण्यात आला होता. या लघुपटाचे दिग्दर्शन माधव शिंदे यांनी केले होते. त्या वेळी त्याची अवस्था खराब होती. परंतु, संग्रहालयाने तांत्रिक सोपस्कार करून तो लघुपट प्रदर्शनासाठी तयार केला. या वेळी बाबासाहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला.बाबासाहेब म्हणाले, की ६ दिवस रायगडावर मुक्काम करून आम्ही हा लघुपट तयार केला. या लघुपटामध्ये ऐतिहासिक प्रसंगांची चित्रे दाखविण्याची कल्पना लतादीदींची होती. या लघुपटाला हृदयनाथ मंगेशकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.रायगडाबद्दल ते पुढे म्हणाले, देशद्रोही, राजद्रोही लोकांना रायगडावरून कडेलोट केले जायचे. मात्र, किल्ला शिवाजीमहाराजांच्या ताब्यात आल्यानंतर एकही कडेलोट झाला नाही. महाराजांच्या काळात एकही राजद्रोह झाला नाही. १८१८ ते १८८० या काळात रायगडावर जाण्यास बंदी घातली. तरुणांमध्ये स्वराज्याची प्रेरणा पुन्हा जागृत होऊ नये, यासाठी ही बंदी घातली होती. रायगडावर विजय मिळविल्यानंतर औरंगजेबाने रायगडाचे नाव बदलून इस्लामगड असे केले होते. त्याला तो उत्तमगडही म्हणत असे.कोणतीही चूक होऊ नये असे त्यांना वाटत होते...इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान असताना त्यांनी रायगडाला भेट दिली होती. त्या वेळची आठवण सांगताना बाबासाहेब म्हणाले, ‘इंदिरा गांधी रायगडावर आल्या होत्या, तेव्हा माहिती सांगण्यासाठी मी त्यांच्यासोबत होतो. त्या वेळी रायगडाबद्दल त्यांना फारशी माहिती नसल्याने येथील परंपरा, वागण्याची पद्धत सांगण्याची विनंती केली. जेणेकरुन त्यांच्याकडून कुठलीही चूक होऊ नये असे त्यांना वाटत होते.’

टॅग्स :Puneपुणे